शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

२७ गावे संघर्ष समिती राष्ट्रवादीच्या वळचणीला

By admin | Updated: July 25, 2016 02:58 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवेळी भाजपासोबत गेलेल्या २७ गावे संघर्ष समितीने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवेळी भाजपासोबत गेलेल्या २७ गावे संघर्ष समितीने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आहे. भाजपा आणि मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपुरता आमचा वापर केला आणि फसवणूक केल्याची टीका त्यांच्या नेत्यांनी केली. ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून गावांत फूट पाडण्याच्या केलेल्या प्रयत्नांबद्दल संताप व्यक्त करून त्याला विरोध करण्याचा पुनरुच्चारही या गावांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केला. २७ गावे समिती सर्वपक्षीय असली तरी ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हाती असल्याने शिवसेनेने समितीच्या महापालिकेतून वेगळे होण्याच्या मागणीला विरोध केला. तसेच निवडणुकीवरील या गावांचा बहिष्कार मोडीत काढून शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने संघर्ष समितीची जाहीर सभा घेतली. त्यात ही २७ गावे वेगळी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र, निवडणुका झाल्यावरही ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केल्याची संघर्ष समितीची भावना झाली. त्यातच, या २७ गावांतील १० गावांमध्ये कल्याण ग्रोेंथ सेंटर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्याला समितीने विरोध केला. भाजपाने संघर्ष समितीचा राजकीय वापर करून घेतला. समितीची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केल्याने आता ही समिती राष्ट्रवादीचीच आहे. राष्ट्रवादीतर्फेच आम्ही लढा देणार, असे समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे व अर्जुन चौधरी यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीर केले. मेळाव्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी समितीला कानपिचक्या दिल्या होत्या.