शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा २० हजार नळजोडण्या!

By admin | Updated: February 6, 2016 02:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू आहे. त्यामुळे पाण्याची बिले वेळेत भरणाऱ्या ग्राहकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे

मुरलीधर भवार,  डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू आहे. त्यामुळे पाण्याची बिले वेळेत भरणाऱ्या ग्राहकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. त्याच वेळी साधारण २२ टक्के पाण्याची चोरी किंवा गळती होते, अशी स्थिती आहे. पण, हा अंदाजही १८ वर्षांपूर्वीचा आहे. वस्तुत: ही चोरी आटोक्यात आणली तर सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. १८ वर्षांत या चोरीचे आॅडिटच न झाल्याने फुकट्यांची, पाणी चोरणाऱ्यांची चंगळ सुरू आहे आणि दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून त्यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी पक्ष आग्रही असूनही पालिकेने मात्र मौन बाळगले आहे. पाणीचोरांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सेना सदस्यांनी मनपा क्षेत्रात जवळपास २० हजार बेकायदा नळजोडण्या असल्याचा दावा केला आहे. पण, पालिकेने मात्र पाणीचोरी होतच नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. मनपा क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र्र धरणात पाणीसाठा कमी असल्याने सध्याच्या पाणीकपातीत वाढ होऊन शनिवार-रविवारी पाणीपुरवठा बंद राहील. पालिकेने २५ कोटींच्या टंचाईच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यात बोअरवेल दुरुस्ती, विहिरी स्वच्छ करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर आहे. पण, पाणीचोरांवर कारवाईचा कोणताही आराखडा नाही. २० हजार बेकायदा नळजोडण्यांचा दावा खरा मानला, तर साधारण ४० हजार कुटुंबे सध्या फुकटचे पाणी वापरत आहेत. त्यातून महिन्याला जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचा महसूल बुडतो.पाणीचोरीविरोधात आवाज उठवून सातत्याने पाठपुरावा करणारे सेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी यासाठी २०१० पासून पाच वेळा उपोषण केले. त्यानंतर, खोटी कागदपत्रे सादर करून नळजोडण्या घेतल्याप्रकरणी ९८ गुन्हे दाखल झाले. यात, १२ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पुढे बेकायदा नळजोडण्यांवरील कारवाई थंडावली. त्यांच्याशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने चोरांचे फावल्याचा आरोपही झाला. अर्धा इंची बेकायदा नळजोडणीसाठी अधिकारी २५ हजार, तर एक इंची नळजोडणीसाठी ५० हजार रुपये घेतात, असा म्हात्रे यांचा आरोप आहे. पालिका क्षेत्रात पाणीचोरी होत नसून तशी तक्रार मनपाकडे आली नसल्याची लेखी माहितीच म्हात्रे यांना दिली आहे.पाणीपुरवठा शनिवार आणि रविवारी बंद राहणार असल्याने त्या काळात टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही, असे प्रभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखड्यानुसार १५ टँकरच्या प्रत्येक प्रभाग क्षेत्रात १० हजार लीटर क्षमतेच्या पाच फेऱ्या होतात. मात्र, ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्याच दिवशी टँकर मिळणार नसेल; तर इतर दिवशी टँकरने पाणीपुरवठा करून काय उपयोग, असा महिलांचा सवाल आहे.