शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ५० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या ...

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या पाणी कपातीचे नियोजन करावे लागते. त्यामुळे बारवी धरण भरणे हे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या ४८ तासांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धरणाची उंची चार मीटरने वाढवल्यानंतर ३४० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होतो. २० जुलै रोजी धरणात १७० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

आजच्या घडीला धरणाच्या पाण्याची पातळी ६५ मीटरपर्यंत आली असून धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार होता. मात्र, गेल्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात धरण भरून वाहू लागते. मात्र, त्यासाठी पावसाने दमदार हजेरी लावणे गरजेचे ठरते. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाच टक्के अतिरिक्त पाणीसाठा असून गेल्या वर्षी २० जुलै रोजी १५५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता. गेल्या ४८ तासांत बारवी धरण परिसरात सरासरी १७० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

उल्हास नदीला नैसर्गिक प्रवाह जास्त असल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातूनच संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत असाच पाऊस सुरू राहिल्यास ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचा निर्णय लवकरच मागे घेण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

-------