शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीपुरताच केला २५ दशलक्ष पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 23:50 IST

काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर आरोप; नागरिकांना भेडसावतेय टंचाई

मीरा रोड : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदरमध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी सत्ताधारी भाजपने २५ दशलक्ष लीटर पाणी नागरिकांना दिले. नंतर हे पाणी बंद केले, असा आरोप बुधवारी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात काही महिन्यांपासून नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे ,असे काँग्रेसने म्हटले आहे.नागरिकांना खाजगी अथवा पालिकेचा टँकर मागवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. टंचाईबाबत आमदार गीता जैन, प्रताप सरनाईक तसेच महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी थेट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पत्र पाठवून विचारणा केली. त्यावर महामंडळाने महापौरांना दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की , मीरा-भार्इंदरला मंजूर पाणीकोट्यातील २५ दशलक्ष लीटर पाणी हे २०१९ च्या पावसाळ्यापुरते तात्पुरत्या स्वरूपात दिले होते. हे पाणी मार्चपासून बंद केलेले आहे. १ मार्च ते ३१ आॅगस्टदरम्यान महामंडळाने महापालिकेत मंजूर कोट्यानुसार प्रतिदिवस सरासरी ९९.२१ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केलेला आहे, असे स्पष्ट केले आहे.महामंडळाने दिलेल्या उत्तरानंतर भाजप अडचणीत आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत, गीता परदेशी, अशरफ शेख आदींनी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी भाजप, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्यावर नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला.हे पाणी कायम असल्याचे भासवून शहरात मोठ्या संख्येने नवीन नळजोडण्या दिल्या गेल्या. नागरिकांनी नळजोडणीसाठी लाखो रुपये खर्च केले. पण, नळजोडण्या घेऊन नळाला पाणी नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून २५ दशलक्ष लीटर पाणी आम्ही नागरिकांना मिळवून देऊ, असे सामंत म्हणाले.एमआयडीसी, पालिका अधिकाऱ्यांची महापौरांनी घेतली बैठक२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा तात्पुरता पावसाळ््या पुरता म्हणून देऊन तो आता बंद केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड काँग्रेस सह विविध स्तरातून उठली आहे. त्यामुळे महापौरांनीही तातडीने या बाबत भाजप नगरसेवकांना घेऊन एमआयडीसी व पालिका अधिकाºयांची गुुरु वारी बैठक घेतली. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी बोलावलेल्या बैठकीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त , पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व एमआयडीसीचे अधिकारी तसेच भाजपच्या नागरसेवकांसह माजी आमदार नरेंद्र मेहताही उपस्थित होते . मीरा भार्इंदर साठी एमआयडीसीकडे मंजूर १२५ दशलक्ष लिटर इतके पूर्ण पाणी मिळावे, तांत्रिक बिघाडामुळे कमी दिलेले पाणी शहराला द्यावे, वारंवार होणाºया बिघाडांवर तोडगा काढावा. तर आयुक्त देखील स्वत: एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना भेटून पाणी समस्येवर चर्चा करतील असे महापौरांनी सांगितले .