शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

पिण्याच्या पाण्यासाठी २५० कुटुंबाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:42 IST

शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे २५० कुटुंबाची परवड सुरू आहे. त्यांना निदान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून तीन वर्षापासून बांगडगल्लीतून पाणी पुरवले जात आहे

भिवंडी : शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे २५० कुटुंबाची परवड सुरू आहे. त्यांना निदान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून तीन वर्षापासून बांगडगल्लीतून पाणी पुरवले जात आहे. मात्र पाणीटंचाई असलेल्या भागातील नगरसेवक याकडे लक्ष देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.अंबिकानगर, संगमपाडा, इदगारोड, भारत नगर, डगलपाडा, आझमीनगर, समरूबाग व खाडीपार भागातील सुमारे २५० कुटुंबांना नियमित पिण्याचे पाणी मिळत नाही. या भागात बहुतांश यंत्रमाग कामगार असून वारंवार मागणी करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या भागातील सुमारे २५० कुटुंबातील सदस्य सायकल, टेम्पो किंवा दुचाकीवर प्लास्टिकचे १० लिटरचे कॅन घेऊन शहरातील बांगडगल्ली परिसरांत रात्रीच्यावेळी येतात. रोज ६०० ते ७०० प्लास्टिकच्या कॅनमधून पिण्याचे पाणी वाहून घेऊन जातात. हा प्रकार तीन वर्षापासून सुरू आहे. रात्री दहा ते अडीचपर्यंत या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.तीन वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी खाडीपार भागातून एक मजूर या भागात आला असता बांगड गल्लीतील शकील हबीबुल्ला यांनी आपल्या इमारतीच्या नळातून प्लास्टिकचा कॅन भरून दिला. तो नियमित कॅन भरून घेऊन जाऊ लागला. आपल्याकडे आलेल्या सर्वांना प्लास्टिकच्या कॅनमध्ये पाणी भरून देण्यास शकील यांनी सुरूवात केली. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी कुठलेच पाऊल उचलत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या बाबत खाडीपार येथील सायकलवरून पाणी वाहून नेणाऱ्या कामगारास विचारले असता तो म्हणाला की, आमच्या भागातील नेते गरीबांकडे लक्ष देत नाही. आम्ही यंत्रमागावर तर कधी मोलमजुरी करून कुटुंब पोसतो.