शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

४१ सदस्यांचे समर्थन आवश्यक

By admin | Updated: March 7, 2016 02:23 IST

परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची व्यूहरचना विरोधकांनी पूर्ण केली असली, तरी अपुऱ्या संख्याबळाच्या आधारावर ते तोंडघशी पडण्याची शक्यता आहे

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची व्यूहरचना विरोधकांनी पूर्ण केली असली, तरी अपुऱ्या संख्याबळाच्या आधारावर ते तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील ही जोडगोळी सध्या एकत्र आहे. या दिग्गज नेत्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणता सदस्य करेल असे सध्या तरी चित्र दिसत नाही. त्यामुळे दोन तृतीयांश सदस्यांचा आकडा गाठणे विरोधकांना मुश्कील असल्याचे दिसून येते.शिवसेना हा सध्या जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर फेकला गेला आहे. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी सत्ता असावी असे शिवसेनेला वाटत आहे. यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले महेंद्र दळवी, अ‍ॅड. राजीव साबळे यांना सर्वाधिक सत्तेची स्वप्ने पडत असल्याचे राजकीय हालचालींवरुन दिसून येते. शिवसेनेचे १६ सदस्य असून त्यामध्ये आता महेंद्र दळवी, राजीव साबळे, कविता गायकवाड, शामकांत भोकरे यांची साथ लाभली आहे. त्याचप्रमाणे अन्य नाराज सदस्य संपर्कात असून ते किती आहेत हे दळवी यांनी सांगितले नाही.अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन दुग्धविकास, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य, समाज कल्याण अशी सभापती पदे शिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस-शेकापकडे आहेत. निवडून आलेल्या महत्वाच्या सदस्यांना किमान सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ देण्याचा अलिखित करार दोन्ही पक्ष नेतृत्वाने केला होता. त्याची मुदतही कधीच संपलेली आहे, असे नाराज सदस्य सांगत आहेत. त्यामुळे मुदत संपलेली असताना नवीन निवडी का जाहीर केल्या जात नाहीत, असा प्रश्न नाराज सदस्यांकडून केला जातआहेत.यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन पक्षप्रतोद शामकांत भोकरे आणि शुभदा तटकरे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीची अपेक्षा होती, तसेच अन्य काही सदस्यांना सभापतीपदाची आस असल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे शेकापचे पनवेल येथील एकनाथ देशेकर हेही उपाध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत आणि त्यामुळे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेला ते शिवसेनेच्या गोटात जाऊन बसल्याचे दिसून आले. शेकापच्या अन्य काही सदस्यांनाही सभापतीपद मिळावे असे दिसून येते.या नाराज सदस्यांना एकत्र बांधण्याचे काम महेंद्र दळवी आणि अ‍ॅड.राजीव साबळे करीत आहेत. नुकतीच पार पडलेली सर्वसाधारण सभा आटोपल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सदस्यांसह शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठकही घेतली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांची आवश्यकता आहे.