शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

बेकायदा २० हजार नळजोडण्या!

By admin | Updated: February 6, 2016 02:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू आहे. त्यामुळे पाण्याची बिले वेळेत भरणाऱ्या ग्राहकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे

मुरलीधर भवार,  डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू आहे. त्यामुळे पाण्याची बिले वेळेत भरणाऱ्या ग्राहकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. त्याच वेळी साधारण २२ टक्के पाण्याची चोरी किंवा गळती होते, अशी स्थिती आहे. पण, हा अंदाजही १८ वर्षांपूर्वीचा आहे. वस्तुत: ही चोरी आटोक्यात आणली तर सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. १८ वर्षांत या चोरीचे आॅडिटच न झाल्याने फुकट्यांची, पाणी चोरणाऱ्यांची चंगळ सुरू आहे आणि दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून त्यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी पक्ष आग्रही असूनही पालिकेने मात्र मौन बाळगले आहे. पाणीचोरांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सेना सदस्यांनी मनपा क्षेत्रात जवळपास २० हजार बेकायदा नळजोडण्या असल्याचा दावा केला आहे. पण, पालिकेने मात्र पाणीचोरी होतच नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. मनपा क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र्र धरणात पाणीसाठा कमी असल्याने सध्याच्या पाणीकपातीत वाढ होऊन शनिवार-रविवारी पाणीपुरवठा बंद राहील. पालिकेने २५ कोटींच्या टंचाईच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यात बोअरवेल दुरुस्ती, विहिरी स्वच्छ करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर आहे. पण, पाणीचोरांवर कारवाईचा कोणताही आराखडा नाही. २० हजार बेकायदा नळजोडण्यांचा दावा खरा मानला, तर साधारण ४० हजार कुटुंबे सध्या फुकटचे पाणी वापरत आहेत. त्यातून महिन्याला जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचा महसूल बुडतो.पाणीचोरीविरोधात आवाज उठवून सातत्याने पाठपुरावा करणारे सेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी यासाठी २०१० पासून पाच वेळा उपोषण केले. त्यानंतर, खोटी कागदपत्रे सादर करून नळजोडण्या घेतल्याप्रकरणी ९८ गुन्हे दाखल झाले. यात, १२ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पुढे बेकायदा नळजोडण्यांवरील कारवाई थंडावली. त्यांच्याशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने चोरांचे फावल्याचा आरोपही झाला. अर्धा इंची बेकायदा नळजोडणीसाठी अधिकारी २५ हजार, तर एक इंची नळजोडणीसाठी ५० हजार रुपये घेतात, असा म्हात्रे यांचा आरोप आहे. पालिका क्षेत्रात पाणीचोरी होत नसून तशी तक्रार मनपाकडे आली नसल्याची लेखी माहितीच म्हात्रे यांना दिली आहे.पाणीपुरवठा शनिवार आणि रविवारी बंद राहणार असल्याने त्या काळात टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही, असे प्रभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखड्यानुसार १५ टँकरच्या प्रत्येक प्रभाग क्षेत्रात १० हजार लीटर क्षमतेच्या पाच फेऱ्या होतात. मात्र, ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्याच दिवशी टँकर मिळणार नसेल; तर इतर दिवशी टँकरने पाणीपुरवठा करून काय उपयोग, असा महिलांचा सवाल आहे.