शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

४५ वॉर्डन देऊनही कोंडी कायम : उल्हासनगर पालिकेचा पगारावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:26 IST

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना ४५ वॉर्डन दिले. पण, शहरातील कोंडी काही सुटली नाही. उलट, त्यांच्याविरोधात तक्रारी येत होत्या. वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये पालिका खर्च करते. पण, कोंडीची परिस्थिती जैसे थे असल्याने सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी वॉर्डन देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्याची विनंती स्थायी समितीला केली.

 - सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना ४५ वॉर्डन दिले. पण, शहरातील कोंडी काही सुटली नाही. उलट, त्यांच्याविरोधात तक्रारी येत होत्या. वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये पालिका खर्च करते. पण, कोंडीची परिस्थिती जैसे थे असल्याने सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी वॉर्डन देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्याची विनंती स्थायी समितीला केली. यावर, एकमत होऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कोंडी सोडवण्याचे काम वाहतूक पोलिसांचे असून त्यात अपयशी झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे पुरस्वानी यांनी सांगितले.उल्हासनगरमधील नागरिक वाहतूककोंडीने हैराण झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत वाहतूक पोलिसांना सुरुवातीला २५ व नंतर २० असे एकूण ४५ वॉर्डन दिले. तसेच जॅमरसह इतर साहित्य दिले. वाहतूक पोलिसांच्या मदतीला ४५ वॉर्डन दिल्याने वाहतूककोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, वॉर्डनसह वाहतूक पोलीस शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यात पोलीस अपयशी ठरले. कोंडी सुटण्याऐवजी दंडाच्या पावत्या फाडणे, वसुली करणे आदी प्रकार घडू लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेला केल्याचे पुरस्वानी यांनी सांगितले.महापालिका वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये खर्च करते. मात्र, कोंडी जैसे थे असल्याच्या तक्रारीत वाढ झाली. पुरस्वानी यांनी स्थायी समिती सदस्यांसमोर वॉर्डनचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. लाखो रुपये खर्च करूनही वाहतूककोंडी सुटत नाही. मग, वाहतूक पोलिसांच्या मदतीला वॉर्डन कशाला, अशी भूमिका घेतली.स्थायी समितीच्या सर्वच सदस्यांनी पुरस्वानी यांच्या मताशी संमती दर्शवत वॉर्डनचा विषय सर्वमतांनी नामंजूर केला. कोंडी सोडवण्याचे काम शहर वाहतूक पोलिसांचे आहे. त्यांनी कोंडी न सोडल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया पुरस्वानी यांच्यासह महापौर मीना आयलानी, प्रकाश माखिजा यांनी दिली आहे. यामुळे कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सर्वाधिक वाहतूककोंडीची ठिकाणेशहरातील जपानी व गजानन मार्केट रस्ता, शिरू चौक, नेहरू चौक, शिवाजी चौक, १७ सेक्शन, फॉरवर्ड लाइन चौक, कॅम्प नं १ ते ५ परिसरातील मुख्य रस्ते, व्हीनस चौक, पवई चौक, शहाड फाटक रस्ता, उल्हासनगर पोलीस ठाणे रस्ता, मध्यवर्ती रुग्णालयासमोरील रस्ता ही वाहतूककोंडीची नेहमीची ठिकाणे झाली आहेत.शहरातील वाहतुकीला शिस्त नसल्याने येथील पादचाºयांना ये-जा करताना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच आता हे वॉर्डन काढून घेतल्याने कोंडीमध्ये अधिकच भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.