शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

‘टेलिमानस’मध्ये उदासीनतेच्या ३३,६१० तक्रारी; ८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या सर्वाधिक समस्या

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 22, 2024 11:19 IST

मानसिक त्रासाची जवळपास १७ कारणे सांगितली जात आहेत. 

ठाणे : मानसिक आजाराविषयी २४*७ ऑडिओद्वारे समुपदेशन करणाऱ्या टेलिमानसमध्ये दोन वर्षांत ३३,६१० व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. यात मनाची उदासीनता किंवा मूड खराब असणे या समस्या सर्वाधिक सांगितल्या जात आहेत. १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्ती सर्वाधिक समस्या सांगत असल्याचे निरीक्षण ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने नोंदविले आहे. मानसिक त्रासाची जवळपास १७ कारणे सांगितली जात आहेत. 

नैराश्य, चिंता, सतत होणारा मानसिक त्रास व्यक्तींनी बोलून दाखवावा, त्रास मनात साठवून न ठेवता त्यांनी व्यक्त व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारने टेलिमानसची स्थापना केली. यात महाराष्ट्रात प्रथमच ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात टेलिमानस सुरू झाले आहे. या दोन वर्षांत ३३,६१० व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्याचे निदर्शनास आले. मनाची उदासीनता, प्रेमभंग, परीक्षेची चिंता, बेरोजगारी, पगार कमी असणे, ताणतणाव यांसारख्या अनेक मानसिक त्रासाची कारणे या व्यक्तींकडून सांगण्यात आली आहेत. दिवसाला अंदाजे ४५ कॉल्स टेलिमानसवर येतात. विशेषत: शहरी भागांतून सर्वाधिक कॉल्स येतात.

समस्या 

मनाची उदासीनता ताणतणाव झोप न येणे  चिंता झोप कमी होणेआक्रमक होणेकौटुंबिक वादनात्यात समस्या असणेव्यसन असणे आरोग्य विषयक समस्यापरीक्षा किंवा अभ्यासाची चिंता

वयोगट     कॉलची टक्केवारी  जाणवणाऱ्या समस्या१८ ते ४५ वर्षे     ७२.७ टक्के          विवाह किंवा इतर नात्यात समस्या,             नोकरीत मानसिक त्रास जाणवणे.४६ ते ६४ वर्षे     १६ टक्के         रात्री झोप येत नाही किंवा निवृत्तीनंतर             चिंता सतावणे१३ ते १७ वर्षे     ५.२ टक्के         परीक्षेची चिंता सतावणे६५ वर्षांवरील     ४.८ टक्के         झोपेचा त्रास ० ते १२ वर्षे     १.२ टक्के         अस्थिर असलेल्या बालकाशी कसे             वागावे, मुले अभ्यास करत नाही.             

मानसिक विकलांग मुलांशी कसे वागावे?

देशभरातील कोणत्याही व्यक्तीला मानसिक त्रास जाणवत असेल, त्यांनी १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा. टेलिमानससाठी एका शिफ्टला ४ ते ८ समुपदेशक असतात. ते समोरच्या व्यक्तीची समस्या जाणून त्याप्रमाणे त्याचे समुपदेशन करतात. आम्ही यात त्या व्यक्तीची गोपनीयता ठेवतो. कोणालाही मानसिक आजाराची सौम्य किंवा मध्यम लक्षणे जाणवत असतील किंवा मानसिक त्रास असेल ते या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन करू शकतात. - डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधिक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय

टॅग्स :thaneठाणे