शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी २५० कुटुंबाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:42 IST

शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे २५० कुटुंबाची परवड सुरू आहे. त्यांना निदान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून तीन वर्षापासून बांगडगल्लीतून पाणी पुरवले जात आहे

भिवंडी : शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे २५० कुटुंबाची परवड सुरू आहे. त्यांना निदान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून तीन वर्षापासून बांगडगल्लीतून पाणी पुरवले जात आहे. मात्र पाणीटंचाई असलेल्या भागातील नगरसेवक याकडे लक्ष देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.अंबिकानगर, संगमपाडा, इदगारोड, भारत नगर, डगलपाडा, आझमीनगर, समरूबाग व खाडीपार भागातील सुमारे २५० कुटुंबांना नियमित पिण्याचे पाणी मिळत नाही. या भागात बहुतांश यंत्रमाग कामगार असून वारंवार मागणी करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या भागातील सुमारे २५० कुटुंबातील सदस्य सायकल, टेम्पो किंवा दुचाकीवर प्लास्टिकचे १० लिटरचे कॅन घेऊन शहरातील बांगडगल्ली परिसरांत रात्रीच्यावेळी येतात. रोज ६०० ते ७०० प्लास्टिकच्या कॅनमधून पिण्याचे पाणी वाहून घेऊन जातात. हा प्रकार तीन वर्षापासून सुरू आहे. रात्री दहा ते अडीचपर्यंत या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.तीन वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी खाडीपार भागातून एक मजूर या भागात आला असता बांगड गल्लीतील शकील हबीबुल्ला यांनी आपल्या इमारतीच्या नळातून प्लास्टिकचा कॅन भरून दिला. तो नियमित कॅन भरून घेऊन जाऊ लागला. आपल्याकडे आलेल्या सर्वांना प्लास्टिकच्या कॅनमध्ये पाणी भरून देण्यास शकील यांनी सुरूवात केली. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी कुठलेच पाऊल उचलत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या बाबत खाडीपार येथील सायकलवरून पाणी वाहून नेणाऱ्या कामगारास विचारले असता तो म्हणाला की, आमच्या भागातील नेते गरीबांकडे लक्ष देत नाही. आम्ही यंत्रमागावर तर कधी मोलमजुरी करून कुटुंब पोसतो.