शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

काँग्रेसकडून ४०-६० चा फॉर्म्युला

By admin | Updated: February 1, 2017 03:28 IST

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला ४० टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६० टक्के जागा सोडण्याबाबतचा प्रस्ताव उभय पक्षांतर्फे प्रदेश पातळीवर धाडण्यात आला असून

- पंकज पाटील,  उल्हासनगर

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला ४० टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६० टक्के जागा सोडण्याबाबतचा प्रस्ताव उभय पक्षांतर्फे प्रदेश पातळीवर धाडण्यात आला असून आता यावर राज्यातील नेते चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. टीम ओमीच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली आहे. आतापर्यंत स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीला वरिष्ठांकडून आदेश मिळताच काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात चाचपणी करण्यात आली. काँग्रेसच्या नेत्यांनी देखील राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा करावी, असे संकेत दिले आहेत. टीम ओमी ही राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर राष्ट्रवादीची काय अवस्था होणार याची कल्पना त्यांच्या नेत्यांना आली आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशांचे पालन करण्याचे जिल्ह्यातील नेत्यांनी ठरवले आहे. काँग्रेसने एकूण जागांच्या ४० टक्के जागा सोडण्याचा आणि राष्ट्रवादीने ६० टक्के जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पक्षाचे किती नगरसेवक कलानी यांच्यासोबत जातात हे पाहिल्यावर जागावाटपात फेरबदल होऊ शकतो, असे काँग्रेसचे मत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याने दोन्ही पक्षांनी आघाडीचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी गेल्या निवडणुकीत आघाडी केलेली होती. या निवडणुकीतही आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. वरिष्ठांनी देखील त्या संदर्भात चाचपणी करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत परिणामकारक निर्णय हाती येतील. - जयराम लुल्ला,उल्हासनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उल्हासनगरातील आघाडीच्या चर्चेवर लक्ष ठेऊन आहेत. चर्चेचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येत आहे. आघाडी व्हावी ही नेत्यांनी इच्छा आहे. - निलेश पेढारी, काँग्रेसचे प्रभारी, उल्हासनगर.काँग्रेसकडून जागावाटपाचा प्राथमिक प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आला आहे. विद्यमान नगरसेवकांच्या जागा सोडून उर्वरित जागांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहे. -प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस