शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

२२७ हरवलेली बालके स्वगृही परतली

By admin | Updated: August 2, 2015 01:55 IST

हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी राज्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत ठाणे शहर पोलिसांमुळे ३१ दिवसांत २२३ बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट क रून दिली.

ठाणे : हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी राज्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत ठाणे शहर पोलिसांमुळे ३१ दिवसांत २२३ बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट क रून दिली. यामध्ये हरवलेल्या दोन विशेष बालकांसह कोणतीही तक्रार दाखल नसलेल्या ४१ बालकांचा त्याचबरोबर बालसुधारगृहांत जीवन जगणाऱ्या ५८ बालकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हरवलेल्या ६९ मुली घरी पाठविल्याची माहिती चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने दिली. भारत सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यात १ ते ३१ जुलैदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत चार पथके तयार केली होती. या पथकांद्वारे ठाणे शहरासह जिल्ह्यातील हरवलेल्या मुलांची तपासणी केली. विशेष म्हणजे बालसुधारगृहांतील बालकांना स्वगृही पाठविण्यावर विशेष भर दिला होता. या विशेष मोहिमेंतर्गत २२७ बालके पोलिसांना सापडली. त्यातील २२३ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे, तर बेवारस सापडलेल्या ४ मुलांना सुधारगृहात दाखल केले. (प्रतिनिधी)पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली मुले/मुलीमाहिती मिळालेले : ८ (मुले ४, मुली ४), अपहरण : ३५ (मुले १३, मुली २२), बेवारस : ४१ (मुले ३४, मुली ७), बालकामगार : ३५ (मुले ३३, मुली २), भिक्षेकरी : ४४ (मुले २१, मुली २३) सुधारगृहातून पालकांच्या ताब्यात : एकूण ५८ (मुले ४७, मुली ११)बेवारस मुले सुधारगृहात दाखल : एकूण ४ (मुले ४)विशेष बालक : एकूण २ (मुले २)मुलीसाठी पालक झाले भिकारी...१काकासोबत मुंबई पाहण्यासाठी मध्य प्रदेशमधून जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेली लक्ष्मी धानक ही १२वर्षीय मुलगी त्यांच्या झालेल्या चुकामुकीमुळे हरवली होती. याबाबत, तिच्या काकांनी पोलीस ठाण्यात तक्रार न करता तिच्या शेतकरी आईवडिलांना सांगितले. २मुलीचा शोध घेता-घेता आणलेले पैसे संपले, पण मुलीला घरी घेऊन जाणारच, असा निश्चय केल्याने मुंबईत भीक मागून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. याचदरम्यान, ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट डोंगरी बालसुधारगृहात जात असताना भायखळा रेल्वे स्थानकात हे धानक दाम्पत्य रडत भीक मागताना दिसून आले. ३त्यांची चौकशी केली असता मुलगी हरवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांनाही त्या बालसुधारगृहात नेले. तेथे लक्ष्मी मिळून आली. विशेष म्हणजे हे दाम्पत्य येताना मुलीचे सर्व पेपर आणि फोटो घेऊन आल्याने त्यांची पुनर्भेट झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली मुले/मुलीमाहिती मिळालेले : ८ (मुले ४, मुली ४), अपहरण : ३५ (मुले १३, मुली २२), बेवारस : ४१ (मुले ३४, मुली ७), बालकामगार : ३५ (मुले ३३, मुली २), भिक्षेकरी : ४४ (मुले २१, मुली २३) सुधारगृहातून पालकांच्या ताब्यात : एकूण ५८ (मुले ४७, मुली ११)बेवारस मुले सुधारगृहात दाखल : एकूण ४ (मुले ४)विशेष बालक : एकूण २ (मुले २)