शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांचा पाणीप्रश्न कायमच राहणार

By admin | Updated: March 1, 2016 02:34 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना सध्या एमआयडीसी पाणीपुरवठा करते. या गावांत सध्या पाण्याची समस्या तीव्र आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना सध्या एमआयडीसी पाणीपुरवठा करते. या गावांत सध्या पाण्याची समस्या तीव्र आहे. ज्या वेळी या गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अमलात येईल, तेव्हाच तेथील पाणीटंचाई संपुष्टात येईल, असे स्पष्टीकरण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने सोमवारी पार पडलेल्या महासभेत दिले. २७ गावांच्या पाणीबिलापोटी असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी भरली जात नसल्याने या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस एमआयडीसीने बजावली होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थ हवालदिल झाले होते. या प्रश्नावर नगरसेवक रमाकांत पाटील यांनी महासभेत सभा तहकुबीची सूचना मांडली होती. त्यावर चर्चा झाली. या वेळी पाण्याची समस्या केवळ २७ गावांत नसून शहरातही आहे. पाण्याचा प्रश्न शहरालाही तितकाच भेडसावतो आहे, असे म्हणणे अधिकाऱ्यांनी मांडले.भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पालिकेचे अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप केला. पालिकेने २७ गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जो आराखडा मंजूर केला आहे, त्याच्या कामाला अद्याप प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. बोअरवेल खोदल्या जात असल्या, तरी पाणी लागत नसल्याने त्या खोदून काय उपयोग होणार, असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले, पाण्यासाठी जो कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, तो २० कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आणखी १५ दिवस लागतील. त्यात वितरण व्यवस्था सुधारणे, जलकुंभ बांधणे, यांचा समावेश आहे. ही कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार आहेत. पाणीबिलाच्या थकबाकीवर निर्णय होणे बाकी...२७ गावांच्या थकबाकीसंदर्भात आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, एमआयडीसीने २७ गावांच्या पाणीबिलाची थकबाकी ७२ कोटी ६६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. ही थकबाकीची रक्कम एकाच हप्त्यात भरणे शक्य नाही. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यावर त्यांना मालमत्ताकर जरी लागू केला, तरी किमान सहा वर्षे तरी जुनीच करप्रणाली असावी, असा नियम आहे. गावे ग्रामपंचायतीत होती. त्यानुसार, एमआयडीसीने दर आकारावे. त्यांनी गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यावर महापालिकेचा दर आकारून थकबाकी दाखवली आहे. एमआयडीसीला महापालिकेने दर कमी करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात एमआयडीसीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक होऊन त्यावर तोडगा काढला जाणार आहे. जलस्वराज्य योजनेतील कामे अपूर्ण...२७ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलस्वराज्य योजनेंर्तगत कामे केली आहेत. त्यासाठी त्यांनी जलवाहिन्या टाकल्या होत्या. जलवाहिन्या टाकल्या, पण जलसाठवणुकीसाठी उभारलेले जलकुंभ कमी उंचीचे असल्याने त्यातून योग्य प्रकारे पाण्याचे वितरण होऊ शकत नाही. जलस्वराज्य योजनेचे काम अपूर्णच असल्याने केवळ निधी खर्च झाला आहे, असे कार्यकारी अभियंता जुनेजा यांनी निदर्शनास आणले. नगरसेविकेच्या मुलाची महिलांना शिवीगाळअंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील भेंडीपाडा येथील अपक्ष नगरसेविका हिराबाई जावीर यांच्या मुलाने प्रभागातील महिलांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रभागातील सांडपाणी हे आपल्या घरासमोर साठत असल्याने ते साफ करावे, अशी तक्र ार प्रतिमा जाधव आणि पाच महिला करण्यासाठी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास जावीर यांच्या घरी गेल्या होत्या. मात्र, सफाई करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे सांगून त्यांच्या मुलाने या महिलांना शिवीगाळ केली. या प्रकरणी प्रतिमा जाधव यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्र ार केली असता त्याच्याविरोधत अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे.