शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागासाठी ३६८ कोटींचा निधी

By admin | Updated: April 1, 2017 05:24 IST

कल्याण तालुका शहरी व ग्रामीण असा विभागला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. परंतु, ग्रामीण

बिर्लागेट : कल्याण तालुका शहरी व ग्रामीण असा विभागला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. परंतु, ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुमारे ३६८ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे, पाणी, आरोग्य आदी विषय मार्गी लागतील. महसुली गावांत यापुढे स्मशानभूमींच्या शेड पत्र्यांऐवजी स्लॅबच्या असतील. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. कल्याण पंचायत समितीची आमसभा नुकतीच गोवेली येथे झाली. याप्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर, वन विभागाचे एस.एस. खेडेकर, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आदी अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कथोरे म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच गोवेली येथे आमसभा होत आहे. कल्याण जिल्हा झाल्यानंतर गोवेली तालुका करणार आहे. त्यामुळेच येथे ही सभा घेतली आहे. आमसभेची सुरुवात शिक्षण विभागाच्या तक्रारीने झाली. म्हारळमधील डॉ. सोमनाथ पाटील यांनी एबीएल प्रोजेक्ट बंद आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली. मानिवलीचे अ‍ॅड. सुनील गायकर यांनी शालेय पोषण आहार योजनेचे बिल बचत गटांना मिळालेले नसल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मोस गावचे चिंतामण मगर यांनी शिक्षक वेळेवर येत नाहीत. शिक्षण विभागातील सावळा गोंधळ थांबवावा, अशी विनंती केली. (वार्ताहर)समृद्धीला विरोध नकोसरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाला विरोध करू नका. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, असे या वेळी आमदार किसन कथोरे यांनी आमसभेत सांगितले. पुढे त्यांनी तहसील कार्यालय, पुरवठा विभागातील दलालांना प्रशासनाने आवर घालावा, अशी सूचनाही त्यांनी केली.