शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

आश्रमशाळांत ५ वर्षात ५७ बालमृत्यू

By admin | Updated: September 1, 2015 23:58 IST

येथील आदिवासी मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून जव्हार प्रकल्पा अंतर्गत या भागात ३० आश्रमशाळा चालविल्या जातात. मात्र, त्यात २०१० ते १५ या काळात ५७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे

रविंद्र साळवे, मोखाडायेथील आदिवासी मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून जव्हार प्रकल्पा अंतर्गत या भागात ३० आश्रमशाळा चालविल्या जातात. मात्र, त्यात २०१० ते १५ या काळात ५७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दुदैवाची गोष्ट म्हणजे मृत्यू झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना निधी आभावी मदतही मिळू शकलेली नाही. साप चावणे, नदीमध्ये किवां डोहात बुडून अथवा आजारी पडल्यामुळे हे मृत्यू घडले आहेत. निधीचा आभाव, कर्मचाऱ्यांनी कमतरता अशी कारणे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहेत.या आश्रमशाळांमध्ये १८ हजार १६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु आरोग्यदायी शिक्षणाची वल्गना करणाऱ्या या आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट दिली असता. अस्वच्छता, शैक्षणिक साहित्याचा आभाव आणि अधिक्षकांचे दुर्लक्ष हेच वास्तव त्यामागे आहे. २०१०-११ ते २०१४-१५ च्या दरम्यान, याच आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या ४४ मुला-मुलींचा मृत्यू झाला असून २०१३-१४, १४-१५ च्या दरम्यान मृत्यू झालेल्या १३ मुलांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येकी ७५ हजार रुपयांची मदत निधी अभावी मिळू शकलेली नाही. या आश्रमशाळेत व्यवस्था नसल्याने नदीओढ्यावर आदिवासी मुलांना आंधोळ व कपडे धुण्यासाठी जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत आहेत. तसेच आश्रमशाळेत पहिलीमध्ये शिकणारी मुले सुद्धा येथे राहतात यामुळे त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. परंतु येथील ३० आश्रमशाळेतील महिला व पुरूष अधिक्षकांची २८ पदे रिक्त आहेत. यामुळे निवासी मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. आदिवासी विकासमंत्री या जिल्ह्याचे असूनही ही भयानक स्थिती आहे. परंतु त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाहीत.