शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

उल्हासनगरात स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू; ११ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 07:23 IST

चौथ्या मजल्याचे छत पत्त्याच्या बंगल्यासारखे आले तळमजल्यावर

उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. १ परिसरातील मोहिनी पॅलेस या चारमजली इमारतीच्या चौथ्या मजल्याचे छत कोसळून शनिवारी झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, तर ११ जण जखमी झाले आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं. १ परिसरात मोहिनी पॅलेस ही चारमजली इमारत १९९४ मध्ये बांधण्यात आली आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्याचे छत कोसळून ते तिसऱ्या, दुसऱ्या, पहिल्या व तळमजल्यावर पत्त्याच्या बंगल्यासारखे येऊन कोसळले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. भीतीने नागरिक पळत सुटले. स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत आल्याने, इमारतीमधील २० ते २५ नागरिक यामध्ये अडकल्याची भीती सुरुवातीला व्यक्त केली जात होती. 

महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. या इमारतीत ९ सदनिका आणि तळमजल्यावर ८ दुकाने असल्याची माहिती सहायक आयुक्त शिंपी यांनी दिली. इमारतीच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. मदतकार्य सुरू असताना, आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, मदतकार्याला वेग आला.

मोहिनी पॅलेस इमारतीच्या चौथ्या मजल्याचे छत कोसळताच इमारतीमधील रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोघांना खिडकीचे गज कापून बाहेर काढावे लागले. १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले. तळमजल्यावर ५ ते ६ रहिवासी अडकल्याची माहिती पालिका प्रशासनाने  दिली. त्यापैकी दोघांचे मृतदेह सुरुवातीला बाहेर काढले. नंतर ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले, तसे आणखी तीन मृतदेह हाती लागले. दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी कोण अडकले आहे का, याचा शोध रात्री उशिरापर्यंत घेतला जात होता.

महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बेघर झालेल्या नागरिकांना संत थारासिंग दरबार यांनी मदतीचा हात दिला असून, महापालिका त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.या घटनेने पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावेमॉन्टी मिलिंद पारचे (१२), सावित्री पारचे (६०), हरेश डोडवाल (५२), ऐश्वर्या हरेश डोडवाल (२३), संध्या हरेश डोडवाल (५०).

दुर्घटनेनंतर सदनिकांमध्ये अडकलेल्या रहिवाशांना खिडकीचे गज कापून बाहेर काढण्यात आले. एकूण १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.