शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गहाळ झालेले २१ लाख ५० हजारांचे ५० मोबाईल सापडले

By अजित मांडके | Updated: March 30, 2024 18:56 IST

ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून वेबसाईटच्या आधारे नागरिकांचे हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्याबाबत तांत्रिक तपास करण्यात आला.

ठाणे : रिक्षात विसरलेले, रस्त्यात पडलेले किंवा चोरीला गेलेले तब्बल २१ लाख ५० हजार रुपये किमंतीचे ५० मोबाईल शोधण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. त्यानुसार शनिवारी यातील काही जणांचे मोबाइल प्राथनिधीक स्वरुपात हस्तांतरीत करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

ठाणे पोलीस आयुक्तालयात मागील काही महिन्यात नागरीकांचे मोबाइल फोन हरविण्याचे प्रमाण वाढल्याने त्या संदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर व इतर वरीष्ठांनी हरविलेली मालमत्ता शोधून ती संबधीत नागरीकांना परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून वेबसाईटच्या आधारे नागरीकांचे हरविलेल्या मोबाइल फोनची माहिती मिळवून त्याबाबत तांत्रिक तपास करुन २१ लाख ५० हजार रुपये किमंतीचे ५० मोबाइल शोधून काढले आहेत. त्यानंतर शनिवारी त्याचे प्राथनिधीक स्वरुपात काही मालकांना ते मोबाइल परत देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, परिसरातील नागरीकांना यावेळी आवाहन करण्यात आले असून ज्यांचे मोबाइल गहाळ झाले असेतील त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा वेबसाईटवर अपलोड करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे