शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

पाच महिन्यांत ४७ बालकांचा मृत्यू, ठाणे रुग्णालयातील घटना,  इन्क्युबेटरचा अभाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:12 IST

आॅक्सिजनअभावी बळी गेलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फारुखाबाद अन् राज्यातील नाशिकच्या रुग्णालयापाठोपाठ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू विशेष उपचार कक्षात इन्क्युबेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत अत्यवस्थ असलेल्या ७३८ नवजात बालकांपैकी ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचीही गंभीर बाब उघडकीस आली आहे.

ठाणे : आॅक्सिजनअभावी बळी गेलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फारुखाबाद अन् राज्यातील नाशिकच्या रुग्णालयापाठोपाठ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू विशेष उपचार कक्षात इन्क्युबेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत अत्यवस्थ असलेल्या ७३८ नवजात बालकांपैकी ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचीही गंभीर बाब उघडकीस आली आहे. या काळात ३६ बालकांना मुंबईतील रुग्णालयात पाठवल्याचे उघड झाले.ठाणे जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या उपचारासाठी नवजात शिशू विशेष उपचार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अत्यवस्थ नवजात अर्भकांवर उपचार करता यावेत, यासाठी वैद्यकीय उपकरणांनी हा विभाग सज्ज ठेवण्यात येतो. जन्मत:च कावीळ असलेली, श्वसनक्रियेस त्रास होत असलेली तसेच वजन कमी असलेली बालके, अपुºया दिवसांच्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवणे अपरिहार्य ठरते. येथील एनआयसीयूमध्ये १६ इन्क्युबेटर असून एका इन्क्युबेटरमध्ये एकच बाळ ठेवणे बंधनकारक असते. परंतु, अत्यवस्थ नवजात अर्भकांची संख्या अधिक असल्याने एकेका इन्क्युबेटरमध्ये अनेकदा दोन ते तीन बालकांना ठेवले जात असल्याचे विदारक चित्र आहे.अर्भकांची प्रतिकारकशक्ती अत्यंत कमी असते. त्यामुळे एकाच पेटीत अनेक बाळांना ठेवले जात असल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो.जिल्हा सामान्य रूग्णालय सार्वजनिक आरोग्य द्वितीय श्रेणीत मोडते. त्यामुळे येथे व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही. नवजात शिशू विशेष उपचार कक्षातील गंभीर झालेल्या बालकांना जर व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली, तर त्यांना त्या अवस्तेच मुंबईला पाठवावे लागते. अनेकदा या फरफटीत आधीच प्रकृती नाजूक असलेली ही बालके दगावतात. पण ठाण्यासारख्या स्मार्ट होऊ घातलेल्या शहरात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने या मुलांचा तडफडून होणारा मृत्यू पाहण्याखेरीज पालकांच्या काहीच हाती उरत नाही.लोकप्रतिनिधी निद्रिस्त असल्याने संतापठाणे जिल्ह्यातून तीन खासदार, विधानसभेचे १८ आणि विधान परिषदेचे ६ असे २४ आमदार आहेत. मात्र, हे लोकप्रतिनिधी कुपोषणाने बळी जाणाºया बालकांविषयी जेवढे निद्रिस्त आहेत, तेवढेच सामान्य रुग्णालयात इन्क्युबेटरअभावी मृत्यू झालेल्या ४७ बालकांबाबतीतही असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.