शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

४०० पटीने जास्त दंड आकारण्याचा इशारा

By admin | Updated: March 14, 2017 01:57 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवर असलेल्या निवासी भागातील काही सोसायट्यांनी पुनर्विकास व कर्ज काढण्यासाठी अंतिम भाडेकरारासाठी

डोंबिवली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवर असलेल्या निवासी भागातील काही सोसायट्यांनी पुनर्विकास व कर्ज काढण्यासाठी अंतिम भाडेकरारासाठी महामंडळाकडे अर्ज केला असता मुद्रांक शुल्क विभागाने सोसायट्यांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यात मुद्रांक शुल्काची रक्कम ४०० पट्टीने जास्त लावली आहे. ही रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, अशी तंबी मुंद्राक शुल्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अंतिम भाडेकरारासाठी अर्ज करणाऱ्या सोसायट्या धास्तावल्या आहेत.निवासी परिसरातील ५०० सोसायट्या या एमआयडीसीच्या जागेवर आहेत. त्यापैकी जवळपास ४०० च्या आसपास सोसयट्यांनी अंतिम भाडेकरारासाठी महामंडळाच्या कार्यालयाकडे अर्ज केले आहे. सोसायट्यांना पुनर्विकास करायचा असल्यास किंवा कर्ज काढावयाचे असल्यास अंतिम भाडेकरार असणे आवश्यक असतो. नियमामुसार, या सोसायट्या विकसित करणाऱ्या बिल्डरांनीही अंतिम भाडेकरार करणे आवश्यक आहे. मात्र, अंतिम भाडेकरारासाठी आता बिल्डर आहेत कुठे? त्यामुळे या प्रक्रियेसाठी सोसायट्यांनीच एमआयडीसीकडे अर्ज केला आहे. परंतु, एमआयडीसीने मुद्रांक शुल्क भरण्यास सांगितले आहे. त्यासाठी सोसायट्यांचे प्रकरण मुद्रांक शुल्क अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहेत. अंतिम भाडेकरार केल्याशिवाय ती जागा सोसायटीच्या नावे होत नाही. अंतिम कराराअभावी सोसायटीत राहणाऱ्यांना कर्जासाठी कागदपत्रे सादर करता येत नाहीत. त्यांच्या कर्ज प्रकरणाला अडसर निर्माण होतो. एखाद्या सोसायटीचे मूल्य हे ३० लाख असल्यास त्याला २ लाख ४८ हजारांचे मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस धाडली जात आहे. मुद्रांक शुल्क अधिकारी ही नोटीस पाठवून शुल्क व दंडाची रक्कम भरण्यासाची मागणी करीत आहे. त्याबाबत १५ दिवसांत खुलासा न केल्यास सोसायटीचे काही म्हणणे नसल्याचे समजून एकतर्फी निर्णय घेतला जाईल. तसेच सोसायटी जप्तची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.या प्रकरणात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून निवासी भागातील सोसायट्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवासी भागातील जागरूक नागरीक राजू नलावडे यांनी केली आहे. सोसायट्या मुद्रांक शुल्क भरू शकतात. मात्र, दंड हा ४०० पट जास्त आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तेथे हा विषय उपस्थित करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे नलावडे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)