शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

हरित कचऱ्यापासून २६० टन जळाऊ इंधनाची निर्मिती

By admin | Updated: March 15, 2017 02:25 IST

शहरात निर्माण होणाऱ्या विविध स्वरुपाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प ठाणे महापालिका आयुक्तांनी हाती घेतले आहेत.

ठाणे : शहरात निर्माण होणाऱ्या विविध स्वरुपाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प ठाणे महापालिका आयुक्तांनी हाती घेतले आहेत. त्यानुसार हरित कचऱ्यापासून आतापर्यंत २६० टन जळाऊ इंधनाची निर्मिती केली असून त्याचा पुरवठा येत्या १ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बॉयलरसाठी करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबवण्यापूर्वी महापालिकेला बॉयलरसाठी इंधन विकत घ्यावे लागत होते. यासाठी एका टनासाठी प्रतिदिन ८ हजार रु पये खर्च येत होता. परंतु, आता समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने राबवलेल्या या प्रकल्पामुळे शहरातील हरित कचऱ्याचा प्रश्न निकालात निघून इंधन खरेदीचा खर्चदेखील वाचला आहे. भविष्यात ठाण्यातील काही कंपन्यांनादेखील या इंधनाचा पुरवठा करण्याचा महापालिकेचा मानस आहे. प्लास्टीकपासून इंधन निर्मिती करण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला असतांनाच आता यापुढेही जाऊन शहरात प्रतीदिन निर्माण होणाऱ्या ५० टनाहून अधिक हरित कचरा एकित्रत करु न त्यापासून जळावू इंधन तयार करण्याचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठाने कार्यान्वित केला आहे. अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे. वृक्ष, झाडाच्या फांद्या, पाने, गवत असा मोठ्याप्रमाणात हरित कचरा शहरात निर्माण होत असून सध्या या कचऱ्याची तीन पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यामध्ये एक तर हा कचरा क्षेपणभूमीवर टाकला जातो, गृहसंकुलात तो जाळला जातो किंवा अडगळीच्या ठिकाणी टाकला जात आहे. परंतु, शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने तसेच हा कचरा जाळल्याने हवा प्रदूषित होऊन दुर्गंधी पसरत आहे. कचरा फेकून दिल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळचे त्याच्या व्यवस्थापनासाठी हरित कचऱ्यापासून जळाऊ इंधन हा महत्त्वकांक्षी प्रकल्प एप्रिल २०१६ ला सुरु केला. कोपरी येथील मलिन:सारण केंद्रावरील निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)