शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

२३० विहिरींना नव‘जीवन’

By admin | Updated: May 10, 2016 02:02 IST

सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. यात २३० विहिरींना नवजीवन मिळणार असून १५० बोअरवेल नव्याने खोदल्या जाणार आहेत

ठाणे : सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. यात २३० विहिरींना नवजीवन मिळणार असून १५० बोअरवेल नव्याने खोदल्या जाणार आहेत. यातील ७० टक्के विहिरींच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाले असून उरलेले १५ मे पर्यंत पूर्ण होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.ठाण्यातील पाणीकपातीमुळे सर्वत्र तीव्र टंचाई आहे. भविष्यात पुन्हा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने वापरात नसलेल्या विहिरी पुन्हा वापरात याव्या, यासाठी त्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. साफसफाईसोबतच गाळ काढण्याचे काम हाती घेतले. ठाण्यात ५५५ विहिरी आहेत. त्यातील २३० वापरात नाहीत. त्यांचीच स्वच्छता हाती घेतली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता माधव जांगडे यांनी दिली. यंदा पालिकेने १६० बोअरवेल नव्याने खोदल्या आहेत. त्यांचे काम आॅक्टोबरपासून सुरू झाले. यातील १३० बोअरवेलना पाणी लागले, तर ३० कोरड्या निघाल्या. सध्या ठाण्यात १,३७० बोअरवेल आहेत. त्यातील ७८६ बोअरवेलना हातपंप लावले आहेत. या बोअरवेलचा वापर झोपडपट्टी भागात पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी केला जातो. ३६० बोअरवेलचा वापर सार्वजनिक शौचालयांसाठी होतो. २२४ बोअरवेलना विद्युतपंप बसवण्यात आले असून त्यांचा वापर सार्वजनिक उद्याने, ठाणे महापालिकेच्या शाळा, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमी, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी केला जातो. पालिकेने १५० बोअरवेल खोदण्याचे काम सुरू केले असून त्यातील १० बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहे.