शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

६०० किलो ओल्या कचऱ्यापासून सहा वर्षांत बनवले २०० किलो जैवखत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 8, 2024 11:22 IST

घराबाहेर गेला नाही कचऱ्याचा एकही कण, तरुणाचे व्यवस्थापन

प्रज्ञा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या ६ वर्षांत ठाण्यातील वालावलकर कुटुंबाने घरच्या घरी कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यांच्या घरातून कणभरही कचरा बाहेर टाकलेला नाही. ते ओल्या (जैवविघटनशील) कचऱ्याचे घरातच जैवखतात रूपांतर करत असून, सहा वर्षांत जवळपास ६०० किलो ओल्या कचऱ्यापासून जवळपास २०० किलो जैवखत तयार केले. सगळा सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठवतात. पर्यावरणशास्त्रात पदव्युत्तर पदवीधारक प्रतीक वालावलकर या तरुणाने याकरिता पुढाकार घेतला. 

वालावलकर यांच्या घरगुती सेंद्रिय कचरा व्यवस्थापन प्रकल्पात सहा वर्षात अर्ध्या टनापेक्षा अधिक सेंद्रिय कचरा त्यांच्या घराबाहेर जाण्यापासून रोखला आहे. घरात दररोज तयार होणारा सेंद्रिय कचरा बारीक चिरून तो बादलीत नीट पसरवून ढवळला जातो. त्याला अवघी दहा ते पंधरा मिनिटे लागतात, असे प्रतीकने सांगितले. या विघटन प्रक्रियेतून घरातील झाडांच्या वाढीकरिता आणि मातीची सुपीकता, तिचा पोत वाढवण्याकरिता आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांनीयुक्त सेंद्रिय खताची निर्मिती होते. सेंद्रिय कचऱ्याच्या विघटन प्रक्रियेतून निघणाऱ्या पाण्यात सेंद्रिय खतातील पोषक घटक मिसळलेले असल्यामुळे सेंद्रिय खताप्रमाणेच ते पाणी सुद्धा आपण घरातील झाडांच्या मातीत टाकू शकतो.   ऑगस्ट २०१३ मध्ये प्रतीकने त्याच्या गृहसंकुलात निर्माल्य आणि भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून जैवखत निर्मितीचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला. त्यानंतर गृहसंकुलातील झाडांच्या पालापाचोळ्यापासून गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला, ज्यातून जवळपास ८०० किलोग्रॅम दर्जेदार अशा गांडूळखताची निर्मिती झाली होती.

जैवखत उत्कृष्ट प्रतीचे उत्कृष्ट प्रतीचे जैवखत नजरेने, गंधाने आणि स्पर्शाने ओळखण्याच्या काही खुणा आहेत; त्याचा रंग काळा असतो, त्याला मातीचा वास असतो, वजनाने ते मातीपेक्षा हलके असते, त्यात मुबलक प्रमाणात ओलावा असतो. या सगळ्या खुणा आमच्या जैवखताशी अगदी तंतोतंत जुळतात. स्वयंपाकघरात रोज उत्पन्न होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचे आणि देवघरातील निर्माल्याचे घरगुती पातळीवरच दुर्गंधी विरहीत शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होत राहते. 

टॅग्स :thaneठाणेFertilizerखते