शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील ४० झाडे झाली खिळे, बॅनरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 00:28 IST

‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.

डोंबिवली : ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. ‘अंघोळीची गोळी’ संस्था पाणीबचत आणि वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे शाळा-महाविद्यालयांत याबाबत जागृतीके ली जाते. तसेच ‘खिळेमुक्त झाडे’ ही संकल्पना दोन वर्षांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात राबवली जात आहे. वृक्षसंवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे, त्यामुळे खिळेमुक्त झाडे हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा, असे आवाहन संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी यावेळी केले.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमध्ये राबवलेल्या उपक्रमात भूषण राजेशिर्के, चेतन म्हामुणकर, मंगेश तिवारी आदी युवकांनी सहभागी होत ४० झाडांवरील पोस्टर, बॅनर व खिळे काढले.यावेळी संस्थेचे सचिव अविनाश पाटील म्हणाले की, पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम यासारखे कायदे व नियम झाडांसंदर्भात आहेत. मात्र, ते पाळले जात नाहीत. त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. वृक्षसंवर्धनासाठी अनेक महानगरपालिकांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरा संरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे, असेही ते यावेळी म्हणाले.ठाण्यात स्वातंत्र्य दिन निसर्गासोबत साजरालॉकडाऊनमध्ये निसर्गातील झाडांनी, प्राणीपक्ष्यांनीही मोकळा श्वास घेतला. याच निसर्गाचे रक्षण केले तरच आपण भविष्यात अधिक मोकळा श्वास घेऊ शकू, हे लक्षात घेत मातृसेवा फाउंडेशनने स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण न करता उलट वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला.‘झाडे लावा, झाडे जगवा’ या मोहिमेंतर्गत ‘मातृसेवा’च्या कार्यकर्त्यांनी येऊर परिसरात शनिवारी वृक्षारोपण केले. अनेकदा वृक्षारोपण करण्यात येते. परंतु, त्या वृक्षांची पुढे निगा राखली जातेच, असे नाही.याच पार्श्वभूमीवर ‘मातृसेवा’च्या अध्यक्षा संध्या सावंत म्हणाल्या की, नुसते वृक्षारोपण करून दुर्लक्ष करू नये. झाडांची निगा राखणेही महत्त्वाचे आहे. जागेची पाहणी करून, पाण्याची सोय बघूनच आम्ही वृक्षारोपण करतो. प्रत्येक रोपाची वेळोवेळी पाहणी करून त्याची पुरेशी काळजी घेतो, त्याला खतपाणी घालतो. ठामपाच्या शाळांत जाऊन झाडांची ओळख, परसबाग, फुलपाखरू उद्यान असे उपक्र म राबवतो.