शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
4
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
5
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
6
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
7
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
8
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
9
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
10
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
11
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
12
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
13
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
14
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
15
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
16
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
17
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
18
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
19
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
20
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार

४५ हजार गावे अजूनही पुस्तकांपासून दूर

By admin | Updated: June 1, 2017 05:03 IST

ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही पुस्तक या शब्दापासून कोसो दूर असल्याची खंत ज्येष्ठ अभ्यासक, ग्रंथसखा श्याम जोशी यांनी व्यक्त केली. व्यास क्रिएशन्स आणि वंदे मातरम् संघ आयोजित पुस्तक आदानप्रदान महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. या वेळी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून जोशी बोलत होते. ते म्हणाले की, ग्रंथदान करणे ही सुसंस्कृत आणि सभ्यपणाची पहिली पायरी आहे. विकासकामे होत राहतात. समाज बदलत राहतो, तरीही मनुष्याचे जगण्याचे नेमके प्रयोजन काय, हे शिकवणारी प्रत्यक्ष कार्यशाळा म्हणजे हा ग्रंथांचा आदानप्रदान महोत्सव. व्यास क्रिएशन्सने आयोजित केलेला हा महोत्सव म्हणजे वाचन संस्कृती वाढवण्याच्या कार्यातील मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले. पुस्तक रद्दीमध्ये देणे, हे अमानुषपणाचे लक्षण आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांनी आपल्या मुलांसाठी आणलेली पुस्तके रद्दीत देणे, हे संवेदनाहीन समाजाचे लक्षण आहे. देशाचे पहिले कर्तव्य म्हणजे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक तयार करणे. हे कार्य केवळ ग्रंथवाचनाने होते. म्हणून, या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले. वंदे मातरम् संघाचे अध्यक्ष संदीप लेले म्हणाले की, प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक संपन्नता असतेच. परंतु, प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय असणे, ही खरी सुबत्ता आहे. घरातील एक खोली संस्कार म्हणून ग्रंथांसाठी ठेवावी. बांधकाम व्यावसायिकांनी अशी खास सोय करावी. या महोत्सवामुळे वाचन संस्कृती वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. या महोत्सवात रसिक वाचकांनी देणगी स्वरूपात दिलेली पुस्तके भिलार या पुस्तकांच्या गावाला लोकार्पण करण्यात येतील, असे व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड यांनी सांगितले. या वेळी ग्रंथप्रेमींनी काही पुस्तके प्रातिनिधिक स्वरूपात भिलार या पुस्तकांच्या गावाला देणगी स्वरूपात जोशी यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी समीक्षक श्रीराम बोरकर, नाटककार शशिकांत कोनकर, पत्रकार श्री.वा. नेर्लेकर उपस्थित होते.