शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ५० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या ...

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या पाणी कपातीचे नियोजन करावे लागते. त्यामुळे बारवी धरण भरणे हे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या ४८ तासांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धरणाची उंची चार मीटरने वाढवल्यानंतर ३४० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होतो. २० जुलै रोजी धरणात १७० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

आजच्या घडीला धरणाच्या पाण्याची पातळी ६५ मीटरपर्यंत आली असून धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार होता. मात्र, गेल्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात धरण भरून वाहू लागते. मात्र, त्यासाठी पावसाने दमदार हजेरी लावणे गरजेचे ठरते. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाच टक्के अतिरिक्त पाणीसाठा असून गेल्या वर्षी २० जुलै रोजी १५५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता. गेल्या ४८ तासांत बारवी धरण परिसरात सरासरी १७० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

उल्हास नदीला नैसर्गिक प्रवाह जास्त असल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातूनच संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत असाच पाऊस सुरू राहिल्यास ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचा निर्णय लवकरच मागे घेण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

-------