शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
4
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
5
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
6
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
7
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
8
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
9
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
10
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
11
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
12
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
13
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
14
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
15
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
16
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
17
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
18
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
19
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
20
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?

४०० पटीने जास्त दंड आकारण्याचा इशारा

By admin | Updated: March 14, 2017 01:57 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवर असलेल्या निवासी भागातील काही सोसायट्यांनी पुनर्विकास व कर्ज काढण्यासाठी अंतिम भाडेकरारासाठी

डोंबिवली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवर असलेल्या निवासी भागातील काही सोसायट्यांनी पुनर्विकास व कर्ज काढण्यासाठी अंतिम भाडेकरारासाठी महामंडळाकडे अर्ज केला असता मुद्रांक शुल्क विभागाने सोसायट्यांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यात मुद्रांक शुल्काची रक्कम ४०० पट्टीने जास्त लावली आहे. ही रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, अशी तंबी मुंद्राक शुल्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अंतिम भाडेकरारासाठी अर्ज करणाऱ्या सोसायट्या धास्तावल्या आहेत.निवासी परिसरातील ५०० सोसायट्या या एमआयडीसीच्या जागेवर आहेत. त्यापैकी जवळपास ४०० च्या आसपास सोसयट्यांनी अंतिम भाडेकरारासाठी महामंडळाच्या कार्यालयाकडे अर्ज केले आहे. सोसायट्यांना पुनर्विकास करायचा असल्यास किंवा कर्ज काढावयाचे असल्यास अंतिम भाडेकरार असणे आवश्यक असतो. नियमामुसार, या सोसायट्या विकसित करणाऱ्या बिल्डरांनीही अंतिम भाडेकरार करणे आवश्यक आहे. मात्र, अंतिम भाडेकरारासाठी आता बिल्डर आहेत कुठे? त्यामुळे या प्रक्रियेसाठी सोसायट्यांनीच एमआयडीसीकडे अर्ज केला आहे. परंतु, एमआयडीसीने मुद्रांक शुल्क भरण्यास सांगितले आहे. त्यासाठी सोसायट्यांचे प्रकरण मुद्रांक शुल्क अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहेत. अंतिम भाडेकरार केल्याशिवाय ती जागा सोसायटीच्या नावे होत नाही. अंतिम कराराअभावी सोसायटीत राहणाऱ्यांना कर्जासाठी कागदपत्रे सादर करता येत नाहीत. त्यांच्या कर्ज प्रकरणाला अडसर निर्माण होतो. एखाद्या सोसायटीचे मूल्य हे ३० लाख असल्यास त्याला २ लाख ४८ हजारांचे मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस धाडली जात आहे. मुद्रांक शुल्क अधिकारी ही नोटीस पाठवून शुल्क व दंडाची रक्कम भरण्यासाची मागणी करीत आहे. त्याबाबत १५ दिवसांत खुलासा न केल्यास सोसायटीचे काही म्हणणे नसल्याचे समजून एकतर्फी निर्णय घेतला जाईल. तसेच सोसायटी जप्तची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.या प्रकरणात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून निवासी भागातील सोसायट्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवासी भागातील जागरूक नागरीक राजू नलावडे यांनी केली आहे. सोसायट्या मुद्रांक शुल्क भरू शकतात. मात्र, दंड हा ४०० पट जास्त आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तेथे हा विषय उपस्थित करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे नलावडे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)