शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ५० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या ...

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या पाणी कपातीचे नियोजन करावे लागते. त्यामुळे बारवी धरण भरणे हे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या ४८ तासांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धरणाची उंची चार मीटरने वाढवल्यानंतर ३४० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होतो. २० जुलै रोजी धरणात १७० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

आजच्या घडीला धरणाच्या पाण्याची पातळी ६५ मीटरपर्यंत आली असून धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार होता. मात्र, गेल्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात धरण भरून वाहू लागते. मात्र, त्यासाठी पावसाने दमदार हजेरी लावणे गरजेचे ठरते. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाच टक्के अतिरिक्त पाणीसाठा असून गेल्या वर्षी २० जुलै रोजी १५५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता. गेल्या ४८ तासांत बारवी धरण परिसरात सरासरी १७० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

उल्हास नदीला नैसर्गिक प्रवाह जास्त असल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातूनच संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत असाच पाऊस सुरू राहिल्यास ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचा निर्णय लवकरच मागे घेण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

-------