शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘श्री ४२०’कडून घरांकरिता लूट; ५०० रुपयांत पंतप्रधान आवास योजनेत निवाऱ्याचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 02:50 IST

योजनेनुसार ज्या काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत, त्यांची पूर्तता ठाण्यात होणे अशक्यच आहे. त्यामुळे ही योजना कितपत यशस्वी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाणार आहे. तिचा लाभ घेण्यासाठी पालिकेने आॅनलाइन अर्ज मागविले होते; परंतु शहरातील काही भागात ठाणेकरांकडून ते भरून पालिका ५०० रुपयात घरे देणार असल्याचे सांगून लुट सुरू असल्याची धक्कादायक माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी उघड केली; परंतु या योजनेनुसार ज्या काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत, त्यांची पूर्तता ठाण्यात होणे अशक्यच आहे. त्यामुळे ही योजना कितपत यशस्वी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात गृहनिर्माण विभाग, महाराष्टÑ शासन व ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लाभार्थी नेतृत्त्व बांधकाम (नवीन- विस्तारीकरण) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत म्हस्के यांनी हा गौप्यस्फोट केला. लाभार्थ्यांचे जे उत्पन्न गट दाखविण्यात आले आहेत, त्यात तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नाची अट टाकली आहे. परंतु, तिची पूर्तता होऊच शकत नसल्याचे त्यांनी सांगून यासाठी उत्पन्नाचा निकष वाढवावा शासनाकडे यासाठी ठाणे महापालिकेनेमागणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पालिकेने आॅनलाइन मागविलेल्या अर्जात आतापर्यंत १५ हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली; परंतु प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये किती जणांनी अटी आणि शर्तीची पूर्तता करून अर्ज भरले आहेत, असा सवाल नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला. यातील बहुसंख्य नागरिकांनी अटी आणि शर्ती न वाचताच अर्ज केल्याने किती जण पात्र होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु,या अर्जांची छाननी केली जाणार असून वेळ पडल्यास नगरसेवकांच्या माध्यमातून अर्ज अशा लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी स्पष्ट केले. पालिकेने आॅनलाइन अर्ज मागविले असतांना काही ठिकाणी याचे बेकायदेशीर दुकान थाटण्यात आले असून अर्ज भरण्यासाठी ५०० रुपये लाटले जात असल्याची धक्कादायक माहिती या वेळी म्हस्के यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. अशा प्रकारे ५०० रुपयात पालिका घर देते, म्हणून अनेक ठिकाणी रांगा लागल्याचेही त्यांनी सांगितले.जे कोणी अशा पध्दतीने पालिकेची फसवणूक करीत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.योजनेचा फायदा होणे अशक्यचठाण्यात एकतर स्लम एरिया आहे, तर दुसरीकडे अनधिकृत आणि अधिकृत इमारती आहेत. केवळ गावठाण आणि कोळीवाड्यांमध्येच घरे मोठी असून ती नागरिकांच्या स्वत:च्या नावावर आहेत. त्यामुळे त्यांना याचा लाभ होणे शक्य नाही.त्यामुळे शहरातील अधिकृत इमारतीमध्ये वाढीव बांधकाम कसे करणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शिवाय ३०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना याचा लाभ होणार असून उत्पन्न तीन लाखापर्यंत अपेक्षित धरण्यात आले आहे.त्यामुळे अधिकृत इमारतीमधील किती नागरिकांना याचा लाभ होणार याचे उत्तर तूर्तास पालिकेकडे नाही. एकूणच यावर उपाय म्हणून पालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव तयार येऊन अधिकृत इमारतीमध्ये वास्तव्य करणाºयांचे किचन आणि टॉयलेटमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.यांना होणार यायोजनेचा फायदाप्रधानमंत्री आवास योजनेत पहिल्या टप्प्यात लाभार्थीचे स्वत:चे घर असणे अपेक्षित असून ते ३०० चौरस फुटांचे असावे, त्याचे उत्पन्न हे तीन लाख असणे अपेक्षित आहे. अशांना त्यांचे घर वाढवायचे झाल्यास त्यासाठी अडीच लाखांची मदत दिली जाणार आहे. यामध्ये केंद्र शासनाकडून दीड लाख आणि राज्य शासनाकडून एक लाखांची, अशी अडीच लाखांची मदत दिली जाणार आहे.दुसºया टप्प्यात स्लमचा केलाजाणार विकासदुसºया टप्प्यात अनधिकृत बांधकामात वास्तव्य करणाºया झोपडपट्टीत राहणाºयांसाठी ही योजना राबविली जाणार असून यामध्येदेखील केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान पालिकेला मिळणार आहे. त्यानुसार दुसºया टप्प्यात स्लमधील रहिवाशांना हक्काची घरे मिळणार आहेत.

टॅग्स :thaneठाणे