शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

कुटुंबसंख्या 5.61 लाख, पाणीबिले मात्र 2.25 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:10 IST

११५ कोटींची वसुली : २० नळजोडण्या खंडित, कारवाईची नोंद नाही

- अजित मांडकेठाणे :   ठाणे  महापालिकेकडून पाणीबिलांच्या वसुलीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याबरोबर इतर उपायदेखील केले जात आहेत. शहरातील पाच लाख ६० हजार ७०७ कुटुंबांपैकी दोन लाख २३ हजार ४ नळजोडण्या दिलेल्या आहेत. तर आतापर्यंत पाणी बिलापोटी ११५ कोटींची वसुली झालेली असून  ६५ कोटींची थकबाकी येणे आहे. यासाठी महापालिकेने मागील दोन वर्षांपासून सुमारे २० हजारांहून अधिक अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. आजघडीला शहराची लोकसंख्या ही २५ लाखांच्या घरात आहे. शहराला रोज ४८८ दशलक्ष पाणीपुरवठा होत आहे. तर शहरात नऊ  लाखांहून अधिक झोपड्या असून गृहसंकुलांची संख्यादेखील १० हजारांच्या वर गेली आहे. असे असले तरी आजही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाच लाख ६० हजार ७०७ कुटुंबांना नळजोडण्या दिल्या आहेत.  परंतु बिले मात्र दोन लाख २३ हजार चारच दिली जात आहेत. काही ठिकाणी चाळ सिस्टम असल्याने चाळींचे एकत्रित बिल काढले जात आहे. तर गृहसंकुलांच्या ठिकाणीदेखील प्रत्येक इमारतीचे एकच बिल काढले जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच बिले लावण्यात येत असल्याची संख्या काहीशी कमी दिसत असल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.असे असतानाही आजही शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडणी घेतली जात आहे. त्यावर महापालिका कारवाईदेखील करते. परंतु त्यांची संख्या मात्र दप्तरी उपलब्ध नाही, किंबहुना त्याचा सर्व्हेही केलेला नाही. २० हजार अनधिकृत नळठाणे महापालिका दरवर्षी अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करते. त्यानुसार या आर्थिक वर्षात आतापर्यंत अडीच हजारच्या आसपास अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या आहेत. तर मागील दोन वर्षांत २० हजारांहून अधिक नळजोडण्या खंडित केल्या आहेत.निम्म्या पाण्याची गळतीशहराला रोज ४८८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, आजही पाण्याची चोरी, नियोजनाचा अभाव आणि ठिकठिकाणी असलेल्या पाणीगळतीचे प्रमाण यामुळे शहरात ४५ टक्के पाणीगळती आहे.थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू आहे. ज्यांची अधिकची थकबाकी असेल त्यांचे कनेक्शन खंडित केले जात आहे. याशिवाय पाणीगळती रोखण्यासाठीदेखील विविध स्वरूपाचे उपाय केले जात आहेत.    - विनोद पवार , कार्यकारी     अभियंता - पाणीपुरवठा     विभाग, ठामपाअनधिकृत नळजोडण्या तोडल्या जात असल्या तरी अधिकृत नळधारकांनीदेखील ६५ कोटींची देणी थकवली आहेत. ती वसूल करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना पुढे आणल्या जात आहेत. तसेच थकीत रकमेवरील व्याजही माफ केले जात आहे. परंतु, असे असले तरी अद्यापही ही वसुली महापालिकेला करता आलेली नाही.