शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

४५ हजार गावे अजूनही पुस्तकांपासून दूर

By admin | Updated: June 1, 2017 05:03 IST

ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही पुस्तक या शब्दापासून कोसो दूर असल्याची खंत ज्येष्ठ अभ्यासक, ग्रंथसखा श्याम जोशी यांनी व्यक्त केली. व्यास क्रिएशन्स आणि वंदे मातरम् संघ आयोजित पुस्तक आदानप्रदान महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. या वेळी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून जोशी बोलत होते. ते म्हणाले की, ग्रंथदान करणे ही सुसंस्कृत आणि सभ्यपणाची पहिली पायरी आहे. विकासकामे होत राहतात. समाज बदलत राहतो, तरीही मनुष्याचे जगण्याचे नेमके प्रयोजन काय, हे शिकवणारी प्रत्यक्ष कार्यशाळा म्हणजे हा ग्रंथांचा आदानप्रदान महोत्सव. व्यास क्रिएशन्सने आयोजित केलेला हा महोत्सव म्हणजे वाचन संस्कृती वाढवण्याच्या कार्यातील मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले. पुस्तक रद्दीमध्ये देणे, हे अमानुषपणाचे लक्षण आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांनी आपल्या मुलांसाठी आणलेली पुस्तके रद्दीत देणे, हे संवेदनाहीन समाजाचे लक्षण आहे. देशाचे पहिले कर्तव्य म्हणजे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक तयार करणे. हे कार्य केवळ ग्रंथवाचनाने होते. म्हणून, या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले. वंदे मातरम् संघाचे अध्यक्ष संदीप लेले म्हणाले की, प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक संपन्नता असतेच. परंतु, प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय असणे, ही खरी सुबत्ता आहे. घरातील एक खोली संस्कार म्हणून ग्रंथांसाठी ठेवावी. बांधकाम व्यावसायिकांनी अशी खास सोय करावी. या महोत्सवामुळे वाचन संस्कृती वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. या महोत्सवात रसिक वाचकांनी देणगी स्वरूपात दिलेली पुस्तके भिलार या पुस्तकांच्या गावाला लोकार्पण करण्यात येतील, असे व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड यांनी सांगितले. या वेळी ग्रंथप्रेमींनी काही पुस्तके प्रातिनिधिक स्वरूपात भिलार या पुस्तकांच्या गावाला देणगी स्वरूपात जोशी यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी समीक्षक श्रीराम बोरकर, नाटककार शशिकांत कोनकर, पत्रकार श्री.वा. नेर्लेकर उपस्थित होते.