शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

कल्याणमधील ४० झाडे झाली खिळे, बॅनरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 00:28 IST

‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.

डोंबिवली : ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. ‘अंघोळीची गोळी’ संस्था पाणीबचत आणि वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे शाळा-महाविद्यालयांत याबाबत जागृतीके ली जाते. तसेच ‘खिळेमुक्त झाडे’ ही संकल्पना दोन वर्षांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात राबवली जात आहे. वृक्षसंवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे, त्यामुळे खिळेमुक्त झाडे हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा, असे आवाहन संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी यावेळी केले.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमध्ये राबवलेल्या उपक्रमात भूषण राजेशिर्के, चेतन म्हामुणकर, मंगेश तिवारी आदी युवकांनी सहभागी होत ४० झाडांवरील पोस्टर, बॅनर व खिळे काढले.यावेळी संस्थेचे सचिव अविनाश पाटील म्हणाले की, पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम यासारखे कायदे व नियम झाडांसंदर्भात आहेत. मात्र, ते पाळले जात नाहीत. त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. वृक्षसंवर्धनासाठी अनेक महानगरपालिकांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरा संरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे, असेही ते यावेळी म्हणाले.ठाण्यात स्वातंत्र्य दिन निसर्गासोबत साजरालॉकडाऊनमध्ये निसर्गातील झाडांनी, प्राणीपक्ष्यांनीही मोकळा श्वास घेतला. याच निसर्गाचे रक्षण केले तरच आपण भविष्यात अधिक मोकळा श्वास घेऊ शकू, हे लक्षात घेत मातृसेवा फाउंडेशनने स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण न करता उलट वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला.‘झाडे लावा, झाडे जगवा’ या मोहिमेंतर्गत ‘मातृसेवा’च्या कार्यकर्त्यांनी येऊर परिसरात शनिवारी वृक्षारोपण केले. अनेकदा वृक्षारोपण करण्यात येते. परंतु, त्या वृक्षांची पुढे निगा राखली जातेच, असे नाही.याच पार्श्वभूमीवर ‘मातृसेवा’च्या अध्यक्षा संध्या सावंत म्हणाल्या की, नुसते वृक्षारोपण करून दुर्लक्ष करू नये. झाडांची निगा राखणेही महत्त्वाचे आहे. जागेची पाहणी करून, पाण्याची सोय बघूनच आम्ही वृक्षारोपण करतो. प्रत्येक रोपाची वेळोवेळी पाहणी करून त्याची पुरेशी काळजी घेतो, त्याला खतपाणी घालतो. ठामपाच्या शाळांत जाऊन झाडांची ओळख, परसबाग, फुलपाखरू उद्यान असे उपक्र म राबवतो.