शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पाच महिन्यांत ४७ बालकांचा मृत्यू, ठाणे रुग्णालयातील घटना,  इन्क्युबेटरचा अभाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:12 IST

आॅक्सिजनअभावी बळी गेलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फारुखाबाद अन् राज्यातील नाशिकच्या रुग्णालयापाठोपाठ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू विशेष उपचार कक्षात इन्क्युबेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत अत्यवस्थ असलेल्या ७३८ नवजात बालकांपैकी ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचीही गंभीर बाब उघडकीस आली आहे.

ठाणे : आॅक्सिजनअभावी बळी गेलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फारुखाबाद अन् राज्यातील नाशिकच्या रुग्णालयापाठोपाठ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू विशेष उपचार कक्षात इन्क्युबेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत अत्यवस्थ असलेल्या ७३८ नवजात बालकांपैकी ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचीही गंभीर बाब उघडकीस आली आहे. या काळात ३६ बालकांना मुंबईतील रुग्णालयात पाठवल्याचे उघड झाले.ठाणे जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या उपचारासाठी नवजात शिशू विशेष उपचार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अत्यवस्थ नवजात अर्भकांवर उपचार करता यावेत, यासाठी वैद्यकीय उपकरणांनी हा विभाग सज्ज ठेवण्यात येतो. जन्मत:च कावीळ असलेली, श्वसनक्रियेस त्रास होत असलेली तसेच वजन कमी असलेली बालके, अपुºया दिवसांच्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवणे अपरिहार्य ठरते. येथील एनआयसीयूमध्ये १६ इन्क्युबेटर असून एका इन्क्युबेटरमध्ये एकच बाळ ठेवणे बंधनकारक असते. परंतु, अत्यवस्थ नवजात अर्भकांची संख्या अधिक असल्याने एकेका इन्क्युबेटरमध्ये अनेकदा दोन ते तीन बालकांना ठेवले जात असल्याचे विदारक चित्र आहे.अर्भकांची प्रतिकारकशक्ती अत्यंत कमी असते. त्यामुळे एकाच पेटीत अनेक बाळांना ठेवले जात असल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो.जिल्हा सामान्य रूग्णालय सार्वजनिक आरोग्य द्वितीय श्रेणीत मोडते. त्यामुळे येथे व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही. नवजात शिशू विशेष उपचार कक्षातील गंभीर झालेल्या बालकांना जर व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली, तर त्यांना त्या अवस्तेच मुंबईला पाठवावे लागते. अनेकदा या फरफटीत आधीच प्रकृती नाजूक असलेली ही बालके दगावतात. पण ठाण्यासारख्या स्मार्ट होऊ घातलेल्या शहरात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने या मुलांचा तडफडून होणारा मृत्यू पाहण्याखेरीज पालकांच्या काहीच हाती उरत नाही.लोकप्रतिनिधी निद्रिस्त असल्याने संतापठाणे जिल्ह्यातून तीन खासदार, विधानसभेचे १८ आणि विधान परिषदेचे ६ असे २४ आमदार आहेत. मात्र, हे लोकप्रतिनिधी कुपोषणाने बळी जाणाºया बालकांविषयी जेवढे निद्रिस्त आहेत, तेवढेच सामान्य रुग्णालयात इन्क्युबेटरअभावी मृत्यू झालेल्या ४७ बालकांबाबतीतही असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.