शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आदिवासींना ‘पेसा’चे ३७ कोटी

By admin | Updated: October 1, 2015 23:32 IST

आदिवासी गावांचा विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने ‘पंचायत एक्स्टेन्शन टू शेड्यूल एरियाज’ अर्थात ‘पेसा’ कायद्यांतर्गत आदिवासी उपयोजनेतून ५ टक्के निधी देण्यास २१ एप्रिल २०१४ रोजी मान्यता दिली आहे

हितेन नाईक , पालघरआदिवासी गावांचा विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने ‘पंचायत एक्स्टेन्शन टू शेड्यूल एरियाज’ अर्थात ‘पेसा’ कायद्यांतर्गत आदिवासी उपयोजनेतून ५ टक्के निधी देण्यास २१ एप्रिल २०१४ रोजी मान्यता दिली आहे. यानुसार, पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांतील ९६६ गावांना २०१५-१६ या वर्षाकरिता ३६ कोटी ९९ लाख ७४ हजार २९३ रुपये वितरीत करण्यास मान्यता दिली असून ही रक्कम संबंधित ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात शुक्रवारी थेट जमा करण्यात आली आहे.शासनाकडून येणारी रक्कम थेट बँक खात्यात जमा झाल्याने संबंधित ग्रामपंचायतींना त्यांच्या अखत्यारीतील गावांमध्ये लगेच विकासकामे करणे शक्य आहे. राज्यातील ठाणे, पालघर, नंदुरबार, यवतमाळ, नाशिक, अकोला, गडचिरोली, भंडारा, गोंदियासह १३ आदिवासीबहुल जिल्ह्यांना पेसा कायद्यांतर्गत आदिवासी उपयोजनेतून ५ टक्के निधी देण्याचा निर्णय राज्य शासनाने २१ एप्रिल २०१४ रोजी घेतला होता. त्यापैकी ७० टक्के अर्थात १८० कोटी ९५ लाख शासनाने वितरीत केले. ही रक्कम ९६६ गावांना विभागून देण्यात येणार आहे. पालघरमधील बोईसर व पास्थळ या दोन गावांना यातून वगळण्यात आले असून त्यांना स्वतंत्र निधी नंतर देण्यात येणार आहे. या निधीचा उपयोग सुमारे १२ लाख ९८ हजार ८७७ इतक्या लोेकसंख्येला होणार आहे.विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात शहापूर, भिवंडी, मुरबाड हे तीन आदिवासीबहुल तालुके गेले असून त्यांना यापूर्वीच १२.६४ कोटींची रक्कम शासनाने वितरीत केली आहे.