शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘टेलिमानस’मध्ये उदासीनतेच्या ३३,६१० तक्रारी; ८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या सर्वाधिक समस्या

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 22, 2024 11:19 IST

मानसिक त्रासाची जवळपास १७ कारणे सांगितली जात आहेत. 

ठाणे : मानसिक आजाराविषयी २४*७ ऑडिओद्वारे समुपदेशन करणाऱ्या टेलिमानसमध्ये दोन वर्षांत ३३,६१० व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. यात मनाची उदासीनता किंवा मूड खराब असणे या समस्या सर्वाधिक सांगितल्या जात आहेत. १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्ती सर्वाधिक समस्या सांगत असल्याचे निरीक्षण ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने नोंदविले आहे. मानसिक त्रासाची जवळपास १७ कारणे सांगितली जात आहेत. 

नैराश्य, चिंता, सतत होणारा मानसिक त्रास व्यक्तींनी बोलून दाखवावा, त्रास मनात साठवून न ठेवता त्यांनी व्यक्त व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारने टेलिमानसची स्थापना केली. यात महाराष्ट्रात प्रथमच ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात टेलिमानस सुरू झाले आहे. या दोन वर्षांत ३३,६१० व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्याचे निदर्शनास आले. मनाची उदासीनता, प्रेमभंग, परीक्षेची चिंता, बेरोजगारी, पगार कमी असणे, ताणतणाव यांसारख्या अनेक मानसिक त्रासाची कारणे या व्यक्तींकडून सांगण्यात आली आहेत. दिवसाला अंदाजे ४५ कॉल्स टेलिमानसवर येतात. विशेषत: शहरी भागांतून सर्वाधिक कॉल्स येतात.

समस्या 

मनाची उदासीनता ताणतणाव झोप न येणे  चिंता झोप कमी होणेआक्रमक होणेकौटुंबिक वादनात्यात समस्या असणेव्यसन असणे आरोग्य विषयक समस्यापरीक्षा किंवा अभ्यासाची चिंता

वयोगट     कॉलची टक्केवारी  जाणवणाऱ्या समस्या१८ ते ४५ वर्षे     ७२.७ टक्के          विवाह किंवा इतर नात्यात समस्या,             नोकरीत मानसिक त्रास जाणवणे.४६ ते ६४ वर्षे     १६ टक्के         रात्री झोप येत नाही किंवा निवृत्तीनंतर             चिंता सतावणे१३ ते १७ वर्षे     ५.२ टक्के         परीक्षेची चिंता सतावणे६५ वर्षांवरील     ४.८ टक्के         झोपेचा त्रास ० ते १२ वर्षे     १.२ टक्के         अस्थिर असलेल्या बालकाशी कसे             वागावे, मुले अभ्यास करत नाही.             

मानसिक विकलांग मुलांशी कसे वागावे?

देशभरातील कोणत्याही व्यक्तीला मानसिक त्रास जाणवत असेल, त्यांनी १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा. टेलिमानससाठी एका शिफ्टला ४ ते ८ समुपदेशक असतात. ते समोरच्या व्यक्तीची समस्या जाणून त्याप्रमाणे त्याचे समुपदेशन करतात. आम्ही यात त्या व्यक्तीची गोपनीयता ठेवतो. कोणालाही मानसिक आजाराची सौम्य किंवा मध्यम लक्षणे जाणवत असतील किंवा मानसिक त्रास असेल ते या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन करू शकतात. - डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधिक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय

टॅग्स :thaneठाणे