शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

ग्रामीण भागासाठी ३६८ कोटींचा निधी

By admin | Updated: April 1, 2017 05:24 IST

कल्याण तालुका शहरी व ग्रामीण असा विभागला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. परंतु, ग्रामीण

बिर्लागेट : कल्याण तालुका शहरी व ग्रामीण असा विभागला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. परंतु, ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुमारे ३६८ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे, पाणी, आरोग्य आदी विषय मार्गी लागतील. महसुली गावांत यापुढे स्मशानभूमींच्या शेड पत्र्यांऐवजी स्लॅबच्या असतील. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. कल्याण पंचायत समितीची आमसभा नुकतीच गोवेली येथे झाली. याप्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर, वन विभागाचे एस.एस. खेडेकर, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आदी अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कथोरे म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच गोवेली येथे आमसभा होत आहे. कल्याण जिल्हा झाल्यानंतर गोवेली तालुका करणार आहे. त्यामुळेच येथे ही सभा घेतली आहे. आमसभेची सुरुवात शिक्षण विभागाच्या तक्रारीने झाली. म्हारळमधील डॉ. सोमनाथ पाटील यांनी एबीएल प्रोजेक्ट बंद आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली. मानिवलीचे अ‍ॅड. सुनील गायकर यांनी शालेय पोषण आहार योजनेचे बिल बचत गटांना मिळालेले नसल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मोस गावचे चिंतामण मगर यांनी शिक्षक वेळेवर येत नाहीत. शिक्षण विभागातील सावळा गोंधळ थांबवावा, अशी विनंती केली. (वार्ताहर)समृद्धीला विरोध नकोसरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाला विरोध करू नका. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, असे या वेळी आमदार किसन कथोरे यांनी आमसभेत सांगितले. पुढे त्यांनी तहसील कार्यालय, पुरवठा विभागातील दलालांना प्रशासनाने आवर घालावा, अशी सूचनाही त्यांनी केली.