शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

२७ गावांचा फैसला दोन आठवड्यांत

By admin | Updated: March 18, 2017 03:48 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याच्या आणि त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या या मागणीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीने उच्च न्यायालयात

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याच्या आणि त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या या मागणीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका घ्यावी लागणार आहे. २७ गावे वगळण्याच्या मागणीला भाषणात अनुकूलता दर्शवणारे मुख्यमंत्री प्रत्यक्षात निर्णय घेत नसल्याचा मुद्दा संघर्ष समितीने मांडला. गावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण केली की नाही, याविषयी न्यायालयाला कळवण्यात येईल. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने कागदपत्रांची पूर्तता करता येत नाही. त्यामुळे त्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी द्यावा, अशी विनंती राज्य सरकारने १५ मार्चच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात केली. मात्र ती न्यायालयाने फेटाळली. एक महिना कशाला हवा आहे? दोन आठवड्यांत कागदपत्रांची पूर्तता करून राज्य सरकारने गावे वगळण्याप्रकरणी म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधीपासून या विषयावर असलेली संदिग्धता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. परिणामी, तेथे विकासकामे करायची की नाहीत, हेही पालिकेला ठरविता येईल. या याचिकेवर संघर्ष समितीतर्फे अ‍ॅड. अस्मिता सारंगधर काम पाहत आहेत. दोन आठवड्यात या प्रश्नावर सरकारची नेमकी भूमिका काय आहे ते समजेल, असे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे म्हणाले. (प्रतिनिधी)एकदाचा सोक्षमोक्ष लागेल!२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिका स्थापनेच्या मागणीवर हरकती सूचना मागवण्यात आल्या. त्याची सुनावणी कोकण विभागीय आयुक्तांकडे झाली. त्यानंतर सरकारने १ जून २०१५ ला गावे पालिकेत समाविष्ट केली. पालिका निवडणूक जाहीर झाल्यावर राज्य सरकारने ७ सप्टेंबर २०१६ ला प्राथमिक अधिसूचना काढून गावे वगळण्यासाठी हरकती सूचना मागवल्या. त्याला निवडणूक आयोगाने हरकत घेतली. त्यानंतर दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी गावे वगळण्याच्या मागणीस अनुकूलता दर्शवली आहे. या संदिग्धतेमुळे पालिकेला ठोस कामे करता येत नाहीत. न्यायालयात भूमिका मांडल्यानंतर या प्रकरणाचा एकदाच सोक्षमोक्ष लागेल.भाजपा नेते म्हणतात गावे पालिकेतच पालिकेतून २७ गावे वगळण्याचा मुद्दा संपला आहे. या गावांना आता उपमहापौरपदासारखे महत्वाचे पद मिळाल्याने त्या माध्यमातून गावांचा विकास करणार आहे, असे स्पष्टपणे सांगत भाजपाचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी या मुद्द्याला पूर्णविराम दिला. त्यामुळे २७ गावांबाबत भाजपाची भूमिका ठरल्याचे मानले जाते. ही गावे पालिकेतून वगळण्यास शिवसेनेचा विरोध आहे. काही नगरसेवकांनी गावे महापालिकेतच रहावी, या बाजूने सह्यांचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.