शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरूस्तीच्या कामात ५ कोटींचा झाला घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 22:49 IST

उल्हासनगर पालिका : महासभेत विरोधकांनी केला आरोप

उल्हासनगर : महापालिकेच्या रस्ता दुरूस्ती कामात ५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी करून सोमवारी झालेल्या महासभेत खळबळ उडवून दिली. तर मुख्य १६ रस्त्याच्या दुरूस्तीवर साडेसात कोटींचा खर्च झाला असून त्याला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.

उल्हासनगर महापालिकेने पावसाळयापूर्वी रस्ता दुरूस्ती न केल्याने, रस्त्याची दुरवस्था झाली होती. ऐन दिवाळी दरम्यान प्रभाग समिती मधील प्रत्येकी ४ असे एकूण १६ रस्त्याच्या तात्पुरत्या दुरूस्तीला २ कोटीच्या निधीतून आयुक्त देशमुख यांनी मान्यता दिली. मात्र निधी अभावी रस्त्याचे काम अर्धवट राहू नये म्हणून स्थायी समितीमध्ये निधी वाढवून देण्याचा प्रस्ताव आणण्यात आला.

स्थायी समितीत निधीच्या खर्चाची जबाबदारी आयुक्तांकडे देण्यात आली. त्यानुसार रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले असून रस्त्यावर आतापर्यंत साडेसात कोटीचा खर्च झाल्याची माहिती आयुक्तांनी महासभेत दिली. तर विरोधकांनी रस्ता दुरस्तीत ५ कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप करून अप्रत्यक्ष आयुक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

देशमुख यांनी १६ मुख्य रस्त्यांशिवाय इतर रस्त्याच्या दुरूस्तीची निविदा लवकरच काढण्याचे संकेत दिले. गेल्यावर्षी रस्त्याच्या दुरूस्तीवर १६ कोटींचा खर्च झाला होता, अशी आठवण आयुक्तांनी विरोधकांना करून दिली. एकूणच रस्त्याच्या दुरूस्ती कामावरून विरोधक विरूध्द आयुक्त असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसेच गेल्यावर्षी रस्ता दुरस्तीवर १६ कोटींचा खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था कायम असल्याची ओरड त्यावेळचे विरोधक शिवसेनेने केली होती.

आयुक्तांनी मंगळवारी बांधकाम विभागाच्या अधिकारी व अभियंत्यांची बैठक घेऊन रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहण्याचे संकेत दिले. तसेच नवीन वर्षात रस्ते चकाचक करण्याचे संकेत दिले. भाजपचे जीवन इदनानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी यांनी रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप केला. यामुळे शहरात पुन्हा राजकारण तापणार आहे.विनानिविदा केले ५ कोटीचे काममहापालिका आयुक्त, शहर अभियंता, मुख्य लेखा अधिकारी व मुख्य लेखा परीक्षक यांनी विनापरवाना व निविदाविना साडेसात कोटीच्या निधीतून रस्त्याची दुरूस्ती केली, असा आरोप भाजपचे नगरसेवक व माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी केला. अत्यावश्यक कामाच्या आड विनानिविदा कोटयवधींचे काम करता येते का? असा प्रश्नही इदनानी यांनी विचारून ५ कोटीच्या रस्ता दुरूस्ती घोटाळयाच्या चौकशीची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे इदनानी यांनी सांगितले.