शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

रस्ते दुरूस्तीच्या कामात ५ कोटींचा झाला घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 22:49 IST

उल्हासनगर पालिका : महासभेत विरोधकांनी केला आरोप

उल्हासनगर : महापालिकेच्या रस्ता दुरूस्ती कामात ५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी करून सोमवारी झालेल्या महासभेत खळबळ उडवून दिली. तर मुख्य १६ रस्त्याच्या दुरूस्तीवर साडेसात कोटींचा खर्च झाला असून त्याला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.

उल्हासनगर महापालिकेने पावसाळयापूर्वी रस्ता दुरूस्ती न केल्याने, रस्त्याची दुरवस्था झाली होती. ऐन दिवाळी दरम्यान प्रभाग समिती मधील प्रत्येकी ४ असे एकूण १६ रस्त्याच्या तात्पुरत्या दुरूस्तीला २ कोटीच्या निधीतून आयुक्त देशमुख यांनी मान्यता दिली. मात्र निधी अभावी रस्त्याचे काम अर्धवट राहू नये म्हणून स्थायी समितीमध्ये निधी वाढवून देण्याचा प्रस्ताव आणण्यात आला.

स्थायी समितीत निधीच्या खर्चाची जबाबदारी आयुक्तांकडे देण्यात आली. त्यानुसार रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले असून रस्त्यावर आतापर्यंत साडेसात कोटीचा खर्च झाल्याची माहिती आयुक्तांनी महासभेत दिली. तर विरोधकांनी रस्ता दुरस्तीत ५ कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप करून अप्रत्यक्ष आयुक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

देशमुख यांनी १६ मुख्य रस्त्यांशिवाय इतर रस्त्याच्या दुरूस्तीची निविदा लवकरच काढण्याचे संकेत दिले. गेल्यावर्षी रस्त्याच्या दुरूस्तीवर १६ कोटींचा खर्च झाला होता, अशी आठवण आयुक्तांनी विरोधकांना करून दिली. एकूणच रस्त्याच्या दुरूस्ती कामावरून विरोधक विरूध्द आयुक्त असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसेच गेल्यावर्षी रस्ता दुरस्तीवर १६ कोटींचा खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था कायम असल्याची ओरड त्यावेळचे विरोधक शिवसेनेने केली होती.

आयुक्तांनी मंगळवारी बांधकाम विभागाच्या अधिकारी व अभियंत्यांची बैठक घेऊन रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहण्याचे संकेत दिले. तसेच नवीन वर्षात रस्ते चकाचक करण्याचे संकेत दिले. भाजपचे जीवन इदनानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी यांनी रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप केला. यामुळे शहरात पुन्हा राजकारण तापणार आहे.विनानिविदा केले ५ कोटीचे काममहापालिका आयुक्त, शहर अभियंता, मुख्य लेखा अधिकारी व मुख्य लेखा परीक्षक यांनी विनापरवाना व निविदाविना साडेसात कोटीच्या निधीतून रस्त्याची दुरूस्ती केली, असा आरोप भाजपचे नगरसेवक व माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी केला. अत्यावश्यक कामाच्या आड विनानिविदा कोटयवधींचे काम करता येते का? असा प्रश्नही इदनानी यांनी विचारून ५ कोटीच्या रस्ता दुरूस्ती घोटाळयाच्या चौकशीची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे इदनानी यांनी सांगितले.