शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

२७ कोटींचा खर्च कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST

ठाणे : डायघर येथील कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविणे अशक्य असल्याचा साक्षात्कार महापालिकेला तब्बल १२ वर्षांनंतर झाला आहे. त्यामुळे ...

ठाणे : डायघर येथील कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविणे अशक्य असल्याचा साक्षात्कार महापालिकेला तब्बल १२ वर्षांनंतर झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची तयारी पालिकेने केली आहे. परंतु हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आलेला सुमारे २७ कोटींचा खर्चही आता पाण्यात जाण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प ठाणेकरांसाठी आदर्श ठरावा यासाठी सल्लागार नेमण्यात आला होता. एका कंपनीला या प्रकल्पाचा अभ्यास करण्याचे काम दिले होते. परंतु तो खर्चही आता कचऱ्यात जाण्याची शक्यता आहे.

ठाणे शहरात निर्माण होणाऱ्या ९६३ मेट्रिक टन कचऱ्यावर आजही शास्त्रोक्त प्रक्रिया होत नाही. तरीही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्यासाठी ठाणेकरांवर दडपशाहीचे धोरण पालिका राबवीत आहे. पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. त्यामुळे शहरातील कचरा दिवा येथील डम्पिंगवर टाकला जात आहे. शहराच्या विविध भागात छोटेमोठे प्रकल्प हाती घेतले असले तरी त्यातूनही पालिकेला काही खास असे करता आलेले नाही. डम्पिंगचा प्रश्न सुटत नसल्याने आणि कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावता येणे शक्य नसल्याने पालिकेचा स्वच्छ शहरांच्या यादीतील क्रमांक घसरला आहे.

दरम्यान, शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी १२ वर्षांपूर्वी डायघर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. परंतु या प्रकल्पाला विरोध झाल्याने पालिकेला तो यशस्वी करता आला नाही. त्यानंतर या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सर्व सोपस्कार करण्यात आले. या प्रकल्पालाही स्थानिकांचा विरोध होता. परंतु तो विरोध शांत करण्यात पालिकेला यश आले.

................

असा केला खर्च

हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेने ५ लाखांचा खर्च करून सल्लागाराची नियुक्ती केली. तसेच दुसऱ्या कंपनीला २० लाख देऊन याचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या ठिकाणी जाण्यासाठी पालिकेने ४ पदरी रस्ता बांधला आहे. हा रस्ता डम्पिंगसोबत येथील गावातही जात आहे. त्यामुळे त्याचा गावकऱ्यांना काही अंशी फायदा आहे. यासाठी २० कोटींचा खर्च करण्यात आला होता. याशिवाय येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी ७ कोटींचा खर्च करण्यात आला होता. त्यानुसार हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आतापर्यंत सुमारे २७ कोटींवर खर्च केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. याठिकाणी वृक्ष लागवडही केली असून, त्यासाठी काही लाखांचा खर्च झाल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.