शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

२३० विहिरींना नव‘जीवन’

By admin | Updated: May 10, 2016 02:02 IST

सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. यात २३० विहिरींना नवजीवन मिळणार असून १५० बोअरवेल नव्याने खोदल्या जाणार आहेत

ठाणे : सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. यात २३० विहिरींना नवजीवन मिळणार असून १५० बोअरवेल नव्याने खोदल्या जाणार आहेत. यातील ७० टक्के विहिरींच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाले असून उरलेले १५ मे पर्यंत पूर्ण होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.ठाण्यातील पाणीकपातीमुळे सर्वत्र तीव्र टंचाई आहे. भविष्यात पुन्हा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने वापरात नसलेल्या विहिरी पुन्हा वापरात याव्या, यासाठी त्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. साफसफाईसोबतच गाळ काढण्याचे काम हाती घेतले. ठाण्यात ५५५ विहिरी आहेत. त्यातील २३० वापरात नाहीत. त्यांचीच स्वच्छता हाती घेतली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता माधव जांगडे यांनी दिली. यंदा पालिकेने १६० बोअरवेल नव्याने खोदल्या आहेत. त्यांचे काम आॅक्टोबरपासून सुरू झाले. यातील १३० बोअरवेलना पाणी लागले, तर ३० कोरड्या निघाल्या. सध्या ठाण्यात १,३७० बोअरवेल आहेत. त्यातील ७८६ बोअरवेलना हातपंप लावले आहेत. या बोअरवेलचा वापर झोपडपट्टी भागात पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी केला जातो. ३६० बोअरवेलचा वापर सार्वजनिक शौचालयांसाठी होतो. २२४ बोअरवेलना विद्युतपंप बसवण्यात आले असून त्यांचा वापर सार्वजनिक उद्याने, ठाणे महापालिकेच्या शाळा, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमी, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी केला जातो. पालिकेने १५० बोअरवेल खोदण्याचे काम सुरू केले असून त्यातील १० बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहे.