शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

३६१ शाळा होणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:14 IST

ठाणे जिल्ह्यात ३० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या ३६१ शाळा कोणत्याही क्षणी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा अध्यादेश लवकरच जारी होणार

- सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात ३० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या ३६१ शाळा कोणत्याही क्षणी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा अध्यादेश लवकरच जारी होणार असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिक्षक आणि अन्य कर्मचारी हादरले आहे. या शाळेतील मुलांची जवळच्याच अन्य शाळांत व्यवस्था करण्यात येणार असून त्यांच्या प्रवासाचा खर्च सरकार करणार आहे. मात्र शिक्षकांच्या पगारापेक्षा तो खर्च कमी असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. या आधी नोव्हेंबर २०११ मध्ये सरकारने राज्यातील सर्व शाळांची पटनोंदणी केली होती. ठाणे जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण व आदिवासी भागात ३० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्येच्या ३६१ शाळा आहेत. यातील शिक्षकांचे वेतन व व्यवस्थापन यावर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त खर्च होत आहे. तो टाळण्यासाठी या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शाळांच्या पटसंख्या पडताळणीचे काम हाती घेतले. त्यात शाळांची नेमकी संख्या समोर आली. पटपडताळणीचे काम पूर्ण झाल्याावर शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या शाळांत दोन लाख विद्यार्थी बोगस असल्याचे आढळले. यामुळे अशा शाळेतील शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. यात ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी पालिका, भिवंडी ग्रामीणमधील माध्यमिक, प्राथमिक शाळांचा समावेश आहे.सध्या या शाळांत ६० विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनाच्या तुलनेत शाळांची गुणवत्ता नाही, विद्यार्थी संख्याही कमी आहे. घटती आहे. यामुळे या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संबंधित शाळेच्या विद्यार्थ्यांना जवळची चांगली शाळा मिळेल. तेथील चांगल्या सुविधा मिळतील. तसेच या विद्यार्थ्यांना वाहनाची सेवाही मिळणार आहे. पटसंख्या कमी असलेल्या शाळा शहरांचे नाव शाळांची संख्याअंबरनाथ तालुका २४भिवंडी पालिका ०४भिवंडी तालुका ३८कल्याण तालुका १७कल्याण-डोंबिवली २६मीरा-भार्इंदर पालिका ०५मुरबाड तालुका ११८नवी मुंबई पालिका १७शहापूर तालुका ८८ठाणे पालिका १ ०५ठाणे पालिका २ ०६उल्हासनगर पालिका १३