शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

४१ सदस्यांचे समर्थन आवश्यक

By admin | Updated: March 7, 2016 02:23 IST

परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची व्यूहरचना विरोधकांनी पूर्ण केली असली, तरी अपुऱ्या संख्याबळाच्या आधारावर ते तोंडघशी पडण्याची शक्यता आहे

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची व्यूहरचना विरोधकांनी पूर्ण केली असली, तरी अपुऱ्या संख्याबळाच्या आधारावर ते तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील ही जोडगोळी सध्या एकत्र आहे. या दिग्गज नेत्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणता सदस्य करेल असे सध्या तरी चित्र दिसत नाही. त्यामुळे दोन तृतीयांश सदस्यांचा आकडा गाठणे विरोधकांना मुश्कील असल्याचे दिसून येते.शिवसेना हा सध्या जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर फेकला गेला आहे. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी सत्ता असावी असे शिवसेनेला वाटत आहे. यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले महेंद्र दळवी, अ‍ॅड. राजीव साबळे यांना सर्वाधिक सत्तेची स्वप्ने पडत असल्याचे राजकीय हालचालींवरुन दिसून येते. शिवसेनेचे १६ सदस्य असून त्यामध्ये आता महेंद्र दळवी, राजीव साबळे, कविता गायकवाड, शामकांत भोकरे यांची साथ लाभली आहे. त्याचप्रमाणे अन्य नाराज सदस्य संपर्कात असून ते किती आहेत हे दळवी यांनी सांगितले नाही.अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन दुग्धविकास, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य, समाज कल्याण अशी सभापती पदे शिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस-शेकापकडे आहेत. निवडून आलेल्या महत्वाच्या सदस्यांना किमान सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ देण्याचा अलिखित करार दोन्ही पक्ष नेतृत्वाने केला होता. त्याची मुदतही कधीच संपलेली आहे, असे नाराज सदस्य सांगत आहेत. त्यामुळे मुदत संपलेली असताना नवीन निवडी का जाहीर केल्या जात नाहीत, असा प्रश्न नाराज सदस्यांकडून केला जातआहेत.यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन पक्षप्रतोद शामकांत भोकरे आणि शुभदा तटकरे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीची अपेक्षा होती, तसेच अन्य काही सदस्यांना सभापतीपदाची आस असल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे शेकापचे पनवेल येथील एकनाथ देशेकर हेही उपाध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत आणि त्यामुळे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेला ते शिवसेनेच्या गोटात जाऊन बसल्याचे दिसून आले. शेकापच्या अन्य काही सदस्यांनाही सभापतीपद मिळावे असे दिसून येते.या नाराज सदस्यांना एकत्र बांधण्याचे काम महेंद्र दळवी आणि अ‍ॅड.राजीव साबळे करीत आहेत. नुकतीच पार पडलेली सर्वसाधारण सभा आटोपल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सदस्यांसह शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठकही घेतली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांची आवश्यकता आहे.