शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२७ गावांचे पाणी एमआयडीसी तोडणार?

By admin | Updated: February 17, 2016 02:02 IST

अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आधीच ३० टकके पाणीकपातीचे संकट ओढवले असताना कोट्यवधींच्या थकबाकीप्रकरणी एमआयडीसीने केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांना नोटीस बजावली आहे

कल्याण : अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आधीच ३० टकके पाणीकपातीचे संकट ओढवले असताना कोट्यवधींच्या थकबाकीप्रकरणी एमआयडीसीने केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांना नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपूर्वी थकीत बिले नाही भरली तर तेथील पाणीपुरवठा खंडीत करू असा पवित्रा एमआयडीसीने घेतल्याने आता पाणी बंद करण्यावरून संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.गेल्या वर्षी जूनला या गावांचा केडीएमसीत समावेश झाला. २००२ मध्ये गावे वगळल्यानंतर आजतागायत पाणीपुरवठ्याच्या बिलांची थकबाकी १०० कोटीच्या आसपास आहे. ज्यावेळेस गावांचा कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू होता त्यावेळेस थकीत बिलांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, २००८ मध्ये बिलापोटी ३२ लाख रूपयांचा केलेल्या भरणा व्यतिरिक्त कोणतीही थकबाकी अद्यापपर्यंत भरली गेलेली नसल्याकडे एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी लक्ष वेधले आहे. २७ गावांपैकी आशेळे- माणेरे आणि दावडी या गावांनी थकीत बिले भरली असून सर्वाधिक सव्वाआठ कोटींची थकबाकी भोपर गावाची आहे.यापूर्वी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला असून सद्यस्थितीत केडीएमसीला देखील वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे जगताप म्हणाले. राजकीय दबावामुळे यापूर्वीची कारवाई ठोसपणे केली नसल्याची कबूली देत थकीत बिलांसाठी दीड महिन्यांचा कालावधी दिला आहे. बिले न भरल्यास पाणीपुरवठा खंडीत करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे जगताप म्हणाले. थकीत पाणी बिलासंदर्भात दोन वेळा खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली असून बिले भरण्याबाबत जि.प.अथवा केडीएमसीने जबाबदारी घ्यावी.