शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

प्लास्टिकपासून ८० टन फर्नेस ऑइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:02 IST

कचऱ्यावर प्रक्रिया : विटा, प्लास्टिकचे दाणे तयार करण्याचे प्रकल्प उभारणार

कल्याण : केडीएमसीने गोदरेज कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारलेल्या प्लास्टिक कचरा प्रक्रिया प्रकल्पात दोन महिन्यांत प्लास्टिकपासून ८० टन फर्नेस आॅइल तयार करण्यात आले आहे. दरम्यान, प्रकल्पास पुरेसा प्लास्टिक कचरा मिळत नसल्याची बाबही यानिमित्ताने उघडकीस आली आहे.महापालिका हद्दीतून गोळा होणाºया ६५० टन कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारले जात नसल्याने महापालिका नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरली आहे. महापालिकेचा उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाने नगरविकास खात्याला कळवले आहे. मात्र, आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले की, प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प २ आॅक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्याचे लक्ष्य आहे. बारावे व मांडा प्रकल्पाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.महापालिका हद्दीत प्लास्टिक कचºयाचे प्रमाण एकूण गोळा होणाºया कचºयापैकी सात टक्के आहे. जवळपास दररोज ४० टन प्लास्टिक कचरा गोळा होता. मात्र, त्यावर प्रक्रिया केली जात नव्हती. महापालिकेने ‘गोदरेज’च्या नऊ कोटींच्या सीएसआर फंडातून बारावे येथे पाच टन प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून फर्नेस आॅइल तयार करण्याचा प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पाची पाच टन क्षमता असतानाही केवळ दोन टन प्लास्टिक कचरा मिळतो. मागील दोन महिन्यांत या कचºयावर प्रक्रिया करून ८० टन फर्नेस आॅइल तयार केले आहे. या आॅइलचा वापर मोठ्या कंपन्यांतील रासायनिक भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून केला जातो. गोदरेज कंपनी ८० टन फर्नेस आॅइलचा वापर उत्पादनासाठी करणार आहे.महापालिका हद्दीतून गोळा होणाºया ४० टन प्लास्टिक कचºयापैकी ज्या कचºयाचा पुनर्वापर होऊ शकत नाही, असा १० ते १२ टन कचरा हा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर येतो. उर्वरित ३० टन प्लास्टिक कचरा हा कचरावेचक गोळा करून तो भंगारवाल्याकडे विकतात. महापालिकेच्या चार वेस्ट बँकांमधून गोळा होणारा प्लास्टिक कचरा हा गोदरेजने उभारलेल्या प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्राकडे पाठवला जातो. प्लास्टिक कचरा प्रक्रियेसोबत पुनर्वापर न होणाºया कचºयापासून विटा, तर अन्य कचºयापासून प्लास्टिकचे दाणे तयार केले जाणार आहे. त्याचा वापर प्लास्टिकच्या बाटल्या तयार करणाºया कारखान्यात केला जातो. विटा व प्लास्टिकचे दाणे तयार करण्याचे दोन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. प्लास्टिकचा कचरा डम्पिंगवर जाऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे.प्लास्टिक पिशव्यांविरोधात २ आॅक्टोबरपासून मोहीमप्लास्टिक पिशव्यांविरोधातील कारवाई महापालिकेकडून केली जाते. मात्र, ती प्रभावी होत नाही. त्याबाबत, अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेकडे बोट दाखवले आहे. ही कारवाई प्रभावी करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी तिचा पुनर्प्रारंभ गांधी जयंती, २ आॅक्टोबरपासून करण्याचा मानस महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी व्यक्त केला आहे.