शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांत ५ वर्षात ५७ बालमृत्यू

By admin | Updated: September 1, 2015 23:58 IST

येथील आदिवासी मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून जव्हार प्रकल्पा अंतर्गत या भागात ३० आश्रमशाळा चालविल्या जातात. मात्र, त्यात २०१० ते १५ या काळात ५७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे

रविंद्र साळवे, मोखाडायेथील आदिवासी मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून जव्हार प्रकल्पा अंतर्गत या भागात ३० आश्रमशाळा चालविल्या जातात. मात्र, त्यात २०१० ते १५ या काळात ५७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दुदैवाची गोष्ट म्हणजे मृत्यू झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना निधी आभावी मदतही मिळू शकलेली नाही. साप चावणे, नदीमध्ये किवां डोहात बुडून अथवा आजारी पडल्यामुळे हे मृत्यू घडले आहेत. निधीचा आभाव, कर्मचाऱ्यांनी कमतरता अशी कारणे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहेत.या आश्रमशाळांमध्ये १८ हजार १६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु आरोग्यदायी शिक्षणाची वल्गना करणाऱ्या या आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट दिली असता. अस्वच्छता, शैक्षणिक साहित्याचा आभाव आणि अधिक्षकांचे दुर्लक्ष हेच वास्तव त्यामागे आहे. २०१०-११ ते २०१४-१५ च्या दरम्यान, याच आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या ४४ मुला-मुलींचा मृत्यू झाला असून २०१३-१४, १४-१५ च्या दरम्यान मृत्यू झालेल्या १३ मुलांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येकी ७५ हजार रुपयांची मदत निधी अभावी मिळू शकलेली नाही. या आश्रमशाळेत व्यवस्था नसल्याने नदीओढ्यावर आदिवासी मुलांना आंधोळ व कपडे धुण्यासाठी जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत आहेत. तसेच आश्रमशाळेत पहिलीमध्ये शिकणारी मुले सुद्धा येथे राहतात यामुळे त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. परंतु येथील ३० आश्रमशाळेतील महिला व पुरूष अधिक्षकांची २८ पदे रिक्त आहेत. यामुळे निवासी मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. आदिवासी विकासमंत्री या जिल्ह्याचे असूनही ही भयानक स्थिती आहे. परंतु त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाहीत.