शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

२७ गावांचा पाणीप्रश्न कायमच राहणार

By admin | Updated: March 1, 2016 02:34 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना सध्या एमआयडीसी पाणीपुरवठा करते. या गावांत सध्या पाण्याची समस्या तीव्र आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना सध्या एमआयडीसी पाणीपुरवठा करते. या गावांत सध्या पाण्याची समस्या तीव्र आहे. ज्या वेळी या गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अमलात येईल, तेव्हाच तेथील पाणीटंचाई संपुष्टात येईल, असे स्पष्टीकरण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने सोमवारी पार पडलेल्या महासभेत दिले. २७ गावांच्या पाणीबिलापोटी असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी भरली जात नसल्याने या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस एमआयडीसीने बजावली होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थ हवालदिल झाले होते. या प्रश्नावर नगरसेवक रमाकांत पाटील यांनी महासभेत सभा तहकुबीची सूचना मांडली होती. त्यावर चर्चा झाली. या वेळी पाण्याची समस्या केवळ २७ गावांत नसून शहरातही आहे. पाण्याचा प्रश्न शहरालाही तितकाच भेडसावतो आहे, असे म्हणणे अधिकाऱ्यांनी मांडले.भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पालिकेचे अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप केला. पालिकेने २७ गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जो आराखडा मंजूर केला आहे, त्याच्या कामाला अद्याप प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. बोअरवेल खोदल्या जात असल्या, तरी पाणी लागत नसल्याने त्या खोदून काय उपयोग होणार, असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले, पाण्यासाठी जो कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, तो २० कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आणखी १५ दिवस लागतील. त्यात वितरण व्यवस्था सुधारणे, जलकुंभ बांधणे, यांचा समावेश आहे. ही कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार आहेत. पाणीबिलाच्या थकबाकीवर निर्णय होणे बाकी...२७ गावांच्या थकबाकीसंदर्भात आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, एमआयडीसीने २७ गावांच्या पाणीबिलाची थकबाकी ७२ कोटी ६६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. ही थकबाकीची रक्कम एकाच हप्त्यात भरणे शक्य नाही. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यावर त्यांना मालमत्ताकर जरी लागू केला, तरी किमान सहा वर्षे तरी जुनीच करप्रणाली असावी, असा नियम आहे. गावे ग्रामपंचायतीत होती. त्यानुसार, एमआयडीसीने दर आकारावे. त्यांनी गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यावर महापालिकेचा दर आकारून थकबाकी दाखवली आहे. एमआयडीसीला महापालिकेने दर कमी करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात एमआयडीसीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक होऊन त्यावर तोडगा काढला जाणार आहे. जलस्वराज्य योजनेतील कामे अपूर्ण...२७ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलस्वराज्य योजनेंर्तगत कामे केली आहेत. त्यासाठी त्यांनी जलवाहिन्या टाकल्या होत्या. जलवाहिन्या टाकल्या, पण जलसाठवणुकीसाठी उभारलेले जलकुंभ कमी उंचीचे असल्याने त्यातून योग्य प्रकारे पाण्याचे वितरण होऊ शकत नाही. जलस्वराज्य योजनेचे काम अपूर्णच असल्याने केवळ निधी खर्च झाला आहे, असे कार्यकारी अभियंता जुनेजा यांनी निदर्शनास आणले. नगरसेविकेच्या मुलाची महिलांना शिवीगाळअंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील भेंडीपाडा येथील अपक्ष नगरसेविका हिराबाई जावीर यांच्या मुलाने प्रभागातील महिलांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रभागातील सांडपाणी हे आपल्या घरासमोर साठत असल्याने ते साफ करावे, अशी तक्र ार प्रतिमा जाधव आणि पाच महिला करण्यासाठी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास जावीर यांच्या घरी गेल्या होत्या. मात्र, सफाई करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे सांगून त्यांच्या मुलाने या महिलांना शिवीगाळ केली. या प्रकरणी प्रतिमा जाधव यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्र ार केली असता त्याच्याविरोधत अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे.