शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत ३२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:50 IST

शासकीय यंत्रणेकडून मात्र आजारांचे कारण : ९७७ कुपोषित बालकेही आढळली

सुरेश लोखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत ० ते ६ वर्षांपर्यंतच्या ३२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मात्र, शासकीय यंत्रणांनी नेहमीप्रमाणे विविध आजारांच्या चक्र व्यूहात अडकल्याने या बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. शिवाय ९७७ कुपोषित बालकांसह तीव्र कमी वजनाची व कमी वजनाची ९९०७ बालके आढळली आहेत.

देशभरात श्रीकृष्णजन्माचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच या मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या परिवारात मात्र दु:ख व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील मृत्युमुखी पडलेल्या बालकांचा शोध घेतला असता तब्बल ३२ बालके आदिवासी, दुर्गम, गावपाड्यांत दगावल्याचे निदर्शनात आले. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये १११ बालकांचा तर २०१७ मध्ये ११६ बालकांचा आणि २०१६ या वर्षांत तब्बल १४० बालके दगावली आहेत. या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण अत्यल्प असून अवघी ३२ बालके चार महिन्यांच्या कालावधीत दगावल्याचे येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे यांनी सांगितले. गावपाड्यांमध्ये विविध उपाययोजना सातत्याने राबवत असल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य झाल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण हे दोन तालुके वगळता एप्रिल ते जुलैअखेर शहापूर तालुक्यात सर्वाधिक १७ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुरबाडला आठ आणि भिवंडी तालुक्यात सात बालके दगावली आहेत. या ० ते ६ वयोगटांतील ३२ बालकांमध्ये कमी वजनाच्या दोन बालकांचा तर कमी दिवसाच्या तीन बालकांचादेखील समावेश आहे. याशिवाय जन्मत: व्यंग, हायपो थर्मिया आणि जन्मता कावीळ या आजारांचे प्रत्येक एक बालक दगावले आहे. तर, न्यूमोनियामुळे तीन आणि अ‍ॅस्पेक्शियाच्या सात बालकांचा मृत्यू झाला आहे. इतरमध्ये सर्वाधिक आठ बालके दगावल्याची नोंद आहे. तर सेप्टीसिमिया, अतिज्वर, अपघात, ड्रावनिंग, सर्पदंश आणि न्यूमोनिया यांच्यामुळे प्रत्येकी एक बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

यंदाच्या या बालमृत्यूप्रमाणेच २०१६ ला १४० बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यानंतर हे प्रमाण कमी होऊन २०१७-१८ ला ११६ बालकांचे दगावली. यामध्ये ० ते १ या वयोगटातील ९६ तर १ ते ५ वर्षांच्या २० बालकांचा दारी-अंगणी रांगण्याच्या, खेळण्याच्या कालावधीत मृत्यू झाला. २०१८-१९ मध्ये १ ते ५ वयोगटामधील १५ बालकांचा मृत्यू झाला असून ० ते १ वर्षाच्या ९६ बालके या कालावधीत दगावले आहेत. या तुलनेत यंदा एप्रिल ते जुलै या कालावधीत अवघी ३२ बालके दगावली आहेत. बालमृत्यूचे हे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी, ग्रामीण व दुर्गम भागात विविध उपाययोजना व औषधोपचार सातत्याने केला जात असल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे डॉ. रेघे यांच्याकडून सांगितले जात आहे.