शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:53 IST

ठाणे : कोरोनामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सामान्य माणसाच्या नोकरीधंद्यावर सर्वांत मोठा परिणाम मागील वर्षभरात झाला आहे. ...

ठाणे : कोरोनामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सामान्य माणसाच्या नोकरीधंद्यावर सर्वांत मोठा परिणाम मागील वर्षभरात झाला आहे. अजूनही कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत आहे. अशा अडचणीच्या काळात तरी सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी केलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ताकर माफीची घोषणा आता अंमलात आणावी, यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे संजय घाडीगांवकर यांनी केली आहे.

मागील निवडणुकीत सत्ताधारी सेनेने पालिका क्षेत्रातील ५०० फुटांपर्यंत असणाऱ्या मालमत्तांना करमाफी देण्याची घोषणा केली होती. निवडणूक होऊन चार वर्षे झाली तरी या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. सध्या कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत असताना त्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. सामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडले आहे. किमान याची जाणीव ठेवून पाच वर्षांपूर्वी ठाणेकरांना दिलेले मालमत्ता करमाफीचे आश्वासन या अडचणीच्या काळात पूर्ण करून सामान्य ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी भूमिका घाडीगांवकर यांनी मांडली आहे.