शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ५० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या ...

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या पाणी कपातीचे नियोजन करावे लागते. त्यामुळे बारवी धरण भरणे हे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या ४८ तासांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धरणाची उंची चार मीटरने वाढवल्यानंतर ३४० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होतो. २० जुलै रोजी धरणात १७० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

आजच्या घडीला धरणाच्या पाण्याची पातळी ६५ मीटरपर्यंत आली असून धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार होता. मात्र, गेल्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात धरण भरून वाहू लागते. मात्र, त्यासाठी पावसाने दमदार हजेरी लावणे गरजेचे ठरते. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाच टक्के अतिरिक्त पाणीसाठा असून गेल्या वर्षी २० जुलै रोजी १५५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता. गेल्या ४८ तासांत बारवी धरण परिसरात सरासरी १७० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

उल्हास नदीला नैसर्गिक प्रवाह जास्त असल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातूनच संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत असाच पाऊस सुरू राहिल्यास ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचा निर्णय लवकरच मागे घेण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

-------