शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार गावे अजूनही पुस्तकांपासून दूर

By admin | Updated: June 1, 2017 05:03 IST

ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही पुस्तक या शब्दापासून कोसो दूर असल्याची खंत ज्येष्ठ अभ्यासक, ग्रंथसखा श्याम जोशी यांनी व्यक्त केली. व्यास क्रिएशन्स आणि वंदे मातरम् संघ आयोजित पुस्तक आदानप्रदान महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. या वेळी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून जोशी बोलत होते. ते म्हणाले की, ग्रंथदान करणे ही सुसंस्कृत आणि सभ्यपणाची पहिली पायरी आहे. विकासकामे होत राहतात. समाज बदलत राहतो, तरीही मनुष्याचे जगण्याचे नेमके प्रयोजन काय, हे शिकवणारी प्रत्यक्ष कार्यशाळा म्हणजे हा ग्रंथांचा आदानप्रदान महोत्सव. व्यास क्रिएशन्सने आयोजित केलेला हा महोत्सव म्हणजे वाचन संस्कृती वाढवण्याच्या कार्यातील मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले. पुस्तक रद्दीमध्ये देणे, हे अमानुषपणाचे लक्षण आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांनी आपल्या मुलांसाठी आणलेली पुस्तके रद्दीत देणे, हे संवेदनाहीन समाजाचे लक्षण आहे. देशाचे पहिले कर्तव्य म्हणजे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक तयार करणे. हे कार्य केवळ ग्रंथवाचनाने होते. म्हणून, या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले. वंदे मातरम् संघाचे अध्यक्ष संदीप लेले म्हणाले की, प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक संपन्नता असतेच. परंतु, प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय असणे, ही खरी सुबत्ता आहे. घरातील एक खोली संस्कार म्हणून ग्रंथांसाठी ठेवावी. बांधकाम व्यावसायिकांनी अशी खास सोय करावी. या महोत्सवामुळे वाचन संस्कृती वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. या महोत्सवात रसिक वाचकांनी देणगी स्वरूपात दिलेली पुस्तके भिलार या पुस्तकांच्या गावाला लोकार्पण करण्यात येतील, असे व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड यांनी सांगितले. या वेळी ग्रंथप्रेमींनी काही पुस्तके प्रातिनिधिक स्वरूपात भिलार या पुस्तकांच्या गावाला देणगी स्वरूपात जोशी यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी समीक्षक श्रीराम बोरकर, नाटककार शशिकांत कोनकर, पत्रकार श्री.वा. नेर्लेकर उपस्थित होते.