शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

गहाळ झालेले २१ लाख ५० हजारांचे ५० मोबाईल सापडले

By अजित मांडके | Updated: March 30, 2024 18:56 IST

ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून वेबसाईटच्या आधारे नागरिकांचे हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्याबाबत तांत्रिक तपास करण्यात आला.

ठाणे : रिक्षात विसरलेले, रस्त्यात पडलेले किंवा चोरीला गेलेले तब्बल २१ लाख ५० हजार रुपये किमंतीचे ५० मोबाईल शोधण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. त्यानुसार शनिवारी यातील काही जणांचे मोबाइल प्राथनिधीक स्वरुपात हस्तांतरीत करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

ठाणे पोलीस आयुक्तालयात मागील काही महिन्यात नागरीकांचे मोबाइल फोन हरविण्याचे प्रमाण वाढल्याने त्या संदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर व इतर वरीष्ठांनी हरविलेली मालमत्ता शोधून ती संबधीत नागरीकांना परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून वेबसाईटच्या आधारे नागरीकांचे हरविलेल्या मोबाइल फोनची माहिती मिळवून त्याबाबत तांत्रिक तपास करुन २१ लाख ५० हजार रुपये किमंतीचे ५० मोबाइल शोधून काढले आहेत. त्यानंतर शनिवारी त्याचे प्राथनिधीक स्वरुपात काही मालकांना ते मोबाइल परत देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, परिसरातील नागरीकांना यावेळी आवाहन करण्यात आले असून ज्यांचे मोबाइल गहाळ झाले असेतील त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा वेबसाईटवर अपलोड करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे