शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अतिवृष्टीग्रस्तांना ४५.५९ कोटींचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका ठाणे, पालघरसह संपूर्ण राज्याला बसला होता. यात शेतपिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका ठाणे, पालघरसह संपूर्ण राज्याला बसला होता. यात शेतपिकांच्या नुकसानीसह घरे, दारे, गुरे, ढोरे यासह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. अखेर दोन महिन्यांनी का होईना महाविकास आघाडी सरकारने या अतिवृष्टींग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा पहिला हप्ता गुरुवारी वितरित केला. यात ठाणे जिल्ह्याला ४२ कोटी ९० लाख ९४ हजार तर पालघर जिल्ह्याला दोन कोटी ६८ लाख ४४ हजार अशी ४५ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपयांची मदत दिली आहे.

अतिवृष्टीनंतर जिल्हा प्रशासनाने त्वरित पंचनामे करून त्याचा अहवाल कोकण विभागीय आयुक्तांना पाठविला होता. परंतु, दोन महिने झाले तरी शासनाकडून मदत न आल्याने अतिवृष्टीग्रस्त हवालदिल झाले होते. कारण यात अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. परंतु, आता ही मदत आल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत ठाणे जिल्ह्यात दोन हजार ९०८ शेतकऱ्यांच्या ७८२ हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. याशिवाय १६४ घरांची पडझड झाली. यामध्ये १५१ निवासी घरांचा समावेश आहे. यात पक्क्या घरांसह कच्च्या घरांचा आणि झोपड्यांचा समावेश आहे. तसेच गाई, म्हशींचे १३ गोठे उदध्वस्त झाले आहेत.

१८,५३८ कुटुंबीयांना केले स्थलांतरित

- ठाणे शहर, दिवा, कल्याण-डोंबिवली, मुरबाड, अंबरनाथ-बदलापूर परिसरात सखल भागात साचलेले पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या कालावधीत दोन ते तीन दिवस जिल्ह्यातील ३१ ठिकाणांच्या १८ हजार ५३८ कुटुंबीयांना स्थलांतरित करावे लागले होते.

- जिल्ह्यात सर्वाधिक कल्याण तालुक्यातील सहा ठिकाणी १४ हजार ९८८ कुटुंबीयांची परवड झाली होती. अंबरनाथ तालुक्यातील चार ठिकाणांची तीन हजार ३१ कुटुंबे आणि शहापूर तालुक्यातील २० ठिकाणी ५१८ कुटुंबीयांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. या रहिवाशांच्या घरातील चीजवस्तू, भांडी यांचे मोठे नुकसान झाले होते.

---------------