शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्यात १४४ ग्रामपंचायतींमधील मजुरांच्या हाताला ५५३४ कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील गावपाड्यांमधील मजुरांच्या हाताला १०० दिवसांचे काम उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील गावपाड्यांमधील मजुरांच्या हाताला १०० दिवसांचे काम उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (एमआरईजीएस) हाती घेतली आहे. याद्वारे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १४४ ग्रामपंचायतींमधील मजुरांसाठी पाच हजार ५३४ कामे हाती घेतली आहेत. यासाठी स्त्री, पुरुषांस प्रत्येकी २३८ रुपये मजुरी दिली जात आहे. जिल्ह्यातील मजुरांसाठी तीन लाख ४२ हजार १२८ मनुष्य दिवस कामांचे नियोजन केले आहे. यासाठी चार कोटी ६३ लाखांची कामे २०२०-२१ या कालावधीत खर्च करण्याचे नियोजन आहे. यातून ग्रामपंचायतींमधील पाच हजार ५३४ कामे आणि यंत्रणांद्वारे हाती घेतलेली ६९३ कामे आदी सहा लाख २२७ कामांवर खर्च केला जात आहे. या कामांवर काम करणाऱ्या मजुरांना दिवसाकाठी २३८ रुपये मजुरी दिली जात आहे. या मजुरांचे वेतन बँकेत जमा होत असल्याचे उघड झाले आहे. या सेल्फवरील कामांची मजुरांनी मागणी करताच ती उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी मजुरांना या शेल्फच्या कामासाठी फाॅर्म नं. ४ भरून देण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.

या कामांपैकी सर्वांगीणदृष्ट्या उपयुक्त ठरणारी जनसुविधांची कामे, ग्रामपंचायतींच्या बांधकामांसह स्मशानभूमी, दफनभूमी आणि गावरस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. याशिवाय गावपातळीवरील तलावांमधील गाळ काढणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटारी दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे. याशिवाय शाळा, अंगणवाडी आदींच्या दुरुस्तींच्या कामांनाही प्राधान्य दिले जात आहे. तहसीलदार तथा कार्यक्रम अधिकारी, गटविकास अधिकारी तथा सह कार्यक्रम अधिकारी यांच्यामार्फत या कामांना मंजुरी देऊन ती स्थानिक मजुरांकडून प्राधान्यक्रमाने करून घेण्याचे नियोजन जिल्ह्यात केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील या एमआरईजीएसची कामे मजुरांच्या हाताला देऊन त्यांची रोजगार समस्या सोडवण्यात येत आहे.

.......