शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

कल्याण-डोंबिवलीत ३६ दिवसांत आढळले तब्बल २२ हजार १६८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाने कहर केला असून, १ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाने कहर केला असून, १ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत आढळलेल्या रुग्णांचा आढावा घेता गेल्या ३६ दिवसांत तब्बल २२ हजार १६८ रुग्ण आढळले आहेत. तसेच ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत कल्याण पश्चिममध्ये सात हजार ८७६ तर डोंबिवली पूर्वमध्ये सात हजार ७७४ रुग्ण आढळल्याने हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

मनपाच्या हद्दीत कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढत असून दररोज आढळणारी रुग्णसंख्या आजमितीला तेराशे ते सतराशेच्या दरम्यान आहे. मंगळवारी एक हजार ३०९ रुग्णांची भर पडल्याने आजवरची कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८६ हजार ८०६ पर्यंत पोहोचली आहे. यातील ७४ हजार १८२ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २७५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्वेत रुग्णांचा वाढता आलेख चिंताजनक आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या दोन विभागांमध्ये दररोज ४८ ते ५८ च्या आसपास आढळणारी रुग्णांची संख्या आजमितीला ५०० ते ६०० च्या वर गेली आहे. ४ एप्रिलला डोंबिवली पूर्वेत ५१० तर कल्याण पश्चिमेत ६५० रुग्ण आढळले आहेत. गेल्या ३६ दिवसांतील रुग्णांची आकडेवारी पाहता डोंबिवली पूर्वेत सात हजार ७७४ तर कल्याण पश्चिमेत सात हजार ८७६ इतकी आहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेतील परिस्थिती फारशी आलबेल आहे, असे नाही. त्या ठिकाणीही तीन हजार ३० डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेत तीन हजार ५४४ जणांना बाधा झाली आहे. यापाठोपाठ मांडा-टिटवाळा भागात एक हजार ६९, मोहना परिसरात ३४० तर पिसवलीत २४ रुग्ण आढळून आले आहेत. मनपा हद्दीतील रुग्णसंख्येत दिवसागणिक भरमसाट वाढ होत असल्याने रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील झाले असून, आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.

----------------------------------------

रुग्ण दुपटीचा कालावधी ४३ दिवसांवर

कोरोनाच्या पहिल्या लाटेत १२ जुलैला सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. त्या वेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९ ते १० दिवसांवर आला होता. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात हा कालावधी २१० ते २६० दिवसांवर गेला होता. परंतु, सद्य:स्थितीला रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी आता पुन्हा ४३ दिवसांवर आला आहे. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पाहता सद्य:स्थितीला मनपाच्या हद्दीतील मृत्युदर हा १.६७ टक्के इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के इतके आहे.

----------------------------------------

कोरोना चाचण्यांमध्ये वाढ

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मंगळवारी साडेपाच हजारांच्या आसपास नागरिकांची कोरोना चाचणी केल्याची माहिती मनपाच्या साथरोग विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

------------------------------------------------------