शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

३६५ महिलांची देहविक्रयातून सुटका

By admin | Updated: July 20, 2015 03:22 IST

लग्नाचे व पैशांचे आमिष, प्रेमजाळ्यात ओढून महिलांना देहविक्रीस भाग पाडले जाते. अशा प्रकारे त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्यांवर कारवाईसाठी

लग्नाचे व पैशांचे आमिष, प्रेमजाळ्यात ओढून महिलांना देहविक्रीस भाग पाडले जाते. अशा प्रकारे त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्यांवर कारवाईसाठी ठाणे पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभाग सुरू केला आहे. या विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पिटा अ‍ॅक्टनुसार कारवाईस सुरुवात केली आहे. गेल्या साडेतीन वर्षांत ६३ कारवाया करून सुमारे २१४ पुरुष आणि महिला आरोपींना अटक करून ३६५ पीडित महिलांची सुटका केली आहे. सर्वाधिक पीडित १२० महिलांची सुटका २०१४ मध्ये केलेल्या १६ कारवायांत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातून मुक्तता केलेल्या महिलांना एकतर सुधारगृहात पाठविण्यात येते किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाते. या महिलांना पैशांचे आमिष दाखवून किंवा ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते. पीडित महिला या प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले आहे.वेश्या व्यवसायासाठी आता व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराबरोबर भाड्याच्या रूमही वापरल्या जात आहेत. त्यामुळे भाड्याने घर देणाऱ्यांनी तेथे काय चालते, याची पाहणी करावी. हा व्यवसाय करून घेणाऱ्या २३ महिलांना यंदा पकडले आहे. - शकील शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक विभाग, ठाणेजाहिराती देऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्यांनी आता चक्क व्हॉट्सअ‍ॅपचा आसरा घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या व्यवसायाकडे महिलांना ओढण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविणाऱ्या २१४ जणांच्या पोलिसांनी मागील साडेतीन वर्षांत मुसक्या आवळल्या असून त्यामध्ये ४८ महिलांचाही समावेश आहे. यातून ३६५ पीडित महिलांची सुटका केली आहे. सद्य:स्थितीत भाड्याच्या रूमचाही या व्यवसायासाठी वापर होत असल्याने आपली रूम भाड्याने देणाऱ्यांनी तेथे काय चालते, याची तपासणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संकलन : पंकज रोडेकर