शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

कल्याणमधील ४० झाडे झाली खिळे, बॅनरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 00:28 IST

‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.

डोंबिवली : ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. ‘अंघोळीची गोळी’ संस्था पाणीबचत आणि वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे शाळा-महाविद्यालयांत याबाबत जागृतीके ली जाते. तसेच ‘खिळेमुक्त झाडे’ ही संकल्पना दोन वर्षांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात राबवली जात आहे. वृक्षसंवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे, त्यामुळे खिळेमुक्त झाडे हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा, असे आवाहन संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी यावेळी केले.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमध्ये राबवलेल्या उपक्रमात भूषण राजेशिर्के, चेतन म्हामुणकर, मंगेश तिवारी आदी युवकांनी सहभागी होत ४० झाडांवरील पोस्टर, बॅनर व खिळे काढले.यावेळी संस्थेचे सचिव अविनाश पाटील म्हणाले की, पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम यासारखे कायदे व नियम झाडांसंदर्भात आहेत. मात्र, ते पाळले जात नाहीत. त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. वृक्षसंवर्धनासाठी अनेक महानगरपालिकांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरा संरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे, असेही ते यावेळी म्हणाले.ठाण्यात स्वातंत्र्य दिन निसर्गासोबत साजरालॉकडाऊनमध्ये निसर्गातील झाडांनी, प्राणीपक्ष्यांनीही मोकळा श्वास घेतला. याच निसर्गाचे रक्षण केले तरच आपण भविष्यात अधिक मोकळा श्वास घेऊ शकू, हे लक्षात घेत मातृसेवा फाउंडेशनने स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण न करता उलट वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला.‘झाडे लावा, झाडे जगवा’ या मोहिमेंतर्गत ‘मातृसेवा’च्या कार्यकर्त्यांनी येऊर परिसरात शनिवारी वृक्षारोपण केले. अनेकदा वृक्षारोपण करण्यात येते. परंतु, त्या वृक्षांची पुढे निगा राखली जातेच, असे नाही.याच पार्श्वभूमीवर ‘मातृसेवा’च्या अध्यक्षा संध्या सावंत म्हणाल्या की, नुसते वृक्षारोपण करून दुर्लक्ष करू नये. झाडांची निगा राखणेही महत्त्वाचे आहे. जागेची पाहणी करून, पाण्याची सोय बघूनच आम्ही वृक्षारोपण करतो. प्रत्येक रोपाची वेळोवेळी पाहणी करून त्याची पुरेशी काळजी घेतो, त्याला खतपाणी घालतो. ठामपाच्या शाळांत जाऊन झाडांची ओळख, परसबाग, फुलपाखरू उद्यान असे उपक्र म राबवतो.