शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाण्याचे थकीत २३३ कोटी कधी देणार?

By admin | Updated: May 3, 2017 05:26 IST

केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावे आणि दिव्याला अतिरिक्त २५ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या

अनिकेत घमंडी / डोंबिवलीकेडीएमसीच्या हद्दीतील २७ गावे आणि दिव्याला अतिरिक्त २५ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. असे असले तरीही केडीएमसी थकीत पाणीबीलापोटी २३३ कोटी रुपये देणे आहे. ते कधी देणार?, असा सवाल एमआयडीसीने केला आहे. मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये महापालिकेने अवघे पाच कोटी रुपये अशाच एका बैठकीनंतर दिले होते. त्यानंतर प्रतीमहिना पाच कोटी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले आहे.पाणीबिला पोटीची निव्वळ थकबाकी ही ६४ कोटी ९१ लाख रुपयांची आहे. त्यापैकी ४५ कोटी १८ लाख रुपये हे केडीएमसीने, तर पूर्वीचे २७ गावांचे १९ कोटी ७३ लाख रुपये बील थकीत आहे. त्यावर १४० कोटी ६१ लाख रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे असे मिळून एकूण २३३ कोटी रुपये थकीत आहेत. महापालिका क्षेत्रासाठी पाच तर २७ गावांसाठी ३५, असे एकूण ४० एमएलडी पाणी एमआयडीसी सध्या केडीएमसीला पुरवत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १५ टक्के गळती गृहित धरली असून, त्यात पाणी चोरी, पाणी गळती, तसेच तूटही आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.थकीत बिलाची रक्कम सोडून एमआयडीसी दर महिन्याला महापालिकेला ९० लाख ते एक कोटी रुपयांचे पाणीबिल पाठवते. त्यापैकीही केवळ ५० टक्केच बील यंदाच्या वर्षी महापालिकेने भरले आहे, अशी माहिती समोर आली आहे. एकूण वर्षभरात २७ गावांचे आठ कोटी ३८ लाखांपैकी चार कोटी ६६ लाख भरले आहेत. महापालिकेला वितरित होणाऱ्या पाण्यापैकी एक कोटी तीन लाखांपैकी अवघे १४ लाखांचे बील वसूल करण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोट्यवधींच्या थकीत बिलाचा प्रश्न आताचा नसून तो अनेक वर्षांपासून आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य तो तोडगा काढावा. त्यानंतर महापालिका आणि एमआयडीसीचे अधिकारी बसून योग्य तो निर्णय घेतील. त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली