शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

विद्युत विभागाच्या खोदकामामुळे ३५ वृक्षांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि विद्युत विभागात आता वृक्ष धोकादायक झाल्याच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली आहे. मासुंदा ...

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि विद्युत विभागात आता वृक्ष धोकादायक झाल्याच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली आहे. मासुंदा तलाव परिसरात विद्युत विभागाने केलेल्या खोदकामामुळे ३५ वृक्ष धोकादायक झाल्याचा दावा वृक्ष प्राधिकरण विभागाने केला आहे. मात्र, दोन ते तीन वर्षांपूर्वी केलेल्या कामामुळेच हे वृक्ष धोकादायक झाल्याचा विद्युत विभागाचा दावा आहे. दरम्यान, हे वृक्ष कधीही पडू शकतात, त्यामुळे या तलाव परिसरातून ये-जा करताना सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे.

मासुंदा तलावानजीक रिक्षावर वृक्ष पडून दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वृक्ष प्राधिकरण विभागाला खडबडून जाग आली आहे. या विभागाने या भागाची पाहणी व सर्वच वृक्षांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार मुळासकट उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या बाजूलाच दोन फुटांवर खोदकाम करून विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. तसेच या वृक्षाच्या बुंध्यालगतच्या जागेतूनच चार मोठ्या विद्युतवाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. परंतु, याबाबत विद्युत विभागाने माहिती दिलेली नसल्याचा दावाही वृक्ष प्राधिकरणाने केला आहे.

त्यानुसार प्राधिकरणाने या संदर्भात विद्युत विभागाला पत्र पाठवून याचे कारण विचारले आहे. त्यात विद्युतवाहिन्या किंवा खांब उभारणीसाठी वृक्षांच्या बुंध्यालगत खोदकाम करू नये आणि वृक्ष धोकादायक होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत कळविले होते. या पत्राला विद्युत विभागानेही उत्तर देऊन वृक्ष प्राधिकरणाने केलेला दावा फेटाळला आहे. उन्मळून पडलेल्या त्या धोकादायक झाडाजवळ दोन ते तीन वर्षांपूर्वी विद्युत खांब बसविला असून, तेथे सध्या कोणतेही नवीन काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे वृक्ष पडण्याचे आणि इतर वृक्ष धोकादायक होण्यामागे विद्युत खांब हे कारण नाही, असे विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.

अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची?

- वृक्ष प्राधिकरणाचा दावा विद्युत विभागाने फेटाळला असला तरी मासुंदा तलाव परिसरातील ३५ वृक्ष हे धोकादायक झाले आहेत. त्यामुळे ते कधीही पडू शकतात, असेही आता सांगितले जात आहे.

- भविष्यात जर कधी येथील वृक्ष पडून अपघात झाला तर त्यात आमचा काही दोष नसेल, असेही या दोनही विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

---------------