शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

४५ वॉर्डन देऊनही कोंडी कायम : उल्हासनगर पालिकेचा पगारावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:26 IST

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना ४५ वॉर्डन दिले. पण, शहरातील कोंडी काही सुटली नाही. उलट, त्यांच्याविरोधात तक्रारी येत होत्या. वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये पालिका खर्च करते. पण, कोंडीची परिस्थिती जैसे थे असल्याने सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी वॉर्डन देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्याची विनंती स्थायी समितीला केली.

 - सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना ४५ वॉर्डन दिले. पण, शहरातील कोंडी काही सुटली नाही. उलट, त्यांच्याविरोधात तक्रारी येत होत्या. वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये पालिका खर्च करते. पण, कोंडीची परिस्थिती जैसे थे असल्याने सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी वॉर्डन देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्याची विनंती स्थायी समितीला केली. यावर, एकमत होऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कोंडी सोडवण्याचे काम वाहतूक पोलिसांचे असून त्यात अपयशी झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे पुरस्वानी यांनी सांगितले.उल्हासनगरमधील नागरिक वाहतूककोंडीने हैराण झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत वाहतूक पोलिसांना सुरुवातीला २५ व नंतर २० असे एकूण ४५ वॉर्डन दिले. तसेच जॅमरसह इतर साहित्य दिले. वाहतूक पोलिसांच्या मदतीला ४५ वॉर्डन दिल्याने वाहतूककोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, वॉर्डनसह वाहतूक पोलीस शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यात पोलीस अपयशी ठरले. कोंडी सुटण्याऐवजी दंडाच्या पावत्या फाडणे, वसुली करणे आदी प्रकार घडू लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेला केल्याचे पुरस्वानी यांनी सांगितले.महापालिका वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये खर्च करते. मात्र, कोंडी जैसे थे असल्याच्या तक्रारीत वाढ झाली. पुरस्वानी यांनी स्थायी समिती सदस्यांसमोर वॉर्डनचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. लाखो रुपये खर्च करूनही वाहतूककोंडी सुटत नाही. मग, वाहतूक पोलिसांच्या मदतीला वॉर्डन कशाला, अशी भूमिका घेतली.स्थायी समितीच्या सर्वच सदस्यांनी पुरस्वानी यांच्या मताशी संमती दर्शवत वॉर्डनचा विषय सर्वमतांनी नामंजूर केला. कोंडी सोडवण्याचे काम शहर वाहतूक पोलिसांचे आहे. त्यांनी कोंडी न सोडल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया पुरस्वानी यांच्यासह महापौर मीना आयलानी, प्रकाश माखिजा यांनी दिली आहे. यामुळे कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सर्वाधिक वाहतूककोंडीची ठिकाणेशहरातील जपानी व गजानन मार्केट रस्ता, शिरू चौक, नेहरू चौक, शिवाजी चौक, १७ सेक्शन, फॉरवर्ड लाइन चौक, कॅम्प नं १ ते ५ परिसरातील मुख्य रस्ते, व्हीनस चौक, पवई चौक, शहाड फाटक रस्ता, उल्हासनगर पोलीस ठाणे रस्ता, मध्यवर्ती रुग्णालयासमोरील रस्ता ही वाहतूककोंडीची नेहमीची ठिकाणे झाली आहेत.शहरातील वाहतुकीला शिस्त नसल्याने येथील पादचाºयांना ये-जा करताना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच आता हे वॉर्डन काढून घेतल्याने कोंडीमध्ये अधिकच भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.