शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

२७ गावांचा निकाल जुलैत लागणार? महापालिका की स्वतंत्र नगरपालिका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:19 IST

स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत कोणतेही कर भरण्यास विरोध करत २७ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पालिकेच्या अन्य करांनाही विरोध केला आहे. त्याचवेळी ही गावे पालिकेत राहतात की नाही, हे ठरत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकाही त्या भागात एकही मोठा प्रकल्प राबवू शकत नाही.

कल्याण - स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत कोणतेही कर भरण्यास विरोध करत २७ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पालिकेच्या अन्य करांनाही विरोध केला आहे. त्याचवेळी ही गावे पालिकेत राहतात की नाही, हे ठरत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकाही त्या भागात एकही मोठा प्रकल्प राबवू शकत नाही. शिवसेनेला गावे महापालिकेच हवी आहेत, पण या गावांतील आपल्याच नेत्यांच्या गुंतवणुकीमुळे भाजपाची भूमिका संदिग्ध आहे. त्यातही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिकेत राहूनच या गावांचा विकास शक्य असल्याचे मत मांडले होते. त्यातून निर्माण झालेल्या कोंडीवर जुलैपर्यंत मार्ग निघण्याची चिन्हे आहेत.या गावांप्रश्नी सगळी प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सरकारला दिले आहे. त्यामुळे २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करायची की गावे महापालिकेतच ठेवायची याचा सोक्षमोक्ष तोवर लागण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.याबाबतचा प्रश्न जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केला होता. ही गावे जून २०१५ मध्ये महापालिकेत समाविष्ट केली. प्रभाग रचना व निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ७ सप्टेंबरला राज्य सरकारने अधिसूचना काढून पुन्हा गावे महापालिकेतून वेगळी करण्यासाठी हरकती सूचना मागवल्या. त्याला निवडणूक आयोगाने हरकत घेतली. निवडणुकीनंतरच ही प्रक्रिया राबवा, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी या गावांतील संघर्ष समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर अन्य दोन याचिकाही उच्च न्यायालयात आहेत. न्यायालयाने या प्रकरणी सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिला होता. पण सरकारने म्हणणे न मांडल्याने याचिकेवरील सुनावणी पुढे सरकलेली नाही. फेब्रुवारीत याचिकेवर सुनावणी अपेक्षित होती. ती झालेली नाही. २०१६ च्या विधीमंडळ अधिवेशनात शिंदे यांनी २७ गावांविषयी प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा कोकण विभागीय आयुक्तांकडून कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. पण त्याचा अहवाल न मिळाल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशात शिंदे यांनी हाच प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित केल्यावर त्यांना तसेच उत्तर देण्यात आले, हा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. पालिकेच्या हद्दीतील १३ बीओटी प्रकल्पांपैकी अनेक पूर्ण झालेले नाहीत. काही प्रकरणे न्यायालयात आहेत. या विषयी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याचा अहवाल आयुक्तांनी पाच वर्षांनी सरकार सादर केला. त्याचीच पुनरावृत्ती २७ गावांबाबत होऊ शकते, याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले. या मुद्द्यावरील चर्चेत सदस्य अनिल परब व जयंत पाटील यांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर रणजीत पाटील यांनीही चर्चेच्या मुद्याला दुजोरा दिला.अनधिकृत बांधकामांचे काय?सध्या या गावातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा गाजतो आहे. या गावांत ७९ हजार बेकायदा बांधकामे आहेत. शिवाय आणखी एक हजार बेकायदा बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे महापालिकेचा ७०० कोटीचा महसूल बुडत आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी राज्य सरकारकडे याविषयी तक्रार केली आहे. या गावातील आरक्षित जागेवरील बेकायदा इमारतीतील घरांचे रजिस्ट्रेशन बंद आहे.बेकायदा बांधकामांमुळे सरकारचा ३४ हजार ९८० कोटींचा महसूल बुडाला आहे. या गावात केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत १८० कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. पण स्वतंत्र नगरपालिका केल्याशिवाय कल्याण ग्रोथ सेंटर उभारु दिले जाणार नाही, तसेच मालमत्ता कर भरणार नाही असा पावित्रा सर्वपक्षीय संघर्ष समितीने यापूर्वीच जाहीर केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली