शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
2
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
3
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
4
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
5
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
6
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
7
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
8
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
9
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
10
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
11
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
12
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
13
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
14
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
15
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
16
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
17
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
18
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
19
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
20
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
Daily Top 2Weekly Top 5

४६० झाडांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:35 IST

पुनर्रोपणाचा मार्ग खडतर : ठामपाच्या वृक्ष प्राधिकरणकडे प्रस्ताव

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे वृक्षतोडीचे चार प्रस्ताव दाखल झाले असून त्यानुसार जवळपास ४६० वृक्षांवर कुºहाड चालवली जाणार आहे. पुनर्रोपणाच्या नावाखाली वृक्षतोडीला परवानगी देण्याचे प्रकार पालिकेत सुरूच आहेत. आधीच तीन हजारांपेक्षा अधिक झाडांच्या पुनर्रोपणाचा तिढा सुटलेला नसताना आता आणखी ४६० झाडांची भर पडणार आहे. तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावायची कुठे, याबाबत पालिका प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.

कौसा येथील जोडरस्त्यांच्या कामांमध्ये २,८७४, कोपरी रुंदीकरणाच्या कामात २४२, तर मेट्रोच्या कामात एक हजारांपेक्षा अधिक झाडांची कत्तल होणार आहे. ही झाडे लावायची कुठे, याबाबत अजूनही पालिका प्रशासनाचे निश्चित धोरण नाही. कौसा जोडरस्त्याच्या कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करायचे की, आणखी काय करायचे, याबाबतदेखील वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे ही सर्व झाडे लावायची कुठे, हा तिढा सुटलेला नसताना आता तब्बल ४६० वृक्षतोडीचे प्रस्ताव विकासकांच्या मध्यातून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे दाखल झाले आहेत. दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत तीन रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. कल्याणफाटा दत्त मंदिर ते २५ मीटर डीपी रस्त्यापर्यंत ३० मीटर रु ंद डीपी रस्त्याचे काम केले जाणार आहे. दुसरा कल्याण-शीळ रस्त्यापासून घनकचरा प्रक्रि या केंद्राकरिता राखीव असणाºया भूखंडाकडे जाणाºया २५ मीटर रुंद डीपी रस्ता, तर तिसरा मिनार रेसिडेन्सी ते कल्याण-शीळ रोडपर्यंत २५ आणि ४५ मीटर रु ंद डीपी रस्ता अशा तीन रस्त्यांमध्ये ३२३ वृक्ष बाधित होणार आहेत. त्या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असून ४८ वृक्ष तोडले जाणार आहेत.

दुसरा प्रस्ताव मे. ओमकार डेव्हलपर्स यांच्याकडून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे आला असून यामध्ये २० वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शीळ येथील सेक्टर ११ सर्व्हे नं. २८ या ठिकाणी विकास करण्याचा हा प्रस्ताव आहे. तिसरा प्रस्ताव माजिवडा येथील मे. डिझाइन कन्सोटियन यांच्याकडून आला असून या विकासकामांमध्ये जवळपास ११ वृक्षांचे पुनर्रोपण, तर दोन वृक्ष तोडले जाणार आहेत. चौथा प्रस्ताव रेमण्ड कंपनीकडून दाखल करण्यात आला असून यामध्ये ४५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून सहा झाडे तोडली जाणार आहेत.२३00 वृक्षांचे करावे लागणार पुनर्रोपणमाजिवडा येथे एक धोकादायक वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव दाखल झाला असून एकूण ४६० झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.यापूर्वी विविध कारणांनी तोडलेल्या वृक्षांच्या पुनर्रोपणाचा मार्ग खडतर असताना नव्याने तोडल्या जाणाºया वृक्षांचे पुनर्रोपण कशा पद्धतीने, कुठे आणि केव्हा केले जाणार, हा मोठा प्रश्न वृक्ष प्राधिकरण विभागाला पडला आहे.एका झाडाच्या मोबदल्यात पाच नवीन वृक्षलागवड करणे, असे धोरण आहे. त्यानुसार, ४६० वृक्षांच्या बदल्यात २३०० वृक्ष पालिकेला लावावे लागणार आहेत. हे काम पालिका तेवढ्या गांभीर्याने करणार आहे का, हा प्रश्नच आहे.