शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सुरळीत वीज पुरवठ्याच्या दुरूस्तीचे ३८ कोटी खर्चाची कामे अद्याप कागदांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:47 IST

गांवखेडे, तेथील उद्योग, कृषी पंप आदींना सुरळीत वीज पुरवठ्यासह नवीन वीज जोडण्यासाठी उपयुक्त ठरणाºया नवनीवन तांत्रिक उपकरणे, दुरूस्त्यां आदींसाठी ३८ कोटी सहा लाख ४२ हजार रूपये खर्चांची कामे मंजूर आहेत.

- सुरेश लोखंडे ठाणे - जिल्ह्यातील गांवखेडे, तेथील उद्योग, कृषी पंप आदींना सुरळीत वीज पुरवठ्यासह नवीन वीज जोडण्यासाठी उपयुक्त ठरणाºया नवनीवन तांत्रिक उपकरणे, दुरूस्त्यां आदींसाठी ३८ कोटी सहा लाख ४२ हजार रूपये खर्चांची कामे मंजूर आहेत. दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजने अंतर्गत हाती घेतलेली ही कामे महावितरणकडून अद्यापही सुरू करण्यात आली नसून केवळ कागदावर असल्याचे निदर्शनात आले आहेत.वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण, श्रेणीवर्धन, बळकटीकरण करण्यासाठी जिल्ह्यात दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजनेव्दारे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी तालुक्यांमधील गावपाड्यां परिसरात स्विचिंग स्टेशन,, उच्चदाब - लघूदाब वाहिनी, नवीन वीज वितरण रोहित्र, केबल आदींची विविध कामे हाती घेऊन त्यावर ३८ कोटीं सहा लाख रूपये खर्चांची कामे मंजूर आहेत. मात्र ती अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे दिशा समितीच्या बैठकीत उघडकीस आले.वीज पुरवठा सुरळीत होण्यास उपयुक्त ठरणाºया या नवीन उपकरणांसह दुरूस्तीच्या कामस महावितरण विभागाने तत्काळ सुरू केल्यास वीज समस्या काही अंशी कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यात २४ तास वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कृषी व अकृषीकची स्वतंत्र नवीन वीज वाहिन टाकण्याच्या कामासह गरीब कुटुंबियाच्या घरात वीज पुरवठा, संसद आदर्श ग्राम योजनेच्या गावातील विद्युतीकरण, नवीन जोडण्यांच्या कामांवर हा मोठा खर्चही मंजूर आहेत. एवढेच काय तर खाजगी एजन्सीसला देखील कामांच्या निविदा देखील देण्यात आल्या आहेत.मात्र केवळ पाहाणी आणि चौकशी यात वेळ घालवण्यात येत असल्यामुळे या कामास अद्यापही प्रारंभ झालेला नसल्याची बाब आढावा बैठकीत उघड झाली आहे.जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील सुमारे ७५७ कामांवर ३८ कोटी सहा लाख रूपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहेत. कल्याण तालुक्यातील कामांवर सर्वाधिक १५ कोटी ८९ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यात दहा कोटी ५८ लाख, शहापूरमध्ये नऊ कोटी दहा लाख आणि भिवंडीमध्ये दोन कोटी ४९ लाख रूपये खर्चांची कामे अद्यापही केवळ कागदोपत्री दिसत आहेत. नियोजनानुसारही काम वेळीच मार्गी लागल्यास ग्रामस्थांसह शेतकरी व उद्योगांची वीज पुरवठा सुरळीत होणे शक्य आहे. वीजे अभावी आंधारात चाचपडणाºया नागरिकाना वीज पुरवठ्याचा लाभ होणे शक्य आहे.

टॅग्स :thaneठाणे