शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकराच्या वाजवी दरात ५० टक्क्यांपर्यंत सूट

By admin | Updated: May 5, 2017 05:43 IST

रेडी रेकनर दराचा आधार घेऊन मूल्यवर्धित करप्रणालीनुसार २०१६-१७ मध्ये विकसित केलेल्या मालमत्ताधारकांवर लादलेली करवाढ

ठाणे : रेडी रेकनर दराचा आधार घेऊन मूल्यवर्धित करप्रणालीनुसार २०१६-१७ मध्ये विकसित केलेल्या मालमत्ताधारकांवर लादलेली करवाढ २५ ते ५० टक्के कमी करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. रेडी रेकनर दर हा घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक असल्याने वाढीव कराचा जास्त फटका घोडबंदर पट्ट्यातील मालमत्ताधारकांना बसला होता. त्यामुळे या पट्ट्यातील नागरिकांना चारपट दराने मालमत्ताकराची बिले पाठवण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर भरणे नागरिकांना शक्य नसल्याने ठाण्यातील विविध संघटना तसेच नागरिकांनी तो कमी करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. महानगरपालिकेने २०१६-२०१७ सालामध्ये विकसित होणाऱ्या मिळकतींचे करयोग्य मूल्य ज्या आधारे ठरवण्यात येते, त्या वाजवी भाड्यामध्ये वाढ केली होती. सदरची दरवाढ १ एप्रिल २०१७ पासून अमलातही आली होती. १ एप्रिल २०१६ नंतर रेडी रेकनरचे दर वाढले असून ते घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक असल्याने या पट्ट्यात करआकारणीदेखील सर्वाधिक आहे. सर्वात कमी दर कळवा-मुंब्रा भागांत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पात येत्या दोन वर्षांमध्ये भांडवली करप्रणाली लागू करण्याचा महापालिकेचा मानस असून ही करप्रणाली लागू झाल्यास मालमत्ताकरामध्ये आणखी वाढ होणार आहे. मूल्यवर्धित प्रणालीनुसार मालमत्ताकराची बिले देण्यात आल्यानंतर बिलावर आकारण्यात आलेली रक्कम बघून ठाणेकर नागरिक हैराण झाले होते. घोडबंदर पट्ट्यातील नागरिकांना तर हा कर चारपट अधिक आल्याने तो एवढा वाढला कसा, हे जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रभाग समिती कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यास सुरु वात केली होती. त्यामुळे घोडबंदर पट्ट्यातील ज्यांचा वन बीएचके फ्लॅट आहे, त्यांना २० ते २५ हजार, तर ज्यांचा २ बीचके फ्लॅट आहे, त्यांना ३० ते ३३ हजारांच्या घरात मालमत्ताकराची बिले पाठवली होती. (प्रतिनिधी) १मूल्यवर्धित करप्रणालीनुसार घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक ४.८० रु पये प्रतिचौरस फूट मालमत्ताकर लावण्यात आला आहे. नौपाडा भागात ४.६०, वागळे पट्ट्यात ४.२०, तर कळवा आणि मुंब्रा परिसरांत ३ रु पयांपेक्षा अधिक प्रतिचौरस फूट दर लावल्याने घोडबंदर परिसरातील नागरिकांचे कंबरडेच या वाढीव करप्रणाली मोडले होते.२दरम्यान, वाजवी दरामधील ही वाढ जास्त प्रमाणात असल्याने एमसीएचआय, पत्रकार संघटना तसेच विविध संस्थांनी महापालिका आयुक्त जयस्वाल यांची भेट घेऊन सदर दराविषयी फेरविचार करावा, अशी विनंती केली होती. ३त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सारासार विचार करून वाजवी दरामध्ये साधारत: २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे २०१६-२०१७ या वर्षामध्ये विकसित होणाऱ्या अनेक मिळकतधारकांना याचा फायदा होणार आहे.