शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

४६० झाडांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:35 IST

पुनर्रोपणाचा मार्ग खडतर : ठामपाच्या वृक्ष प्राधिकरणकडे प्रस्ताव

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे वृक्षतोडीचे चार प्रस्ताव दाखल झाले असून त्यानुसार जवळपास ४६० वृक्षांवर कुºहाड चालवली जाणार आहे. पुनर्रोपणाच्या नावाखाली वृक्षतोडीला परवानगी देण्याचे प्रकार पालिकेत सुरूच आहेत. आधीच तीन हजारांपेक्षा अधिक झाडांच्या पुनर्रोपणाचा तिढा सुटलेला नसताना आता आणखी ४६० झाडांची भर पडणार आहे. तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावायची कुठे, याबाबत पालिका प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.

कौसा येथील जोडरस्त्यांच्या कामांमध्ये २,८७४, कोपरी रुंदीकरणाच्या कामात २४२, तर मेट्रोच्या कामात एक हजारांपेक्षा अधिक झाडांची कत्तल होणार आहे. ही झाडे लावायची कुठे, याबाबत अजूनही पालिका प्रशासनाचे निश्चित धोरण नाही. कौसा जोडरस्त्याच्या कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करायचे की, आणखी काय करायचे, याबाबतदेखील वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे ही सर्व झाडे लावायची कुठे, हा तिढा सुटलेला नसताना आता तब्बल ४६० वृक्षतोडीचे प्रस्ताव विकासकांच्या मध्यातून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे दाखल झाले आहेत. दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत तीन रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. कल्याणफाटा दत्त मंदिर ते २५ मीटर डीपी रस्त्यापर्यंत ३० मीटर रु ंद डीपी रस्त्याचे काम केले जाणार आहे. दुसरा कल्याण-शीळ रस्त्यापासून घनकचरा प्रक्रि या केंद्राकरिता राखीव असणाºया भूखंडाकडे जाणाºया २५ मीटर रुंद डीपी रस्ता, तर तिसरा मिनार रेसिडेन्सी ते कल्याण-शीळ रोडपर्यंत २५ आणि ४५ मीटर रु ंद डीपी रस्ता अशा तीन रस्त्यांमध्ये ३२३ वृक्ष बाधित होणार आहेत. त्या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असून ४८ वृक्ष तोडले जाणार आहेत.

दुसरा प्रस्ताव मे. ओमकार डेव्हलपर्स यांच्याकडून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे आला असून यामध्ये २० वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शीळ येथील सेक्टर ११ सर्व्हे नं. २८ या ठिकाणी विकास करण्याचा हा प्रस्ताव आहे. तिसरा प्रस्ताव माजिवडा येथील मे. डिझाइन कन्सोटियन यांच्याकडून आला असून या विकासकामांमध्ये जवळपास ११ वृक्षांचे पुनर्रोपण, तर दोन वृक्ष तोडले जाणार आहेत. चौथा प्रस्ताव रेमण्ड कंपनीकडून दाखल करण्यात आला असून यामध्ये ४५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून सहा झाडे तोडली जाणार आहेत.२३00 वृक्षांचे करावे लागणार पुनर्रोपणमाजिवडा येथे एक धोकादायक वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव दाखल झाला असून एकूण ४६० झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.यापूर्वी विविध कारणांनी तोडलेल्या वृक्षांच्या पुनर्रोपणाचा मार्ग खडतर असताना नव्याने तोडल्या जाणाºया वृक्षांचे पुनर्रोपण कशा पद्धतीने, कुठे आणि केव्हा केले जाणार, हा मोठा प्रश्न वृक्ष प्राधिकरण विभागाला पडला आहे.एका झाडाच्या मोबदल्यात पाच नवीन वृक्षलागवड करणे, असे धोरण आहे. त्यानुसार, ४६० वृक्षांच्या बदल्यात २३०० वृक्ष पालिकेला लावावे लागणार आहेत. हे काम पालिका तेवढ्या गांभीर्याने करणार आहे का, हा प्रश्नच आहे.