शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

२७ गावांचे पाणी एमआयडीसी तोडणार?

By admin | Updated: February 17, 2016 02:02 IST

अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आधीच ३० टकके पाणीकपातीचे संकट ओढवले असताना कोट्यवधींच्या थकबाकीप्रकरणी एमआयडीसीने केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांना नोटीस बजावली आहे

कल्याण : अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आधीच ३० टकके पाणीकपातीचे संकट ओढवले असताना कोट्यवधींच्या थकबाकीप्रकरणी एमआयडीसीने केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांना नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपूर्वी थकीत बिले नाही भरली तर तेथील पाणीपुरवठा खंडीत करू असा पवित्रा एमआयडीसीने घेतल्याने आता पाणी बंद करण्यावरून संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.गेल्या वर्षी जूनला या गावांचा केडीएमसीत समावेश झाला. २००२ मध्ये गावे वगळल्यानंतर आजतागायत पाणीपुरवठ्याच्या बिलांची थकबाकी १०० कोटीच्या आसपास आहे. ज्यावेळेस गावांचा कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू होता त्यावेळेस थकीत बिलांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, २००८ मध्ये बिलापोटी ३२ लाख रूपयांचा केलेल्या भरणा व्यतिरिक्त कोणतीही थकबाकी अद्यापपर्यंत भरली गेलेली नसल्याकडे एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी लक्ष वेधले आहे. २७ गावांपैकी आशेळे- माणेरे आणि दावडी या गावांनी थकीत बिले भरली असून सर्वाधिक सव्वाआठ कोटींची थकबाकी भोपर गावाची आहे.यापूर्वी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला असून सद्यस्थितीत केडीएमसीला देखील वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे जगताप म्हणाले. राजकीय दबावामुळे यापूर्वीची कारवाई ठोसपणे केली नसल्याची कबूली देत थकीत बिलांसाठी दीड महिन्यांचा कालावधी दिला आहे. बिले न भरल्यास पाणीपुरवठा खंडीत करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे जगताप म्हणाले. थकीत पाणी बिलासंदर्भात दोन वेळा खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली असून बिले भरण्याबाबत जि.प.अथवा केडीएमसीने जबाबदारी घ्यावी.