शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

एनडीआरएफच्या २३ जवानांची तुकडी ठाण्यात तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात जलमय परिस्थिती उद्भवलेली असतानाच पुढील ...

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात जलमय परिस्थिती उद्भवलेली असतानाच पुढील काही दिवस पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादरम्यान पूर परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घटना घडल्यास नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनाला एनडीआरएफची जोड मिळणे गरजेचे आहे. ठाणे जिल्ह्यासाठी २३ जणांची एनडीआरएफची तुकडी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यात तैनात झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत एनडीआरएफची तुकडी दुसऱ्यांदा ठाण्यात आली आहे.

जवळपास आठ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचे बरसणे सुरू असून, आणखी काही दिवस पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. ठाण्यात दरड कोसळणे, शहरी - ग्रामीण भागात जलमय परिस्थितीसारखी स्थिती निर्माण झाली होती. अशा घटनांमध्ये शेकडो नागरिक आणि जनावरे अडकून पडली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुसळधार पावसाने तानसा आणि मोडक सागर ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. नदीनाले दुथडी भरून वाहत असल्याने ग्रामीण भागातील पूल पडले आहेत किंवा त्यांची परिस्थिती धोकादायक झाली. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास हाहाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकून पडणाऱ्यांना सुखरूपरीत्या सुरक्षितस्थळी नेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जीवितहानीही टाळणे आवश्यक आहे. याची खबरदारी घेऊन शासनाने एनडीआरएफच्या २३ जवानांची एक तुकडी ठाण्यात धाडली आहे. ती पहाटेच्या सुमारास मुंबईतून आली असून, ठाणे महापालिकेच्या घोडबंदर रोडवरील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात त्यांची व्यवस्था केल्याची माहिती महापालिकेने दिली.

गेल्या वेळी तीन दिवसांत तुकडी परतली होती

मे महिन्यात निर्माण झालेल्या वादळ परिस्थितीच्या वेळी एनडीआरएफच्या तुकडीने ठाण्यात ठाण मांडले होते. त्या वेळी ती तीन दिवस ठाण्यात होती, त्यानंतर परतली होती.