शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीपुरताच केला २५ दशलक्ष पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 23:50 IST

काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर आरोप; नागरिकांना भेडसावतेय टंचाई

मीरा रोड : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदरमध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी सत्ताधारी भाजपने २५ दशलक्ष लीटर पाणी नागरिकांना दिले. नंतर हे पाणी बंद केले, असा आरोप बुधवारी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात काही महिन्यांपासून नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे ,असे काँग्रेसने म्हटले आहे.नागरिकांना खाजगी अथवा पालिकेचा टँकर मागवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. टंचाईबाबत आमदार गीता जैन, प्रताप सरनाईक तसेच महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी थेट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पत्र पाठवून विचारणा केली. त्यावर महामंडळाने महापौरांना दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की , मीरा-भार्इंदरला मंजूर पाणीकोट्यातील २५ दशलक्ष लीटर पाणी हे २०१९ च्या पावसाळ्यापुरते तात्पुरत्या स्वरूपात दिले होते. हे पाणी मार्चपासून बंद केलेले आहे. १ मार्च ते ३१ आॅगस्टदरम्यान महामंडळाने महापालिकेत मंजूर कोट्यानुसार प्रतिदिवस सरासरी ९९.२१ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केलेला आहे, असे स्पष्ट केले आहे.महामंडळाने दिलेल्या उत्तरानंतर भाजप अडचणीत आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत, गीता परदेशी, अशरफ शेख आदींनी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी भाजप, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्यावर नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला.हे पाणी कायम असल्याचे भासवून शहरात मोठ्या संख्येने नवीन नळजोडण्या दिल्या गेल्या. नागरिकांनी नळजोडणीसाठी लाखो रुपये खर्च केले. पण, नळजोडण्या घेऊन नळाला पाणी नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून २५ दशलक्ष लीटर पाणी आम्ही नागरिकांना मिळवून देऊ, असे सामंत म्हणाले.एमआयडीसी, पालिका अधिकाऱ्यांची महापौरांनी घेतली बैठक२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा तात्पुरता पावसाळ््या पुरता म्हणून देऊन तो आता बंद केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड काँग्रेस सह विविध स्तरातून उठली आहे. त्यामुळे महापौरांनीही तातडीने या बाबत भाजप नगरसेवकांना घेऊन एमआयडीसी व पालिका अधिकाºयांची गुुरु वारी बैठक घेतली. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी बोलावलेल्या बैठकीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त , पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व एमआयडीसीचे अधिकारी तसेच भाजपच्या नागरसेवकांसह माजी आमदार नरेंद्र मेहताही उपस्थित होते . मीरा भार्इंदर साठी एमआयडीसीकडे मंजूर १२५ दशलक्ष लिटर इतके पूर्ण पाणी मिळावे, तांत्रिक बिघाडामुळे कमी दिलेले पाणी शहराला द्यावे, वारंवार होणाºया बिघाडांवर तोडगा काढावा. तर आयुक्त देखील स्वत: एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना भेटून पाणी समस्येवर चर्चा करतील असे महापौरांनी सांगितले .