शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये वर्षभरात २१ हजार ५३४ कोरोनामुक्त; ६४३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील शहरांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात कहर केला आहे. त्या तुलनेत ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील शहरांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात कहर केला आहे. त्या तुलनेत ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण, आदिवासी भागात या रुग्णांचे प्रमाण तसे फारसे नाही. परंतु, शहरी भागाला म्हणजे महापालिका शहरांजवळील गावपाड्यांमध्ये रुग्णसंख्या दिसून येत आहे. जिल्ह्यातील या गावपाड्यांमध्ये वर्षभरात २३ हजार ९८५ कोरोनाबाधित सापडले. मात्र, यापैकी २१ हजार ५३४ जण कोरोनामुक्त झाले असून ६४३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी एक हजार ८०८ जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर (पीएचसी) ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील एक हजार ८०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पीएचसींमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा नाही. त्यामुळे या गावपाड्यांतील ठिकठिकाणचे ९५ रुग्ण जवळील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये व शहरांतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवर आहेत तर आठ जण जीवन-मरणाचे ठोके व्हेंटिलेटरवर मोजत आहेत. या ग्रामीण रुग्णांसाठी वरदान ठरणारे भिवंडी तालुक्यातील सवाद, भिणार व वज्रेश्वरी येथील कोरोना रुग्णालये मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेअभावी तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे केवळ निरोपयोगी ठरत आहे. गुरुवारी पालकमंत्र्यांनी या रुग्णालयांवरील मनुष्यबळासह सोयीसुविधांवर तीन तास चर्चा केली. मात्र, तत्काळ ठोस उपाययोजना म्हणून लोकप्रतिनिधींचा निधी व ऑक्सिजन प्लान्ट उभारणीवर भर देण्याचे नियोजन केले आहे.

-१२२९ ग्रामस्थ होम क्वॉरंटाइन

जिल्ह्यातील या ग्रामीण, दुर्गम भागातील एक हजार १२९ ग्रामस्थांनी स्वत:ला घरात क्वारंटाइन करून घेत उपचार सुरू केले आहेत. यापैकी शहापूर तालुक्यातील २०९ ग्रामस्थांवर घरात उपचार सुरू आहेत. या तालुक्यातील शेंद्रुण, वासिंद, अघई, टाकीपठार, खानिवली, शेणवा, टेंभा आणि डोळखांब पीएचसीच्या आरोग्य यंत्रणेकडून उपचार सुरू आहेत. या आरोग्ययंत्रणेकडून आतापर्यंत चार हजार २३७ रुग्णांवर उपचार झाले. यापैकी तीन हजार ६२८ जण कोरोनामुक्त झाले. उर्वरित ४७१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील ५१५ रुग्णांवर उपचार सुरू असून ४९५ घरी क्वाॅरंटाइन होऊन उपचार घेत आहेत. यावर म्हसा, ढसाळ, नारीवली, किशोर, सरळगाव, शिरोशी, मोरोशी आणि तुळई पीएचसीची यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

------