शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Ulhasnagar: उल्हासनगर अभय योजनेतून ३४ कोटींची मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली 

By सदानंद नाईक | Updated: March 4, 2024 18:40 IST

Ulhasnagar News: महापालिकेने २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीधारकासाठी लागू केलेल्या अभय योजनेतून ३४ कोटींची वसुली झाली. तर फेब्रुवारी अखेर एकून १०८.७० कोटोची वसुली झाली.

- सदानंद नाईक उल्हासनगर - महापालिकेने २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीधारकासाठी लागू केलेल्या अभय योजनेतून ३४ कोटींची वसुली झाली. तर फेब्रुवारी अखेर एकून १०८.७० कोटोची वसुली झाली. वर्ष अखेर १२५ कोटी पेक्षा जास्त वसुली होण्याची शक्यता मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियांका राजपूत व्यक्त केली आहे.

उल्हासनगर महापालिका मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकीदारासाठी आयुक्त अजीज शेख यांनी २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान अभय योजना सुरू केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेने शहरवासीयांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. अभय योजनेच्या एका आठवड्यात एकून ३४ कोटीचे वसुली झाली असून ३२.३२ कोटी रोख रक्कमेत तर १.९७ कोटी धनादेश व ऑनलाईन भरणाद्वारे वसूल झाले. अभय योजनेच्या जनजागृती साठी आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे व मालमत्ता कर विभागच्या उपायुक्त प्रियांका राजपूत, कर निर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी विशेष प्रयत्न केले. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी विभागाच्या वसुलीचे १५५ कोटी ठेवले असून फेब्रुवारी अखेर पर्यंत एकून १०८.७० कोटोची वसुली झाली आहे.

महापालिकेने थकबाकीदार मालमत्ता कर व पाणीपट्टी कर मालमत्ताधारकाना अभय योजनेद्वारे सुवर्ण संधी दिली होती. यानंतर सक्तीने मालमत्ता कर वसुली सुरू राहणार असून मोठ्या थकबाकीधारकावर कारवाईची संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहे. तर अभय योजनेला एका आठवड्याची मुदतवाढ देण्याची मागणी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. अभय योजनेला मुदतवाढ दिल्यास, थकबाकीधारकांना दिलासा मिळून महापालिकेचे वसुली टार्गेट पूर्ण होणार असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर