शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

२७ गावांचा निकाल जुलैत लागणार? महापालिका की स्वतंत्र नगरपालिका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:19 IST

स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत कोणतेही कर भरण्यास विरोध करत २७ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पालिकेच्या अन्य करांनाही विरोध केला आहे. त्याचवेळी ही गावे पालिकेत राहतात की नाही, हे ठरत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकाही त्या भागात एकही मोठा प्रकल्प राबवू शकत नाही.

कल्याण - स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत कोणतेही कर भरण्यास विरोध करत २७ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पालिकेच्या अन्य करांनाही विरोध केला आहे. त्याचवेळी ही गावे पालिकेत राहतात की नाही, हे ठरत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकाही त्या भागात एकही मोठा प्रकल्प राबवू शकत नाही. शिवसेनेला गावे महापालिकेच हवी आहेत, पण या गावांतील आपल्याच नेत्यांच्या गुंतवणुकीमुळे भाजपाची भूमिका संदिग्ध आहे. त्यातही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिकेत राहूनच या गावांचा विकास शक्य असल्याचे मत मांडले होते. त्यातून निर्माण झालेल्या कोंडीवर जुलैपर्यंत मार्ग निघण्याची चिन्हे आहेत.या गावांप्रश्नी सगळी प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सरकारला दिले आहे. त्यामुळे २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करायची की गावे महापालिकेतच ठेवायची याचा सोक्षमोक्ष तोवर लागण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.याबाबतचा प्रश्न जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केला होता. ही गावे जून २०१५ मध्ये महापालिकेत समाविष्ट केली. प्रभाग रचना व निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ७ सप्टेंबरला राज्य सरकारने अधिसूचना काढून पुन्हा गावे महापालिकेतून वेगळी करण्यासाठी हरकती सूचना मागवल्या. त्याला निवडणूक आयोगाने हरकत घेतली. निवडणुकीनंतरच ही प्रक्रिया राबवा, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी या गावांतील संघर्ष समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर अन्य दोन याचिकाही उच्च न्यायालयात आहेत. न्यायालयाने या प्रकरणी सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिला होता. पण सरकारने म्हणणे न मांडल्याने याचिकेवरील सुनावणी पुढे सरकलेली नाही. फेब्रुवारीत याचिकेवर सुनावणी अपेक्षित होती. ती झालेली नाही. २०१६ च्या विधीमंडळ अधिवेशनात शिंदे यांनी २७ गावांविषयी प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा कोकण विभागीय आयुक्तांकडून कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. पण त्याचा अहवाल न मिळाल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशात शिंदे यांनी हाच प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित केल्यावर त्यांना तसेच उत्तर देण्यात आले, हा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. पालिकेच्या हद्दीतील १३ बीओटी प्रकल्पांपैकी अनेक पूर्ण झालेले नाहीत. काही प्रकरणे न्यायालयात आहेत. या विषयी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याचा अहवाल आयुक्तांनी पाच वर्षांनी सरकार सादर केला. त्याचीच पुनरावृत्ती २७ गावांबाबत होऊ शकते, याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले. या मुद्द्यावरील चर्चेत सदस्य अनिल परब व जयंत पाटील यांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर रणजीत पाटील यांनीही चर्चेच्या मुद्याला दुजोरा दिला.अनधिकृत बांधकामांचे काय?सध्या या गावातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा गाजतो आहे. या गावांत ७९ हजार बेकायदा बांधकामे आहेत. शिवाय आणखी एक हजार बेकायदा बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे महापालिकेचा ७०० कोटीचा महसूल बुडत आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी राज्य सरकारकडे याविषयी तक्रार केली आहे. या गावातील आरक्षित जागेवरील बेकायदा इमारतीतील घरांचे रजिस्ट्रेशन बंद आहे.बेकायदा बांधकामांमुळे सरकारचा ३४ हजार ९८० कोटींचा महसूल बुडाला आहे. या गावात केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत १८० कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. पण स्वतंत्र नगरपालिका केल्याशिवाय कल्याण ग्रोथ सेंटर उभारु दिले जाणार नाही, तसेच मालमत्ता कर भरणार नाही असा पावित्रा सर्वपक्षीय संघर्ष समितीने यापूर्वीच जाहीर केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली