शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

२७ गावांचे पाणी झाले स्वस्त!

By admin | Updated: January 20, 2016 01:56 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांना ५० टक्के सबसिडी देऊन महापालिकेच्या दरानुसार पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांना ५० टक्के सबसिडी देऊन महापालिकेच्या दरानुसार पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. पाणीपुरवठा करणा-या एमआयडीसीशी पत्रव्यवहार करण्यात आला असून महापालिकेचे दर लागू करण्यासंदर्भात लवकरच एमआयडीसीचे अधिकारी, आयुक्त आणि महापौर यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी महासभेला दिली.केडीएमसी क्षेत्रातून वगळण्यात आलेल्या २७ गावांचा गेल्या वर्षी १ जूनला पालिकेत समावेश करण्यात आला. परंतु अजूनही तेथे एमआयडीसी पाणीपुरवठा करते. त्यांचे दर जादा असल्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना महापालिकेच्या म्हणजे सात रूपये दराने पाणीपुरवठा करण्याची मागणी २७ गावांमधील सदस्यांनी महासभेत केली. गावांना सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्याप्रमाणे याचीही अंमलबजावणी व्हावी, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.२७ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे एमआयडीसीने पुरवठा वाढवुन दिल्यास अथवा त्यांच्याच माध्यमातून पाणी मिळाले, तरच गावांना महापालिका पाणी देऊ शकते, हा मुद्दाही यावेळी उपस्थित झाला. एमआयडीसीकडून गावांसाठी ५० एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून निवासी भागासह कंपन्या, मोठी गृहसंकुले आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीचे पाणी वापरून महापालिका दराने द्यायचे असेल तर त्यांना ५० टक्के सबसिडी द्यावी लागेल. त्या अनुषंगाने आगामी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी लागेल. (प्रतिनिधी)