शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबसंख्या 5.61 लाख, पाणीबिले मात्र 2.25 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:10 IST

११५ कोटींची वसुली : २० नळजोडण्या खंडित, कारवाईची नोंद नाही

- अजित मांडकेठाणे :   ठाणे  महापालिकेकडून पाणीबिलांच्या वसुलीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याबरोबर इतर उपायदेखील केले जात आहेत. शहरातील पाच लाख ६० हजार ७०७ कुटुंबांपैकी दोन लाख २३ हजार ४ नळजोडण्या दिलेल्या आहेत. तर आतापर्यंत पाणी बिलापोटी ११५ कोटींची वसुली झालेली असून  ६५ कोटींची थकबाकी येणे आहे. यासाठी महापालिकेने मागील दोन वर्षांपासून सुमारे २० हजारांहून अधिक अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. आजघडीला शहराची लोकसंख्या ही २५ लाखांच्या घरात आहे. शहराला रोज ४८८ दशलक्ष पाणीपुरवठा होत आहे. तर शहरात नऊ  लाखांहून अधिक झोपड्या असून गृहसंकुलांची संख्यादेखील १० हजारांच्या वर गेली आहे. असे असले तरी आजही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाच लाख ६० हजार ७०७ कुटुंबांना नळजोडण्या दिल्या आहेत.  परंतु बिले मात्र दोन लाख २३ हजार चारच दिली जात आहेत. काही ठिकाणी चाळ सिस्टम असल्याने चाळींचे एकत्रित बिल काढले जात आहे. तर गृहसंकुलांच्या ठिकाणीदेखील प्रत्येक इमारतीचे एकच बिल काढले जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच बिले लावण्यात येत असल्याची संख्या काहीशी कमी दिसत असल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.असे असतानाही आजही शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडणी घेतली जात आहे. त्यावर महापालिका कारवाईदेखील करते. परंतु त्यांची संख्या मात्र दप्तरी उपलब्ध नाही, किंबहुना त्याचा सर्व्हेही केलेला नाही. २० हजार अनधिकृत नळठाणे महापालिका दरवर्षी अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करते. त्यानुसार या आर्थिक वर्षात आतापर्यंत अडीच हजारच्या आसपास अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या आहेत. तर मागील दोन वर्षांत २० हजारांहून अधिक नळजोडण्या खंडित केल्या आहेत.निम्म्या पाण्याची गळतीशहराला रोज ४८८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, आजही पाण्याची चोरी, नियोजनाचा अभाव आणि ठिकठिकाणी असलेल्या पाणीगळतीचे प्रमाण यामुळे शहरात ४५ टक्के पाणीगळती आहे.थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू आहे. ज्यांची अधिकची थकबाकी असेल त्यांचे कनेक्शन खंडित केले जात आहे. याशिवाय पाणीगळती रोखण्यासाठीदेखील विविध स्वरूपाचे उपाय केले जात आहेत.    - विनोद पवार , कार्यकारी     अभियंता - पाणीपुरवठा     विभाग, ठामपाअनधिकृत नळजोडण्या तोडल्या जात असल्या तरी अधिकृत नळधारकांनीदेखील ६५ कोटींची देणी थकवली आहेत. ती वसूल करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना पुढे आणल्या जात आहेत. तसेच थकीत रकमेवरील व्याजही माफ केले जात आहे. परंतु, असे असले तरी अद्यापही ही वसुली महापालिकेला करता आलेली नाही.