शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

२२७ हरवलेली बालके स्वगृही परतली

By admin | Updated: August 2, 2015 01:55 IST

हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी राज्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत ठाणे शहर पोलिसांमुळे ३१ दिवसांत २२३ बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट क रून दिली.

ठाणे : हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी राज्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत ठाणे शहर पोलिसांमुळे ३१ दिवसांत २२३ बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट क रून दिली. यामध्ये हरवलेल्या दोन विशेष बालकांसह कोणतीही तक्रार दाखल नसलेल्या ४१ बालकांचा त्याचबरोबर बालसुधारगृहांत जीवन जगणाऱ्या ५८ बालकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हरवलेल्या ६९ मुली घरी पाठविल्याची माहिती चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने दिली. भारत सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यात १ ते ३१ जुलैदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत चार पथके तयार केली होती. या पथकांद्वारे ठाणे शहरासह जिल्ह्यातील हरवलेल्या मुलांची तपासणी केली. विशेष म्हणजे बालसुधारगृहांतील बालकांना स्वगृही पाठविण्यावर विशेष भर दिला होता. या विशेष मोहिमेंतर्गत २२७ बालके पोलिसांना सापडली. त्यातील २२३ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे, तर बेवारस सापडलेल्या ४ मुलांना सुधारगृहात दाखल केले. (प्रतिनिधी)पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली मुले/मुलीमाहिती मिळालेले : ८ (मुले ४, मुली ४), अपहरण : ३५ (मुले १३, मुली २२), बेवारस : ४१ (मुले ३४, मुली ७), बालकामगार : ३५ (मुले ३३, मुली २), भिक्षेकरी : ४४ (मुले २१, मुली २३) सुधारगृहातून पालकांच्या ताब्यात : एकूण ५८ (मुले ४७, मुली ११)बेवारस मुले सुधारगृहात दाखल : एकूण ४ (मुले ४)विशेष बालक : एकूण २ (मुले २)मुलीसाठी पालक झाले भिकारी...१काकासोबत मुंबई पाहण्यासाठी मध्य प्रदेशमधून जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेली लक्ष्मी धानक ही १२वर्षीय मुलगी त्यांच्या झालेल्या चुकामुकीमुळे हरवली होती. याबाबत, तिच्या काकांनी पोलीस ठाण्यात तक्रार न करता तिच्या शेतकरी आईवडिलांना सांगितले. २मुलीचा शोध घेता-घेता आणलेले पैसे संपले, पण मुलीला घरी घेऊन जाणारच, असा निश्चय केल्याने मुंबईत भीक मागून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. याचदरम्यान, ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट डोंगरी बालसुधारगृहात जात असताना भायखळा रेल्वे स्थानकात हे धानक दाम्पत्य रडत भीक मागताना दिसून आले. ३त्यांची चौकशी केली असता मुलगी हरवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांनाही त्या बालसुधारगृहात नेले. तेथे लक्ष्मी मिळून आली. विशेष म्हणजे हे दाम्पत्य येताना मुलीचे सर्व पेपर आणि फोटो घेऊन आल्याने त्यांची पुनर्भेट झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली मुले/मुलीमाहिती मिळालेले : ८ (मुले ४, मुली ४), अपहरण : ३५ (मुले १३, मुली २२), बेवारस : ४१ (मुले ३४, मुली ७), बालकामगार : ३५ (मुले ३३, मुली २), भिक्षेकरी : ४४ (मुले २१, मुली २३) सुधारगृहातून पालकांच्या ताब्यात : एकूण ५८ (मुले ४७, मुली ११)बेवारस मुले सुधारगृहात दाखल : एकूण ४ (मुले ४)विशेष बालक : एकूण २ (मुले २)