शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मीरा-भाईंदर महापालिकेने नेमली ५७ पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

मीरा रोड : बेजबाबदार लाेकांकडून मास्क न लावणे, गर्दी करणे, नाहक फिरणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा वेगाने ...

मीरा रोड : बेजबाबदार लाेकांकडून मास्क न लावणे, गर्दी करणे, नाहक फिरणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा वेगाने फैलाव हाेत आहे. या बेजबाबदार लोकांना वठणीवर आणण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढाेले यांनी तब्बल ५७ गस्ती पथके नेमली आहेत. काेराेनाचे रुग्ण आटाेक्यात आणण्यासाठी महापालिकेने हे मोठे पाऊल उचलले आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी केल्यास त्याचे चांगले परिणाम शहरात दिसतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांवर उपचार करण्यासाठी महापालिका प्रशासन आवश्यक ते उपाय व सुविधा नागरिकांना देत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा व पालिकेच्या इतर यंत्रणांवर ताण येत आहे. मास्क घालणे बंधनकारक असूनही अनेक लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणे, आस्थापना, दुकाने, फेरीवाले, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या आदींपासून महापालिका कार्यालयातही वावरतात. विनाकारण बाहेर फिरणे, भाज्या-मासळी खरेदीसाठी गर्दी करणे, खाण्या-पिण्याच्या ठिकाणी विनामास्क गर्दी करून राहणे आदी प्रकारांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त ढोले यांनी पोलीस व पालिका प्रशासनासाेबत ही पावले उचलली आहेत. आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी सुरुवातीला १७ पथके नेमली होती. मात्र ही पथके कमी पडत असल्यामुळे आणखी ४० पथके आयुक्तांनी नव्याने नेमली आहेत. प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षारक्षक यांच्यासह एक पोलीस कर्मचारी अशा पाच जणांचा समावेश आहे. या पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय नेमण्यात आले आहेत.

ही पथके त्यांच्या प्रभागात गस्त घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गरज पडल्यास फौजदारी कारवाई करणार आहेत. विनामास्क वा मास्क व्यवस्थित घातलेला नसेल, गर्दी केली असेल्, बंदी असतानाही दुकाने-आस्थापना खुली असतील, फेरीवाले बसले असतील किंवा अन्य नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

‘शिस्त लावण्यासाठी पथकांची नेमणूक’

केंद्र व राज्य शासन तसेच महापालिका व पोलिसांमार्फत नागरिकांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमनिर्देशांचे पालन करा, असे आवाहन केले जात आहे. जागरूक नागरिक त्या आवाहनानुसार नियमांचे पालन करून संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करत आहेत. अनेक लोक नियमांचे पालन करत नसल्याने संसर्ग पसरण्यास मोठे कारण ठरत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाईसाठी पालिका व पोलिसांनी मिळून पथके नेमली आहेत, असे आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले.