शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

अपघातांचे २३०१ ‘ब्लॅक स्पॉटस’, मोबाइल स्क्रीनवर कळणार धोकादायक जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:46 IST

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्गावरील जास्तीत जास्त अपघात होणाºया ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्गावरील जास्तीत जास्त अपघात होणा-या ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग, माळशेज घाट आणि पालघर, जव्हार परिसरातील रस्त्यांवरील अपघाती व अतिधोकादायक दोन हजार ३०१ ठिकाणांची नोंद ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट्स’ म्हणून झाली आहे. या ठिकाणांचे आता लवकरच जिओ टॅगिंग होणार आहे. यामुळे संबंधीत रस्त्यावरून धावणा-या वाहनातील स्क्रीन व मोबाइलवरही ‘अपघात स्थळ’ जवळ आल्याचे वाहनचालकास सूचित केले जाणार आहे.रस्ते अपघातात दरवर्षी १० टक्के घट करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांवरील ठिकठिकाणचे ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’ म्हणजे अतिधोकादायक अपघात ठिकाणं शोधण्याचे आदेश जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी महापालिकांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आदी यंत्रणांना दिले आहेत. आतापर्यंत दोन हजार ३०१ अपघाती व धोकादायक ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित करण्यासाठी तयार केलेल्या निकषांनुसार, कोणत्याही रस्त्यावरील ५०० मीटरच्या भागात गेल्या तीन वर्षांत किमान पाच अपघात झाले असल्यास त्या ठिकाणाचा ‘ब्लॅक स्पॉटस’ मध्ये समावेश केला जाणार आहे. ज्या अपघातांमध्ये किमान दहा व्यक्ती मृत अथवा गंभीर जखमी असतील असे अपघात ज्या ठिकाणी झाले आहेत त्यांना ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले जाणार आहे. या ‘ब्लॅक स्पॉट’ अपघात ठिकाणांचे जिओ टॅगिंग करून दरवर्षी सुमारे १० टक्के अपघातांमध्ये घट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.असे एक ना अनेक अपघात माळशेज घाटात या आधी झाल्याची नोंद आहे. भविष्यात या घाटातील सर्व अपघाती व धोकादायक ठिकाणांचे जिओ टॅगिंग केल्यावर मृत्यूचा सापळा अशी ओळख असलेल्या हा घाट सुरक्षित होईल, अशी अपेक्षा आहे. वाहनातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या अपघाती व धोकादायक ठिकाणांची पूर्वसूचना या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना दिली जाणार आहे.सर्वाजनिक बांधकाम विभाग १ चे बहुतांश क्षेत्र महापालिका कार्यक्षेत्रात येते. या विभागासह बांधकाम विभाग २ च्या १६८ किलोमीटरच्या जिल्हा मुख्य महामार्ग (एमडीआर) कार्यक्षेत्रात कोठेही अपघाती व धोकादायक ‘ ब्लॅक लिस्टेड स्पॉट ’ नसल्याचे अहवालावरून उघड झाले आहे. या अशा अपघाती रस्त्यांचा शोध घेऊन त्यांची नोंद करण्याची साधी कल्पनादेखील ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून जि.प.च्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष व निष्काळजीपणा दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची देखभाल करणाºया या बांधकाम विभागाला ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’ आढळून आले नसले तरी पालघर व जव्हार येथील बांधकाम विभागाने मात्र ७१ अपघाती ठिकाणे जिओ टॅगिंगसाठी शोधली आहेत.या अपघात स्थळांपैकी पालघर विभागाने ८६४ ठिकाणांची कायमस्वरूपी अपघात स्थळे म्हणून तर ५७ ठिकाणांची तात्पुरत्या स्वरूपाची अपघात स्थळे म्हणून नोंद केली आहे. पालघरमध्ये गेल्या तीन वर्षात ५४१ अपघातात ५३ जण जीवास मुकले, तर ४१९ गंभीर आणि ५७ किरकोळ जखमी झाल्याची नोंद आहे.याचप्रमाणे १०० ठिकाणेही कायमस्वरूपी अपघाताची ठिकाणे तर ५० तात्पुरत्या स्वरूपाच्या अपघातांची ठिकाणे असल्याची नोंद जव्हार विभागाने केली आहे. या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये गेल्या तीन वर्षात ७२ जणांचा मृत्यू झाला, तर ४३३ जण गंभीर जखमी झाले आणि ९२ जण किरकोळ जखमी झाले. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अपघातांवर मात करण्यासाठी जिओ टॅगिंग तातडीने करण्याची मागणी आहे.

ठाणे, पालघर जिल्ह्यातील क्षेत्रांचा समावेशमुंबई, नाशिक, पुणे, पालघर या भागांना जोडणारे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्याचप्रमाणे राज्य व जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची निवड प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे. या अपघाती व धोकादायक याठिकाणी बांधकाम विभागांनी आवश्यक ती दुरु स्ती करणे, दुभाजक नीटनेटके करणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगवणे, सावधानतेचे फलक लावणे, क्रेन, रुग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा आॅडिट आदी कामे सातत्याने करणे सक्तीचे करण्यात आले आहे.माळशेज घाटातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावर ठिकठिकाणी एक हजार २३० ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’ शोधण्यात आले, असे मुख्य कार्यकारी अभियंत्या तृप्ती नाग यांनी सांगितले. नागमोडी वळणाच्या माळशेज घाटात मागील वर्षी ट्रक दरीत पडल्याच्या दुर्दैवी घटनेसह बसचा अपघात होऊन प्रवाशाना जीव गमवावा लागला आहे. टेम्पोवर दरड कोसळून अपघात झाले आहेत.

टॅग्स :thaneठाणे