शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

मीरा-भाईंदर महापालिकेने नेमली ५७ पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

मीरा रोड : बेजबाबदार लाेकांकडून मास्क न लावणे, गर्दी करणे, नाहक फिरणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा वेगाने ...

मीरा रोड : बेजबाबदार लाेकांकडून मास्क न लावणे, गर्दी करणे, नाहक फिरणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा वेगाने फैलाव हाेत आहे. या बेजबाबदार लोकांना वठणीवर आणण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढाेले यांनी तब्बल ५७ गस्ती पथके नेमली आहेत. काेराेनाचे रुग्ण आटाेक्यात आणण्यासाठी महापालिकेने हे मोठे पाऊल उचलले आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी केल्यास त्याचे चांगले परिणाम शहरात दिसतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांवर उपचार करण्यासाठी महापालिका प्रशासन आवश्यक ते उपाय व सुविधा नागरिकांना देत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा व पालिकेच्या इतर यंत्रणांवर ताण येत आहे. मास्क घालणे बंधनकारक असूनही अनेक लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणे, आस्थापना, दुकाने, फेरीवाले, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या आदींपासून महापालिका कार्यालयातही वावरतात. विनाकारण बाहेर फिरणे, भाज्या-मासळी खरेदीसाठी गर्दी करणे, खाण्या-पिण्याच्या ठिकाणी विनामास्क गर्दी करून राहणे आदी प्रकारांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त ढोले यांनी पोलीस व पालिका प्रशासनासाेबत ही पावले उचलली आहेत. आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी सुरुवातीला १७ पथके नेमली होती. मात्र ही पथके कमी पडत असल्यामुळे आणखी ४० पथके आयुक्तांनी नव्याने नेमली आहेत. प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षारक्षक यांच्यासह एक पोलीस कर्मचारी अशा पाच जणांचा समावेश आहे. या पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय नेमण्यात आले आहेत.

ही पथके त्यांच्या प्रभागात गस्त घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गरज पडल्यास फौजदारी कारवाई करणार आहेत. विनामास्क वा मास्क व्यवस्थित घातलेला नसेल, गर्दी केली असेल्, बंदी असतानाही दुकाने-आस्थापना खुली असतील, फेरीवाले बसले असतील किंवा अन्य नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

‘शिस्त लावण्यासाठी पथकांची नेमणूक’

केंद्र व राज्य शासन तसेच महापालिका व पोलिसांमार्फत नागरिकांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमनिर्देशांचे पालन करा, असे आवाहन केले जात आहे. जागरूक नागरिक त्या आवाहनानुसार नियमांचे पालन करून संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करत आहेत. अनेक लोक नियमांचे पालन करत नसल्याने संसर्ग पसरण्यास मोठे कारण ठरत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाईसाठी पालिका व पोलिसांनी मिळून पथके नेमली आहेत, असे आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले.