शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

एका अंत्यसंस्कार साठी साडे ४ हजाराचा खर्च? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 18:52 IST

उल्हासनगरात मरणानंतरही हाल, लाकडे संपली. उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमी नेहमी वादात सापडली असून नागरिक व ट्रस्टी आमनेसामने आल्याचे प्रकार यापूर्वी घडले.

- सदानंद नाईक उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरातील स्मशामभूमितील लाकडे संपल्यावर अंत्यसंस्कारसाठी दोन मृतदेह इतरत्र हलविण्याचा वेळ नातेवाईकवर आली. एका अंत्यसंस्कार साठी साडे चार हजार रुपये मागितले जात असून अनेकांच्या तक्रारीनंतर उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी सकाळी स्मशानभूमीला भेट देऊन समस्यांची पाहणी करून ट्रस्टीना म्हणणे मांडण्यास सांगितले.

 उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमी नेहमी वादात सापडली असून नागरिक व ट्रस्टी आमनेसामने आल्याचे प्रकार यापूर्वी घडले. अंत्यसंस्कार साठी लाकडे नसल्याने, ऐन वेळेवर मृतदेह इतर स्मशानभूमीत हलविण्याची वेळ यापूर्वी आली होती. तोच प्रकार गेल्या काही दिवसापासून घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. लाकडे नसल्याने व अंत्यसंस्कारसाठी स्मशानभूमी कामगारांकडून साडे चार हजार रुपये मागितले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी पथकासह स्मशानभूमीला भेट देऊन, स्मशानभूमीतील कर्मचारी, स्थानिक नागरिकां सोबत चर्चा केली. तसेच स्मशानभूमी ट्रस्टीना आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले. अंत्यसंस्कार वेळी मृतदेहाचे मोजकेच नातेवाईक उपस्थित असून सर्व प्रक्रिया स्मशानभूमी मधील कामगारांना पार पाडवी लागते. त्यामुळे अंत्यसंस्कारचा खर्च वाढल्याचे सांगितले जात आहे.

 कॅम्प नं-४ च्या स्मशानभूमी ट्रस्टला सर्व सुविधा, लाकडे पुरविण्याचे आदेश उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी देऊन, आपले लेखी मंडल्यावर प्रत्यक्ष चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. सद्याचा काळ आणीबाणीचा असून सर्वांनी एकमेका सहकार्य करण्याची विनंती नाईकवाडे यांनी उपस्थित नागरिकांसह स्मशानभूमी कर्मचारी व ट्रस्टीला केली. शहरातील गरीब व गरजू नागरिकांना महापालिका लाकडे मोफत देते. मात्र इतर अंत्यसंस्कारचा खर्च मृतदेहाच्या नातेवाईकांना करावा लागतो. एका अंत्यसंस्कार मागे महापालिका लाकडाचे एक हजार रुपये देते. ती किंमत १८०० रुपये करण्याची मागणी स्मशानभूमी ट्रस्टीने महापालिकेला केली होती. अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे ट्रस्टीने म्हणणे आहे. 

स्मशानभूमी ट्रस्टीवर कारवाई अशक्य? 

महापालिकेने गरीब व गरजू नागरिकांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याचें जाहीर केले. मात्र त्याचा लाभ ८० टक्के नागरिक घेत असल्याचे उघड झाले. तसेच महापालिकेकडून लाकडाचे पैसे वेळेत दिले जात नसल्याने, स्मशानभूमी ट्रस्टी लाकडे देण्यास नकारघंटा देत असल्याचा अनुभव नागरिकांना आहे. एकूणच ट्रस्टी विरोधात कारवाई अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर